शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

फोर-जीच्या कामाला सुरुवात

By admin | Updated: July 11, 2014 01:05 IST

रिलायन्स ‘बॅकफूट’वर; अखेर सुपर व्हिजनचे दर मान्य

अकोला : शहरात भूमिगत केबल टाकण्यासाठी फोर-जी करारात समाविष्ट करण्यात आलेल्या सुपर व्हिजन चाज्रेसच्या मुद्यावरून रिलायन्स कंपनीने माघार घेत दर मान्य केले आहेत. नुकतीच कराराची रक्कम मनपाकडे जमा करण्यात आली असून, फोर-जीच्या खोदकामाला शहरात सुरुवात झाली आहे. महापालिका क्षेत्रातील मोबाईलधारकांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मोबाईल, इंटरनेटच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारी फोर-जी सुविधा अकोलेकरांना उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स इन्फोकॉम जीओ कंपनीसोबत मनपा प्रशासनाचा करार ह्यफायनलह्ण झाला आहे. कंपनीच्यावतीने शहरात ८९ किलोमीटर अंतराचे भूमिगत फायबर ऑप्टिक केबलचे जाळे पसरविण्यात येईल. यापूर्वी महापौर ज्योत्स्ना गवई यांनी २६ फेब्रुवारी २0१४ रोजी सर्वसाधारण सभेत १४ कोटी रुपयांत फोर-जी सुविधेचा करार मंजूर केला; मात्र २६ फेब्रुवारीची सभा अवैध असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सभेचा ठराव रद्द केला. तसेच कंपनीसमोर पुनर्भरणाचे दर (रिस्टोरेशन चार्ज) व सुपर व्हिजन दराच्या (देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांचे दर) आकारणीसह १२ कोटी ९१ लाख ९0 हजार रकमेचा प्रस्ताव मांडला. यामध्ये १ कोटी ४0 लाख रुपये निव्वळ सुपर व्हिजनचे आकारण्यात आले. मध्यंतरी पुनर्भरणाचे दर आकारल्यानंतर पुन्हा सुपर व्हिजन जार्च कशासाठी, असा सवाल रिलायन्सने उपस्थित केला होता. त्यावर वीज कंपनी तसेच भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडला खोदकामाचे आकारलेले दर रिलायन्ससोबतसुद्धा कायम ठेवल्याचे प्रशासनाने नमूद करीत सुपर व्हिजनचे दर कायम ठेवण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. प्रशासन भूमिकेवर ठाम असल्याचे पाहून नुकतेच कंपनीने संपूर्ण रकमेचा भरणा करीत शहरात खोदकामाला सुरुवात केली आहे.

** भाकीत खरे ठरले!

मनपाच्या रिस्टोरेशन दरासह सुपर व्हिजन दर आकारणीवर कंपनीने आक्षेप घेतला होता; परंतु आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर निर्णयावर ठाम होते. सुपर व्हिजन दरापोटी फक्त १ कोटी ४0 लाख जमा करायचे होते. एवढय़ा लहान रकमेसाठी हा करार नाकारल्यास पुढील दोन वर्षांंपर्यंंत फोर-जीचे काम लांबणीवर जाणार होते. काही का होईना, परंतु एवढय़ा लहान रकमेसाठी कंपनी हा करार मोडणार नसल्याचे भाकीत लोकमतने मे महिन्यात वर्तविले होते, ते खरे ठरले.

** लोकमतचा वस्तुनिष्ठ पाठपुरावा

यापूर्वी मनपाने ऑगस्ट २0१३ मध्ये रिलायन्स कंपनीसोबत हाच करार आठ कोटी ३७ लाखात मंजूर केला होता. या व्यवहारात अधिकारी-पदाधिकार्‍यांनी संगनमताने कोट्यवधींच्या रकमेवर हात साफ केल्याचे वृत्त लोकमतमध्ये १४ ऑगस्ट रोजी उमटताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. यावर महापौर ज्योत्स्ना गवई यांनी हा करार रद्द केला होता. ८ कोटी ३७ लाख ऐवजी मनपाच्या तिजोरीत १३ कोटी जमा झाले, हे येथे उल्लेखनीय.