शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
3
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
6
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
7
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
8
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
9
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
10
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
11
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
12
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
13
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
14
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
15
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
16
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
17
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
18
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
19
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
20
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख

नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती

By admin | Updated: August 4, 2016 04:45 IST

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे/मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या महापूरात अडकलेल्या १६ जणांना आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बुधवारी सकाळी पाण्याबाहेर काढले. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पुण्यातही मुठेला पूर आला असून उजनी धरणात पाणीसाठा होऊ लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी, कडवी, कासारी आणि राधानगरी धरणातून विसर्ग होत असल्याने पंचगंगेसह इतर नद्यां धोक्याच्या पातळीवरुन वाहू लागल्या आहे. कृष्णेच्या पातळीत वाढ झाली असून सातारा, सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात महाबळेश्वर येथे तब्बल ४१४ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे़ येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.नाशकात दोघांचा बुडून मृत्यू नाशिक जिल्ह्यात गोदावरीला आलेल्या पूरात आणखी दोघांचा बळी गेला. दोन दिवसांत मृतांची संख्या आठ झाली आहे, तर आणखी तिघा अनोळखी व्यक्तींचे मृतदेह नदीपात्रात सापडल्याने ही संख्या अकरावर पोहोचली. बुधवारी दुपारी चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे दहा वर्षाचा बालक नाल्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाळ विहीर (लोहारवाडी) येथे राहणारे बबन गंगाराम ठाकरे (४०) हे झापामध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी गेले असता वाकी खापरी लघुपाटबंधारे खात्याच्या तलावाच्या पाण्याच्या ओढ्यामुळे बुडून मरण पावले, तर तिसगाव येथे चंदू सुकदेव जुमरे हा दहा वर्षाचा मुलगा आईसोबत लेंडी नाल्यात कपडे धुण्यासाठी गेला असता, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. याशिवाय नाशिक येथे दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह गोदावरीच्या पुरात वाहून आले आहेत. बागलाण तालुक्यातील किकवारी येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पुरात सापडला. औरंगाबादमध्ये स्थलांतरपूर परिस्थितीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेकडो लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. एनडीआरएफची एक तुकडी वैजापूरकडे रवाना झाली असून या तुकडीत २५ जवान व तीन बोटींचा समावेश आहे. आतापर्यंत वैजापूर तालुक्यातील १२ गावांमधील ३८६ कुटुंबांमधील २ हजार ८७३, तर गंगापूर तालुक्यातील तीन गावांमधील ७६ कुटुंबांमधील ३४८ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील १३०, हैबतपूर येथील ८, अंमळनेर येथील २१० व्यक्तींचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. १५०० लोकांना हलविलेडोणगावातील दीड हजार तर बाबतारा येथील १२५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाखगंगा येथील रस्ता बंद झाला असून १५० व्यक्तींचे स्थलांतर केले आहे. पूरणगावचीही अशीच परिस्थिती असल्याने तेथील २०० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. चांदेगाव ८, बाजाठाणच्या १२५, नागमठाणच्या १५०, वांजरगावच्या ४५०, नांदूरढोकच्या ३५, सावखेडगंगाच्या ४० आणि बाभूळगावच्या ५० गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे.पुण्यात भिडे पूल पाण्याखालीपुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून तब्बल ४० हजार क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे मुठा नदीने बुधवारी धोक्याची पातळी ओलांडली. सिंहगड रस्त्यावर चार सोसायट्यांमध्ये पाणी घुसले तर दत्तवाडी मधील नदीकाठच्या काही घरांमध्येही पाणी घुसले. बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांचा पाणीसाठा अवघ्या २४ तासात तब्बल साडेचार टीएमसीने वाढला. कोयनेत चार टीएमसीने वाढसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर अनेक पूल सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली गेल्याने दळवळण ठप्प झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात चोवीस तासांमध्ये ४ टीएमसीने वाढ होऊन ७२.३० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे उघडलेकोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घटप्रभा, कुंभी, कडवी, कासारी, राधानगरी या धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.