शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

गोवा जिंकून लोकसभा निवडणुकीच्या यशाचा पाया रचा - अमित शहा

By admin | Updated: August 20, 2016 20:21 IST

2017 साली गोवा जिंकून 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी यशाचा पाया भाजपच्या कार्यकत्र्यानी गोव्यात रचावा, असे आवाहन शहा यांनी केले.

 

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २० - गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 27 जागा जिंकायलाच हव्यात असे उद्दीष्ट या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे गोवा भाजपला ठरवून दिले. 2017 साली गोवा जिंकून 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी यशाचा पाया भाजपच्या कार्यकत्र्यानी गोव्यात रचावा, असे आवाहन शहा यांनी केले.
भाजप गोव्याला भ्रष्टाचारमुक्त शासन देईल. गेल्या साडेचार वर्षात आमच्या पक्षाने गोव्याला स्थिर सरकार दिले. आयाराम-गयारामांचे हे सरकार नव्हते. अनेक कल्याणकारी योजना सरकारने लोकांसाठी राबविल्या. 2क्12 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. यावेळच्या निवडणुकीत 27 जागा मिळायलाच हव्यात. बूथस्तरीय कार्यकत्र्यानी निर्धार केल्यास 27 मतदारसंघात भाजप निश्चितच जिंकेल, असे शहा म्हणाले. 
पणजीपासून जवळच असलेल्या बांबोळी येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात भाजपच्या हजारो कार्यकत्र्याच्या सहभागाने संमेलन पार पडले. शहा हे त्यावेळी कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. संतोष व्यासपीठावर होते.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 सालची लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा पणजीतच झाली होती. आता गोव्याची विधानसभा निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण गोव्यासह अन्य काही राज्यांमध्ये 2017 साली निवडणुका होणार आहेत. 2017 साली भाजपने गोवा जिंकला की, देशभर एक चांगला संदेश जाईल. 2019 साली पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविली जाईल. त्यावेळच्या यशासाठी गोवा जिंकणो अत्यावश्यक आहे, असा मुद्दा शहा यांनी मांडला. बूथस्तरावरील कार्यकर्ते ही भाजपची खरी शक्ती आहे, असे शहा म्हणाले.
गोव्याच्या निवडणुका जिंकण्याचे स्वप्न काँग्रेस पक्ष पाहत आहे पण देशभर गलितगात्र झालेल्या या पक्षास गोव्यात जिंकणो शक्यच होणार नाही. मनोहर र्पीकर यांना गोव्याने देशाची सेवा करण्यासाठी केंद्रात पाठवले आहे. ते दिल्लीत असले तरी, त्यांचे लक्ष कायम गोव्यातच असते. मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात र्पीकर चांगल्या प्रकारे काम करत आहेत, असे शहा म्हणाले. गोव्यातील भाजपची संघटना मजबूत असून ती कौतुकास पात्र आहे, असे उद्गारही शहा यांनी काढले.
(खास प्रतिनिधी)