शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करावे , दफनभूमीसाठी भूखंड शोधण्याचे सरकारला निर्देश: उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:27 IST

गोरेगाव येथे हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन धर्मीयांच्या स्मशानभूमीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडावर ख्रिश्चन धर्मीयांच्या दफनभूमीसाठी जागा न दिल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारने धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करावे

मुंबई : गोरेगाव येथे हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन धर्मीयांच्या स्मशानभूमीसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडावर ख्रिश्चन धर्मीयांच्या दफनभूमीसाठी जागा न दिल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारने धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करावे, असे म्हणत पाच दिवसांत दफनभूमीसाठी पर्यायी भूखंड शोधण्याचे निर्देश सरकारला दिले.धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे पालन करण्यास राज्य सरकार बांधील आहे. त्यामुळे श्रद्धा किंवा धार्मिक विश्वासाच्या आधारावर नागरिकांमध्ये भेदभाव केला जाऊ शकत नाही, असे मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाने म्हटले.गोरेगाव येथे दफनभूमीसाठी असलेला राखीव भूखंड डेअरी विकास मंडळाने घेतल्याने ख्रिश्चन चॅरिटेबल इन्स्टिट्युशनने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेनुसार, दफनभूमीसाठी ७,५०० चौरस मीटर भूखंड मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाने कोणतेही योग्य कारण न देता आरक्षण रद्द केले. गोरेगाव येथे हिंदूंच्या स्मशानभूमीसाठी, मुस्लिमांच्या कब्रस्तानासाठी व ख्रिश्चनांच्या दफनभूमीसाठी एकच मोठा भूखंड राखून ठेवण्यात आला होता. त्यापैकी हिंदू व मुस्लिमांच्या स्मशानभूमी व कब्रस्तानासाठी राखीव असलेला भूखंड त्यांना देण्यात आला. मात्र ख्रिश्चनांच्या दफनभूमीसाठी असलेल्या भूखंडाचे आरक्षण रद्द करून डेअरी विकास मंडळाला देण्यात आला. त्याऐवजी अंधेरी येथे २,५०० चौरस मीटर भूखंड देण्यात येणार आहे.त्यावर न्यायालयाने शुक्रवारपर्यंत सरकारला दफनभूमीसाठी पर्यायी भूखंड शोधण्याचे निर्देश दिले. तसेच दफनभूमीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण का रद्द करण्यात आले, याचेही स्पष्टीकरण देण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले.हिंदू व मुस्लिमांसाठी राखीव असलेला भूखंड दिलात. मग ख्रिश्चनांसाठी राखीव असलेल्या भूखंडाचे आरक्षण का रद्द केलेत? काय कारण आहे? त्यांची मागणी योग्य आहे. प्रशासन धर्मनिरपेक्ष तत्त्वावर विश्वास ठेवते आणि त्याचे पालन करते, हे प्रशासनाने सिद्ध करावे. एखाद्या विशिष्ट समाजाला अन्य समाजांपेक्षा झुकते माप दिले जाऊ शकत नाही. ‘विविधतेतून एकता’ या तत्त्वावर आम्ही विश्वास ठेवतो,’ असे न्यायालयाने म्हणत या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMumbai High Courtमुंबई हायकोर्ट