शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कला, क्रीडा विषयांच्या तासिकांवर फुली

By admin | Updated: July 14, 2017 03:55 IST

कला व क्रीडा या विषयांसाठी दरआठवड्याला असलेल्या चार तासिका आता कमी करून दोनवर आणण्यात आल्या आहेत

जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : शाळांमध्ये कला व क्रीडा या विषयांसाठी दरआठवड्याला असलेल्या चार तासिका आता कमी करून दोनवर आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा कला व क्रीडा विकास खुंटणार आहे, अशी भीती या विषयांच्या शिक्षकांनी व्यक्त केली आहे.क्रीडा शिक्षिका व प्रशिक्षक लीना मॅथ्यू यांनी सांगितले की, सरकार एकीकडे क्रीडा विषयासाठी गुण देते. दुसरीकडे त्यासाठी असलेल्या तासिका कमी करते. त्यातून सरकारने काय साध्य केले आहे. एखादा विद्यार्थी खेळासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर जातो, तेव्हा त्याचा दीड महिना वाया जातो. कला विषयासाठी यंदाच्या वर्षी आठ हजार विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. कलेसाठी ग्रेड असतात. ‘सी’ ग्रेडला पाच, ‘बी’ ग्रेडला १० आणि ‘ए’ ग्रेडला १५ गुण मिळतात. जिल्हा पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याला गुण मिळत नाही. त्यात तासिका कमी केल्याने त्याला सरावासाठी वाव व वेळ मिळणार नाही. सम्राट अशोक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गणेश पाटील यांच्या मते, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थी बैठा होईल. त्याला मैदानात पुरेसा वेळ देता येणार नाही. तासिका कमी झाल्याने निरुत्साहाचे वातावरण विद्यार्थीवर्गात आहे. शारीरिक खेळ नसला, तर विद्यार्थ्याच्या निरोगी व निकोप वाढीवर परिणाम होईल. सरस्वती विद्यामंदिरातील क्रीडा शिक्षक अंकुर आहेर यांनी सांगितले की, क्रीडा विषयाच्या तासिका कमी केल्याने विद्यार्थी मैदानावर फारसा जाणार नाही. तो पुस्तकी होईल. त्यातील नेतृत्व गुण विकसित होणार नाहीत. त्यामुळे तासिका कमी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्यात बदल होणे अपेक्षित आहेत. डोंबिवलीतील पाटकर शाळेतील क्रीडा शिक्षक गुलाब पाटील सांगितले की, आपण आपला विद्यार्थी आॅलिम्पिक खेळात जाण्याची अपेक्षा ठेवतो. तासिका कमी केल्याने खेळच खेळला जाणार नाही. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवणार. तासिका कमी करून काय साध्य होणार?टिळकनगर शाळेतील संगीत विषयाच्या शिक्षिका लीना धाणी यांनी सांगितले की, सरकारने वाढीव गुण दिले. पण, दुसरीकडे तासिका कमी केल्या. ज्या वयात विद्यार्थ्याला कलेची आवड निर्माण होते, त्याच वयात तासिका कमी केल्या आहेत. शिवाय, त्यातही विभागणी केली जाणार आहे. संगीतासाठी एक व चित्रकलेसाठी एक असा तास विभागून त्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा सराव होणार नाही. सरकार दरवेळी वेगवेगळे निर्णय घेते. ते निर्णय शिक्षक, विद्यार्थी व पालकांना विश्वासात घेऊन राबवले जात नाहीत, तर चक्क लादले जातात, असेही त्या पुढे म्हणाल्या.>कोणत्या समितीने घेतला निर्णय?कला अध्यापक संघटनेचे अध्यक्ष दिगंबर बेंडाळे यांनी सांगितले की, तासिका कमी करण्याची तरतूद शैक्षणिक नियमावलीत नाही. तासिका कमी करण्यासाठी कोणती समिती नेमली होती? कोणत्या समितीचा निर्णय सरकारने ग्राह्य धरला आहे. एखाद्या आठवड्यात रविवारच्या सुटीला धरून आणखी दोन सुट्या आल्या, तर आठवड्यात दोन तासही कला व क्रीडा विषयांचे शिक्षण अशक्य आहे. कला शिक्षकांना अतिरिक्त होऊ देणार नाही. गुण देणार, असे सांगून दुसरीकडे तासिका कमी केल्या. या सगळ्या गोष्टी परस्परांशी विसंगत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या विकासाला मारक आहे. कमी केलेल्या तासिकांचा निर्णय सरकारने रद्द करावा.