शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करावे , दफनभूमीसाठी भूखंड शोधण्याचे सरकारला निर्देश: उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:27 IST

गोरेगाव येथे हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन धर्मीयांच्या स्मशानभूमीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडावर ख्रिश्चन धर्मीयांच्या दफनभूमीसाठी जागा न दिल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारने धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करावे

मुंबई : गोरेगाव येथे हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन धर्मीयांच्या स्मशानभूमीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडावर ख्रिश्चन धर्मीयांच्या दफनभूमीसाठी जागा न दिल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारने धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करावे, असे म्हणत पाच दिवसांत दफनभूमीसाठी पर्यायी भूखंड शोधण्याचे निर्देश सरकारला दिले.धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करण्यास राज्य सरकार बांधील आहे. त्यामुळे श्रद्धा किंवा धार्मिक विश्वासाच्या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही, असे मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाने म्हटले.गोरेगाव येथे दफनभूमीसाठी असलेला राखीव भूखंड डेअरी विकास मंडळाने घेतल्याने ख्रिश्चन चॅरिटेबल इन्स्टिट्युशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेनुसार, दफनभूमीसाठी ७,५०० चौरस मीटर भूखंड मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने कोणतेही योग्य कारण न देता आरक्षण रद्द केले. गोरेगाव येथे हिंदूंच्या स्मशानभूमीसाठी, मुस्लिमांच्या कब्रस्तानासाठी व ख्रिश्चनांच्या दफनभूमीसाठी एकच मोठा भूखंड राखून ठेवण्यात आला होता. त्यापैकी हिंदू व मुस्लिमांच्या स्मशानभूमी व कब्रस्तानासाठी राखीव असलेला भूखंड त्यांना देण्यात आला. मात्र ख्रिश्चनांच्या दफनभूमीसाठी असलेल्या भूखंडाचे आरक्षण रद्द करून डेअरी विकास मंडळाला देण्यात आला. त्याऐवजी अंधेरी येथे २,५०० चौरस मीटर भूखंड देण्यात येणार आहे.त्यावर न्यायालयाने शुक्रवारपर्यंत सरकारला दफनभूमीसाठी पर्यायी भूखंड शोधण्याचे निर्देश दिले. तसेच दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण का रद्द करण्यात आले, याचेही स्पष्टीकरण देण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.हिंदू व मुस्लिमांसाठी राखीव असलेला भूखंड दिलात. मग ख्रिश्चनांसाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण का रद्द केलेत? काय कारण आहे? त्यांची मागणी योग्य आहे. प्रशासन धर्मनिरपेक्ष तत्त्वावर विश्वास ठेवते आणि त्याचे पालन करते, हे प्रशासनाने सिद्ध करावे. एखाद्या विशिष्ट समाजाला अन्य समाजांपेक्षा झुकते माप दिले जाऊ शकत नाही. ‘विविधतेतून एकता’ या तत्त्वावर आम्ही विश्वास ठेवतो,’ असे न्यायालयाने म्हणत या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट