शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची मागील टर्मची आमदारकी सुप्रीम कोर्टाकडून रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 00:48 IST

सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी ठरले. त्यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.

औरंगाबाद : शिवसेना नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी २०१४च्या विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याची निर्धारित वेळ संपल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्याचा औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर विजयी ठरले. त्यांच्या निवडीस आव्हान देणारी याचिका काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करताना खोतकर यांनी फार्म क्रमांक ९ (नमुना नंबर २६) सोबत मूळ शपथपत्र जोडले होते. मात्र वैयक्तिक माहितीत अवलंबितांची माहिती दिली नव्हती. शिवाय, त्यांनी पक्षाचा एबी अर्जही जोडला नव्हता आणि अर्ज क्रमांक ९,१० व ४४ मध्ये त्रुटी होत्या. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मुदतीनंतर अर्ज दाखल केला, परंतु अर्जावर वेळ मात्र मुदतीआधीची नोंदवली. इलेक्ट्रॅनिक पुरावा ग्राह्य धरण्यास हरकत नसते परंतु त्या उपकरणाचे नियंत्रण कुणाकडे आहे, याकडे दूर्लक्ष करता येणार नाही, असे मत नोंदवत न्यायमूर्ती ता. वि. नलावडे यांनी सदस्यत्व रद्द केले होते.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरCourtन्यायालय