शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

गोवा जिंकून लोकसभा निवडणुकीच्या यशाचा पाया रचा - अमित शहा

By admin | Updated: August 20, 2016 20:21 IST

2017 साली गोवा जिंकून 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी यशाचा पाया भाजपच्या कार्यकत्र्यानी गोव्यात रचावा, असे आवाहन शहा यांनी केले.

 

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २० - गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 27 जागा जिंकायलाच हव्यात असे उद्दीष्ट या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे गोवा भाजपला ठरवून दिले. 2017 साली गोवा जिंकून 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी यशाचा पाया भाजपच्या कार्यकत्र्यानी गोव्यात रचावा, असे आवाहन शहा यांनी केले.
भाजप गोव्याला भ्रष्टाचारमुक्त शासन देईल. गेल्या साडेचार वर्षात आमच्या पक्षाने गोव्याला स्थिर सरकार दिले. आयाराम-गयारामांचे हे सरकार नव्हते. अनेक कल्याणकारी योजना सरकारने लोकांसाठी राबविल्या. 2क्12 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. यावेळच्या निवडणुकीत 27 जागा मिळायलाच हव्यात. बूथस्तरीय कार्यकत्र्यानी निर्धार केल्यास 27 मतदारसंघात भाजप निश्चितच जिंकेल, असे शहा म्हणाले. 
पणजीपासून जवळच असलेल्या बांबोळी येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात भाजपच्या हजारो कार्यकत्र्याच्या सहभागाने संमेलन पार पडले. शहा हे त्यावेळी कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. संतोष व्यासपीठावर होते.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 सालची लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा पणजीतच झाली होती. आता गोव्याची विधानसभा निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण गोव्यासह अन्य काही राज्यांमध्ये 2017 साली निवडणुका होणार आहेत. 2017 साली भाजपने गोवा जिंकला की, देशभर एक चांगला संदेश जाईल. 2019 साली पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविली जाईल. त्यावेळच्या यशासाठी गोवा जिंकणो अत्यावश्यक आहे, असा मुद्दा शहा यांनी मांडला. बूथस्तरावरील कार्यकर्ते ही भाजपची खरी शक्ती आहे, असे शहा म्हणाले.
गोव्याच्या निवडणुका जिंकण्याचे स्वप्न काँग्रेस पक्ष पाहत आहे पण देशभर गलितगात्र झालेल्या या पक्षास गोव्यात जिंकणो शक्यच होणार नाही. मनोहर र्पीकर यांना गोव्याने देशाची सेवा करण्यासाठी केंद्रात पाठवले आहे. ते दिल्लीत असले तरी, त्यांचे लक्ष कायम गोव्यातच असते. मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात र्पीकर चांगल्या प्रकारे काम करत आहेत, असे शहा म्हणाले. गोव्यातील भाजपची संघटना मजबूत असून ती कौतुकास पात्र आहे, असे उद्गारही शहा यांनी काढले.
(खास प्रतिनिधी)