शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

तेजस एक्स्प्रेसच्या २४ प्रवाशांना आॅम्लेटमधून झाली विषबाधा, चिपळूणमध्ये रेल्वे थांबविली : चौघांची प्रकृती गंभीर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 05:32 IST

कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

चिपळूण (जि. रत्नागिरी) : कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील २४ प्रवाशांना रविवारी आॅम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. त्यांना तातडीने चिपळुणातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. चौघांची प्रकृती गंभीर आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच रेल्वेच्या खानपान सेवेचे कॅगने वाभाडे काढले होते.रत्नागिरी स्टेशन सोडल्यानंतर प्रवाशांना उलटी होत असल्याचे तिकीट तपासनीसाच्या लक्षात आले. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता चिपळूण स्टेशनवर गाडी थांबविण्यात आली. रेल्वेच्या डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर विषबाधित २४ प्रवाशांना लाइफकेअर इस्पितळात दाखल करण्यात आले.शिवसेनेचे खा. विनायक राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. तर चिपळूणचे शिवसेना आ. सदानंद चव्हाण यांच्यासह नागरिकांनी विषबाधा झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली.इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार या रेल्वेतील खानपान सेवेचे कंत्राट जे. के. घोष कंपनीस दिलेले आहे. रविवारी एकूण २२० प्रवाशांना नाश्ता पुरविण्यात आला. त्यापैकी १३० प्रवाशांनी शाकाहारी तर इतरांनी मांसाहारी नाश्ता घेतला होता. विषबाधा झालेल्यांपैकी बहुतेकांनी आॅम्लेट खाल्ले होते. पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत....म्हणे आधुनिक सुखसोयींची गाडी!गोव्यातील करमाळी आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान धावणाºया तेजस एक्स्प्रेसचे, आधुनिक सुखसोयी असलेली सेमी हाय स्पीड गाडी म्हणून गाजावाजा करून जूनमध्ये उद््घाटन केले होते. स्वयंचलित दरवाजे, एलईडी टीव्ही, यूएसबी चार्जिंग पॉइंट, जीपीएस आधारित प्रवासी माहिती व्यवस्था, सेलीब्रिटी शेफ मेन्यू आणि कॉफी व्हेंडिंग मशीन या सोयींची मोठी प्रसिद्धी केली गेली होती.‘कॅग’ने काढले होते वाभाडेभारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) त्यांच्या अहवालात रेल्वेच्या निकृष्ट अन्नपदार्थांवर ताशेरे ओढल्यानंतर तीन महिन्यांनी रविवारची दुर्घटना घडली. ‘कॅग’ने ७४ निवडक रेल्वे स्टेशन आणि ८० गाड्यांमध्ये विकल्या जाणाºया खाद्यपेयांची तपासणी करून अहवाल दिला होता.अन्नपदार्थ माशा व धूळ बसू नये म्हणून झाकूनही ठेवले जात नाहीत व जेथे पदार्थ तयार करतात त्या पॅन्ट्रीमध्ये झुरळे व उंदीर फिरत असतात, असे तपासणीत आढळून आले होते.रेल्वे स्टेशनवर मानवी सेवनास अयोग्य, दूषित व पुन्हा गरम केलेले शिळे अन्नपदार्थ विकले जातात. अनेक वेळा विक्रीसाठी ठेवलेले पाकीटबंद व बाटलीबंद पदार्थ हे सेवनासाठीची मुदत संपून गेलेले असतात, असेही अहवालात नमूद केले गेले होते.पनवेल स्टेशनवर तयारीपनवेल : तेजस एक्स्प्रेसमधील विषबाधा झालेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी पनवेल स्टेशनवर तयारी करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात एकच बाधित प्रवासी या गाडीने आला. विषबाधेची माहिती मिळाल्यानंतर, पनवेल स्टेशनवर १२ रुग्णवाहिका, ३ डॉक्टर, स्ट्रेचर, व्हीलचेअर तयार ठेवण्यात आले होते. लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये १५ बेड राखीव ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात सी-२ डब्यातून प्रवास करणा-या डोंबिवलीच्या तृप्ती देसाई याच पनवेल स्टेशनवर उतरल्या. तृप्ती देसाई या आपले पती, सासूबाई व एक वर्षाच्या मुलाबरोबर कुडाळ ते ठाणे प्रवास करीत होत्या. त्यांचे पती व सासूबाईने शाकाहारी नाश्ता केला. मात्र, तृप्ती देसाई यांनी आॅम्लेट घेतले होते, त्याचा त्यांना त्रास झाला. मात्र, पनवेल येथे आल्या, त्या वेळी त्यांची प्रकृती ठीक होती.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे