शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती

By admin | Updated: August 4, 2016 04:45 IST

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे/मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या महापूरात अडकलेल्या १६ जणांना आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बुधवारी सकाळी पाण्याबाहेर काढले. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पुण्यातही मुठेला पूर आला असून उजनी धरणात पाणीसाठा होऊ लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी, कडवी, कासारी आणि राधानगरी धरणातून विसर्ग होत असल्याने पंचगंगेसह इतर नद्यां धोक्याच्या पातळीवरुन वाहू लागल्या आहे. कृष्णेच्या पातळीत वाढ झाली असून सातारा, सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात महाबळेश्वर येथे तब्बल ४१४ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे़ येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.नाशकात दोघांचा बुडून मृत्यू नाशिक जिल्ह्यात गोदावरीला आलेल्या पूरात आणखी दोघांचा बळी गेला. दोन दिवसांत मृतांची संख्या आठ झाली आहे, तर आणखी तिघा अनोळखी व्यक्तींचे मृतदेह नदीपात्रात सापडल्याने ही संख्या अकरावर पोहोचली. बुधवारी दुपारी चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे दहा वर्षाचा बालक नाल्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाळ विहीर (लोहारवाडी) येथे राहणारे बबन गंगाराम ठाकरे (४०) हे झापामध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी गेले असता वाकी खापरी लघुपाटबंधारे खात्याच्या तलावाच्या पाण्याच्या ओढ्यामुळे बुडून मरण पावले, तर तिसगाव येथे चंदू सुकदेव जुमरे हा दहा वर्षाचा मुलगा आईसोबत लेंडी नाल्यात कपडे धुण्यासाठी गेला असता, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. याशिवाय नाशिक येथे दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह गोदावरीच्या पुरात वाहून आले आहेत. बागलाण तालुक्यातील किकवारी येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पुरात सापडला. औरंगाबादमध्ये स्थलांतरपूर परिस्थितीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेकडो लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. एनडीआरएफची एक तुकडी वैजापूरकडे रवाना झाली असून या तुकडीत २५ जवान व तीन बोटींचा समावेश आहे. आतापर्यंत वैजापूर तालुक्यातील १२ गावांमधील ३८६ कुटुंबांमधील २ हजार ८७३, तर गंगापूर तालुक्यातील तीन गावांमधील ७६ कुटुंबांमधील ३४८ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील १३०, हैबतपूर येथील ८, अंमळनेर येथील २१० व्यक्तींचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. १५०० लोकांना हलविलेडोणगावातील दीड हजार तर बाबतारा येथील १२५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाखगंगा येथील रस्ता बंद झाला असून १५० व्यक्तींचे स्थलांतर केले आहे. पूरणगावचीही अशीच परिस्थिती असल्याने तेथील २०० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. चांदेगाव ८, बाजाठाणच्या १२५, नागमठाणच्या १५०, वांजरगावच्या ४५०, नांदूरढोकच्या ३५, सावखेडगंगाच्या ४० आणि बाभूळगावच्या ५० गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे.पुण्यात भिडे पूल पाण्याखालीपुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून तब्बल ४० हजार क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे मुठा नदीने बुधवारी धोक्याची पातळी ओलांडली. सिंहगड रस्त्यावर चार सोसायट्यांमध्ये पाणी घुसले तर दत्तवाडी मधील नदीकाठच्या काही घरांमध्येही पाणी घुसले. बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांचा पाणीसाठा अवघ्या २४ तासात तब्बल साडेचार टीएमसीने वाढला. कोयनेत चार टीएमसीने वाढसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर अनेक पूल सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली गेल्याने दळवळण ठप्प झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात चोवीस तासांमध्ये ४ टीएमसीने वाढ होऊन ७२.३० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे उघडलेकोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घटप्रभा, कुंभी, कडवी, कासारी, राधानगरी या धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.