शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

चौकशीने वनाधिकारी धास्तावले

By admin | Updated: September 6, 2016 04:29 IST

राज्यात १२ हजारांपेक्षा अधिक गावांमधील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या (जेएफएम) बेलगाम कारभाराची वनमंत्र्यांनी चौकशी सुरू केली

अमरावती : राज्यात १२ हजारांपेक्षा अधिक गावांमधील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या (जेएफएम) बेलगाम कारभाराची वनमंत्र्यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे वनाधिकारी हादरून गेले आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी प्रादेशिक वनवृत्तस्तरावर याविषयी माहिती पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. वनमंत्र्यांना वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्यासाठी उपवनसंरक्षक, वनक्षेत्राधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील १० वर्षांपासून ‘जेएफएम’च्या कारभाराचे माहितीवजा शुद्धीकरण करण्याचे ठरविले आहे. ‘जेएफएम’ने केंद्र सरकारचे कोट्यवधींचे अनुदान खर्च केले असून त्याचा हिशेब, ताळमेळ जुळत नसल्याची तक्रार पदोन्नत वनपाल, वनरक्षक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्र्यांनी ‘जेएफएम’ समित्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. वनविभागाच्या नोंदीत राज्यात १२,५०० समित्या आहेत. अतिक्रमणविरहित जमिनी दिल्या असताना त्या वनजमिनींचे नियोजन, व्यवस्थापन करण्यात माघारलेल्या समित्यांना या चौकशीत 'लक्ष्य' करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारचे अनुदान खर्च करताना समितीने नियमानुसार ठराव घेतले नाहीत अथवा वार्षिक आढावा बैठकी घेण्याचे सौजन्य दाखविले नाही, अशा समितींवरकारवाईचे संकेत आहेत.वनाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर समितीचे अध्यक्ष, सचिवांनी बँकेतून पैसे काढले. परंतु ही रक्कम निर्धारित वेळेत खर्च झाली की नाही, ही बाब आवर्जून तपासली जाणार आहे. तसेच वनविभागात मार्चपूर्वी विकासकामांवर निधी खर्च करण्याचा नियम आहे. परंतु हा निधी खर्च झाल्याचे दर्शवून ती रक्कम ‘जेएफएम’ समित्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. हा शुद्ध फसवणुकीचा प्रकार आहे. चौकशी दरम्यान हेदेखील शोधून काढले जाणार आहे. समित्यांना वनजमिनी संरक्षण आणि व्यवस्थापनासाठी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी बहुतांश जमिनींवर अतिक्रमण झाले असताना जुन्याच नोंद असलेल्या जमिनींवर विकासकामे करण्यासाठी निधी खर्च केल्याचा देखावा करणाऱ्या समित्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. वनजमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दा चौकशीत तपासला जाणार आहे. समित्यांनी बोगस व्हाऊचर, बोगस खर्च करून १५ वर्षांत केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये हडपल्याची तक्रार करण्यात आली आहे. समित्यांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपवनसंरक्षकांची असताना याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>संयुक्त वनव्यवस्थापन समित्या या वनाधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण असल्याबाबतची तक्रार मुख्यमंत्री, वनमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. १० वर्षांत या समितीने कोठे व कसा खर्च केला, हे तपासण्याचे सौजन्य उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी दाखविले नाही. समितीचे पदाधिकारी आणि वनाधिकाऱ्यांनी मिलिभगत करून केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये हडप केलेत. याबाबत वनमंत्र्यांनी चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. यातील सत्य लवकरच बाहेर येईल.- दिलीप कापशीकर,केंद्रीय उपाध्यक्ष, पदोन्नत वनपाल, वनरक्षक संघटना.>कागदपत्रांची जुळवाजुळव सुरूवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी वनविभागाला चौकशीचे आदेश दिल्यामुळे समित्यांच्या जुन्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास वेग आला आहे. अमरावती येथे मागील आठवड्यात मुख्य वनसंरक्षकांनी उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांची याअनुषंगाने बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे. समित्यांच्या बोगस कारभाराविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.