शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

कला, क्रीडा विषयांच्या तासिकांवर फुली

By admin | Updated: July 14, 2017 03:55 IST

कला व क्रीडा या विषयांसाठी दरआठवड्याला असलेल्या चार तासिका आता कमी करून दोनवर आणण्यात आल्या आहेत

जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शाळांमध्ये कला व क्रीडा या विषयांसाठी दरआठवड्याला असलेल्या चार तासिका आता कमी करून दोनवर आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा कला व क्रीडा विकास खुंटणार आहे, अशी भीती या विषयांच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.क्रीडा शिक्षिका व प्रशिक्षक लीना मॅथ्यू यांनी सांगितले की, सरकार एकीकडे क्रीडा विषयासाठी गुण देते. दुसरीकडे त्यासाठी असलेल्या तासिका कमी करते. त्यातून सरकारने काय साध्य केले आहे. एखादा विद्यार्थी खेळासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातो, तेव्हा त्याचा दीड महिना वाया जातो. कला विषयासाठी यंदाच्या वर्षी आठ हजार विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. कलेसाठी ग्रेड असतात. ‘सी’ ग्रेडला पाच, ‘बी’ ग्रेडला १० आणि ‘ए’ ग्रेडला १५ गुण मिळतात. जिल्हा पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याला गुण मिळत नाही. त्यात तासिका कमी केल्याने त्याला सरावासाठी वाव व वेळ मिळणार नाही. सम्राट अशोक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गणेश पाटील यांच्या मते, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थी बैठा होईल. त्याला मैदानात पुरेसा वेळ देता येणार नाही. तासिका कमी झाल्याने निरुत्साहाचे वातावरण विद्यार्थीवर्गात आहे. शारीरिक खेळ नसला, तर विद्यार्थ्याच्या निरोगी व निकोप वाढीवर परिणाम होईल. सरस्वती विद्यामंदिरातील क्रीडा शिक्षक अंकुर आहेर यांनी सांगितले की, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थी मैदानावर फारसा जाणार नाही. तो पुस्तकी होईल. त्यातील नेतृत्व गुण विकसित होणार नाहीत. त्यामुळे तासिका कमी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यात बदल होणे अपेक्षित आहेत. डोंबिवलीतील पाटकर शाळेतील क्रीडा शिक्षक गुलाब पाटील सांगितले की, आपण आपला विद्यार्थी आॅलिम्पिक खेळात जाण्याची अपेक्षा ठेवतो. तासिका कमी केल्याने खेळच खेळला जाणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवणार. तासिका कमी करून काय साध्य होणार?टिळकनगर शाळेतील संगीत विषयाच्या शिक्षिका लीना धाणी यांनी सांगितले की, सरकारने वाढीव गुण दिले. पण, दुसरीकडे तासिका कमी केल्या. ज्या वयात विद्यार्थ्याला कलेची आवड निर्माण होते, त्याच वयात तासिका कमी केल्या आहेत. शिवाय, त्यातही विभागणी केली जाणार आहे. संगीतासाठी एक व चित्रकलेसाठी एक असा तास विभागून त्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव होणार नाही. सरकार दरवेळी वेगवेगळे निर्णय घेते. ते निर्णय शिक्षक, विद्यार्थी व पालकांना विश्वासात घेऊन राबवले जात नाहीत, तर चक्क लादले जातात, असेही त्या पुढे म्हणाल्या.>कोणत्या समितीने घेतला निर्णय?कला अध्यापक संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बेंडाळे यांनी सांगितले की, तासिका कमी करण्याची तरतूद शैक्षणिक नियमावलीत नाही. तासिका कमी करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? कोणत्या समितीचा निर्णय सरकारने ग्राह्य धरला आहे. एखाद्या आठवड्यात रविवारच्या सुटीला धरून आणखी दोन सुट्या आल्या, तर आठवड्यात दोन तासही कला व क्रीडा विषयांचे शिक्षण अशक्य आहे. कला शिक्षकांना अतिरिक्त होऊ देणार नाही. गुण देणार, असे सांगून दुसरीकडे तासिका कमी केल्या. या सगळ्या गोष्टी परस्परांशी विसंगत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासाला मारक आहे. कमी केलेल्या तासिकांचा निर्णय सरकारने रद्द करावा.