शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कला, क्रीडा विषयांच्या तासिकांवर फुली

By admin | Updated: July 14, 2017 03:55 IST

कला व क्रीडा या विषयांसाठी दरआठवड्याला असलेल्या चार तासिका आता कमी करून दोनवर आणण्यात आल्या आहेत

जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शाळांमध्ये कला व क्रीडा या विषयांसाठी दरआठवड्याला असलेल्या चार तासिका आता कमी करून दोनवर आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा कला व क्रीडा विकास खुंटणार आहे, अशी भीती या विषयांच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.क्रीडा शिक्षिका व प्रशिक्षक लीना मॅथ्यू यांनी सांगितले की, सरकार एकीकडे क्रीडा विषयासाठी गुण देते. दुसरीकडे त्यासाठी असलेल्या तासिका कमी करते. त्यातून सरकारने काय साध्य केले आहे. एखादा विद्यार्थी खेळासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातो, तेव्हा त्याचा दीड महिना वाया जातो. कला विषयासाठी यंदाच्या वर्षी आठ हजार विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. कलेसाठी ग्रेड असतात. ‘सी’ ग्रेडला पाच, ‘बी’ ग्रेडला १० आणि ‘ए’ ग्रेडला १५ गुण मिळतात. जिल्हा पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याला गुण मिळत नाही. त्यात तासिका कमी केल्याने त्याला सरावासाठी वाव व वेळ मिळणार नाही. सम्राट अशोक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गणेश पाटील यांच्या मते, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थी बैठा होईल. त्याला मैदानात पुरेसा वेळ देता येणार नाही. तासिका कमी झाल्याने निरुत्साहाचे वातावरण विद्यार्थीवर्गात आहे. शारीरिक खेळ नसला, तर विद्यार्थ्याच्या निरोगी व निकोप वाढीवर परिणाम होईल. सरस्वती विद्यामंदिरातील क्रीडा शिक्षक अंकुर आहेर यांनी सांगितले की, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थी मैदानावर फारसा जाणार नाही. तो पुस्तकी होईल. त्यातील नेतृत्व गुण विकसित होणार नाहीत. त्यामुळे तासिका कमी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यात बदल होणे अपेक्षित आहेत. डोंबिवलीतील पाटकर शाळेतील क्रीडा शिक्षक गुलाब पाटील सांगितले की, आपण आपला विद्यार्थी आॅलिम्पिक खेळात जाण्याची अपेक्षा ठेवतो. तासिका कमी केल्याने खेळच खेळला जाणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवणार. तासिका कमी करून काय साध्य होणार?टिळकनगर शाळेतील संगीत विषयाच्या शिक्षिका लीना धाणी यांनी सांगितले की, सरकारने वाढीव गुण दिले. पण, दुसरीकडे तासिका कमी केल्या. ज्या वयात विद्यार्थ्याला कलेची आवड निर्माण होते, त्याच वयात तासिका कमी केल्या आहेत. शिवाय, त्यातही विभागणी केली जाणार आहे. संगीतासाठी एक व चित्रकलेसाठी एक असा तास विभागून त्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव होणार नाही. सरकार दरवेळी वेगवेगळे निर्णय घेते. ते निर्णय शिक्षक, विद्यार्थी व पालकांना विश्वासात घेऊन राबवले जात नाहीत, तर चक्क लादले जातात, असेही त्या पुढे म्हणाल्या.>कोणत्या समितीने घेतला निर्णय?कला अध्यापक संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बेंडाळे यांनी सांगितले की, तासिका कमी करण्याची तरतूद शैक्षणिक नियमावलीत नाही. तासिका कमी करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? कोणत्या समितीचा निर्णय सरकारने ग्राह्य धरला आहे. एखाद्या आठवड्यात रविवारच्या सुटीला धरून आणखी दोन सुट्या आल्या, तर आठवड्यात दोन तासही कला व क्रीडा विषयांचे शिक्षण अशक्य आहे. कला शिक्षकांना अतिरिक्त होऊ देणार नाही. गुण देणार, असे सांगून दुसरीकडे तासिका कमी केल्या. या सगळ्या गोष्टी परस्परांशी विसंगत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासाला मारक आहे. कमी केलेल्या तासिकांचा निर्णय सरकारने रद्द करावा.