शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

फोर-जीच्या कामाला सुरुवात

By admin | Updated: July 11, 2014 01:05 IST

रिलायन्स ‘बॅकफूट’वर; अखेर सुपर व्हिजनचे दर मान्य

अकोला : शहरात भूमिगत केबल टाकण्यासाठी फोर-जी करारात समाविष्ट करण्यात आलेल्या सुपर व्हिजन चाज्रेसच्या मुद्यावरून रिलायन्स कंपनीने माघार घेत दर मान्य केले आहेत. नुकतीच कराराची रक्कम मनपाकडे जमा करण्यात आली असून, फोर-जीच्या खोदकामाला शहरात सुरुवात झाली आहे. महापालिका क्षेत्रातील मोबाईलधारकांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मोबाईल, इंटरनेटच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरणारी फोर-जी सुविधा अकोलेकरांना उपलब्ध करून देण्यासाठी रिलायन्स इन्फोकॉम जीओ कंपनीसोबत मनपा प्रशासनाचा करार ह्यफायनलह्ण झाला आहे. कंपनीच्यावतीने शहरात ८९ किलोमीटर अंतराचे भूमिगत फायबर ऑप्टिक केबलचे जाळे पसरविण्यात येईल. यापूर्वी महापौर ज्योत्स्ना गवई यांनी २६ फेब्रुवारी २0१४ रोजी सर्वसाधारण सभेत १४ कोटी रुपयांत फोर-जी सुविधेचा करार मंजूर केला; मात्र २६ फेब्रुवारीची सभा अवैध असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सभेचा ठराव रद्द केला. तसेच कंपनीसमोर पुनर्भरणाचे दर (रिस्टोरेशन चार्ज) व सुपर व्हिजन दराच्या (देखरेखीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांचे दर) आकारणीसह १२ कोटी ९१ लाख ९0 हजार रकमेचा प्रस्ताव मांडला. यामध्ये १ कोटी ४0 लाख रुपये निव्वळ सुपर व्हिजनचे आकारण्यात आले. मध्यंतरी पुनर्भरणाचे दर आकारल्यानंतर पुन्हा सुपर व्हिजन जार्च कशासाठी, असा सवाल रिलायन्सने उपस्थित केला होता. त्यावर वीज कंपनी तसेच भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडला खोदकामाचे आकारलेले दर रिलायन्ससोबतसुद्धा कायम ठेवल्याचे प्रशासनाने नमूद करीत सुपर व्हिजनचे दर कायम ठेवण्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. प्रशासन भूमिकेवर ठाम असल्याचे पाहून नुकतेच कंपनीने संपूर्ण रकमेचा भरणा करीत शहरात खोदकामाला सुरुवात केली आहे.

** भाकीत खरे ठरले!

मनपाच्या रिस्टोरेशन दरासह सुपर व्हिजन दर आकारणीवर कंपनीने आक्षेप घेतला होता; परंतु आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर निर्णयावर ठाम होते. सुपर व्हिजन दरापोटी फक्त १ कोटी ४0 लाख जमा करायचे होते. एवढय़ा लहान रकमेसाठी हा करार नाकारल्यास पुढील दोन वर्षांंपर्यंंत फोर-जीचे काम लांबणीवर जाणार होते. काही का होईना, परंतु एवढय़ा लहान रकमेसाठी कंपनी हा करार मोडणार नसल्याचे भाकीत लोकमतने मे महिन्यात वर्तविले होते, ते खरे ठरले.

** लोकमतचा वस्तुनिष्ठ पाठपुरावा

यापूर्वी मनपाने ऑगस्ट २0१३ मध्ये रिलायन्स कंपनीसोबत हाच करार आठ कोटी ३७ लाखात मंजूर केला होता. या व्यवहारात अधिकारी-पदाधिकार्‍यांनी संगनमताने कोट्यवधींच्या रकमेवर हात साफ केल्याचे वृत्त लोकमतमध्ये १४ ऑगस्ट रोजी उमटताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. यावर महापौर ज्योत्स्ना गवई यांनी हा करार रद्द केला होता. ८ कोटी ३७ लाख ऐवजी मनपाच्या तिजोरीत १३ कोटी जमा झाले, हे येथे उल्लेखनीय.