शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

मराठवाड्यात नद्यांना पूर, राज्यातील शेतशिवार भिजले, पावसाचा  जोर काही दिवस कायम राहणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 05:07 IST

औरंगाबाद/ पुणे/ अहमदनगर/ नाशिक/ नागपूर/ कोल्हापूर : मराठवाड्यात ५० पेक्षा अधिक दिवसांपासून दडून बसलेला पाऊस शनिवारपासून परतला आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे नद्यांना पूर आला. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १०४.५५ मिमी. पाऊस झाला.पुणे, सोलापूर व अहमदनगरला चांगला पाऊस झाला. नगरला चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली. ...

औरंगाबाद/ पुणे/ अहमदनगर/ नाशिक/ नागपूर/ कोल्हापूर : मराठवाड्यात ५० पेक्षा अधिक दिवसांपासून दडून बसलेला पाऊस शनिवारपासून परतला आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत रविवारी सकाळपर्यंत सरासरी ६१.७२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे नद्यांना पूर आला. लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १०४.५५ मिमी. पाऊस झाला.पुणे, सोलापूर व अहमदनगरला चांगला पाऊस झाला. नगरला चार तालुक्यांत अतिवृष्टी झाली. सातारा, सांगलीत रिपरिप सुरू होती. खान्देशातही पाऊस परतला आहे. नाशिकलाही पावसाचा जोर असल्याने गंगापूर धरणातून गोदावरी नदीत विसर्ग करण्यात येत आहे. अकोल्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, इतर भाग कोरडा होता.जोर कायम राहणारपुढील तीन-चार दिवस राज्यात अनेक भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. सोमवारी उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.४२१ पैकी १७० मंडळांत अतिवृष्टीऔरंगाबाद (५), जालना (३), परभणी (४), हिंगोली (४), नांदेड (५६), बीड (३५), लातूर (४७), उस्मानाबाद (१६) अशी १७० मंडळांत अतिवृष्टी झाली.रब्बी पिकाला फायदा : मराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४३.१७ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात ५७.५२ टक्के पावसाची नोंद आहे. पाऊस उशिराने झाल्याने खरिपाच्या पेरण्या जवळपास वाया गेल्या आहेत. मात्र आता बरसलेल्या पावसाने चारापाण्याची व्यवस्था होण्याबरोबर रब्बी पिकाला फायदा होईल.