शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे निधन

By admin | Updated: February 16, 2015 19:09 IST

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी निधन झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी निधन झाले आहे. पाटील कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात गेले काही आठवडे उपचार सुरू होते. अनेकांचे जीवन उध्वस्त करणा-या डान्स बार्सवर बंदीची कारवाई करणा-या पाटील यांची गृहमंत्रीपदाची कारकिर्द चांगलीच गाजली. सांगलीजवळच्या तासगावातून अत्यंत तळातून उपमुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारलेल्या पाटील यांची प्रतिमा ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा अशी होती. तब्बल पाचवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या पाटील यांनी सर्वात जास्त काळ गृहमंत्रीपदही भूषवले होते.
राष्ट्रवादी पक्षाला या घटनेने जबर धक्का बसला आहे. पाटील हे अत्यंत संवेदनशील असलेला व सामान्य माणसाशी जोडलेला नेता अशा शब्दांत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दु:ख व्यक्त केले. ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही पाटील यांची मैत्री होती. राजकीय वैमनस्य होतं परंतु व्यक्ती म्हणून कधीही एकमेकांचे संबंध बिघडले नाहीत असे तावडे म्हणाले. 
तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात गृहमंत्रीपदाच्या काळात सुरू करणा-या आबांची ओळख उत्कृष्ट वक्ता, सभागृहामध्ये उत्तम काम करणारी व्यक्ती तसेच प्रशासनाची उत्तम जाण असलेला नेता अशी ओळख होती. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये समन्वय ठेवण्यात महत्त्वाची भूमिकाही आबांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सरकारच्या काळात बजावली आहे. हुषार मुलगा म्हणून शंकरराव चव्हाण कौतुक करायचे अशी आठवण अशोक चव्हाण यांनी सांगितली. आज संध्याकाळी पाटील यांचे पार्थिव ७ ते ९ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे  अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या तासगावला अंजनी येथे त्यांच्या गावी शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले.
सच्चा सहकारी गेला, आबांनी अनेक संकटं पचवली यशवंत रावांनी मला घडवलं आबंच्या नेतृत्वाची मला मदत झाली, त्यांचा प्रवास थक्क करणारा होता  अशा शब्दांत आबांच्या आठवणी सांगत शरद पावारांनी आपला शोक व्यक्त केला.तर आर.आर. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राला धक्का बसला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 
 डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतू आमच्यावर दुर्दैवाचा घाला झाला आहे, आर.आर. अतिशय लहान कुटुंबातून आलेला नेता असून राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी दिली .
आर.आर. पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील राजकरणात पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 
आमच्या तालुक्याचा तारणहार गेला, त्यांच्यामुळेच आमच्या तालुक्याला ओळख मिळाली, त्यांनी कायम मित्रासारखी वागणूक दिली, माझं लग्न त्यांनीच करून दिलं विरोधकांनाही त्यांनी विरोधकांसारखी वागणूक दिली नाही. जवळच्या गावांना पाणी उपलब्ध करून दिल्याने गावे सुजलाम सुफलाम झाली, लोकांच्या प्रश्नाव्यतिरिक्त त्यांनी कधी कोणती चर्चा केली नाही अशी प्रतिक्रिया आबांचे खाजगी सचिव बाळासाहेब गुरव यांनी यावेळी दिली. 
 पक्षाचं कधीही नभरून काढता येणारं नुकसान झालं आहे, पक्षाला त्यांची गरज असताना ते अकाली पणे आमच्यातून निघून गेले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये समन्वय साधण्यास त्यांची कायम मदत झाली, पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी शरद पवारांना साथ दिली. विरोधी पक्ष नेते म्हणून केलेली भाषणं गाजली, त्याचा पक्षाला फायदाच झाला. महाराष्ट्र एका सुस्कृंत राजकरण्याला मुकला असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी व्यक्त केली