शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

झाले गेले विसरा, एकत्रितपणे निवडणुकीच्या कामाला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:14 IST

मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे : भाजपा-शिवसेना आमदारांना दिले आदेश

मुंबई : साडेचार वर्षांत भाजपा शिवसेनेत काहीशी कटुता होती, पण आता ती उगाळत बसण्याचे काहीही कारण नाही. आपण एकत्र आलो आहोत. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका जिंकण्याचा निर्धार करून एकत्रितपणे फिरा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आमदारांना दिला.

भाजपा - शिवसेना आमदारांचे स्नेहभोजन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सोमवारी रात्री झाले. मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपा- शिवसेनेचे बहुतेक मंत्री, आमदार यावेळी उपस्थित होते.

भाजपा शिवसेनेची युती आजची नाही ती पंचवीस वर्षांपासूनची आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी युती होणे अत्यंत आवश्यक होते. युती झाली नसती, तर त्याचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला झाला असता. इतकी वर्षे ज्यांच्या विरोधात आपण रान उठवले त्यांना आपल्या बेकीचा फायदा मिळवून द्यायचा नाही हा विचार करूनच आम्ही एकत्र आलो आहोत. वेगवेगळे लढलो असतो तर आपण पुन्हा पंधरा वर्षे मागे गेलो असतो, असे मुख्यमंत्री आणि उद्धव यांनी सांगितले.

युतीचा निर्णय आता झालेला आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने एकत्रितपणे बसून हा निर्णय घेतला आहे पण, निवडणुकीच्या मैदानात त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. युती झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक निश्चितपणे जिंकू असा आत्मविश्वास वाढला आहे.

अगदी काही ठिकाणी थोड्याफार कुरबुरी आहेत पण, लोकसभा निवडणूक लक्षात घेता त्या आता होता कामा नयेत. भाजपा आणि शिवसेनेचे आमदार, स्थानिक नेते या सगळ्यांनी एकत्रितपणे फिरण्यास सुरुवात करा, असे फडणवीस आणि ठाकरे यांनी सांगितले.दोन्ही पक्षांचे आमदार -खासदार, पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी यांच्यात गेली साडेचार वर्षे एकोपा होताच. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंधही अत्यंत स्नेहाचे राहिले पण, काही मुद्द्यांवर मतभेद होते आणि त्यातून तणावाचे चित्र समोर आले. आता त्यावरदेखील आमच्यात चर्चा होऊन मतभेदाचे मुद्दे मार्गी लागले आहेत. युती झाल्यामुळे तुमचे चेहरेदेखील खुलले आहेत. आता तुम्ही जिल्ह्याजिल्ह्यात एकत्रित बैठका घेऊन युतीची ताकद दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा