शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती

By admin | Updated: August 4, 2016 04:45 IST

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे/मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या महापूरात अडकलेल्या १६ जणांना आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बुधवारी सकाळी पाण्याबाहेर काढले. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पुण्यातही मुठेला पूर आला असून उजनी धरणात पाणीसाठा होऊ लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी, कडवी, कासारी आणि राधानगरी धरणातून विसर्ग होत असल्याने पंचगंगेसह इतर नद्यां धोक्याच्या पातळीवरुन वाहू लागल्या आहे. कृष्णेच्या पातळीत वाढ झाली असून सातारा, सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात महाबळेश्वर येथे तब्बल ४१४ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे़ येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.नाशकात दोघांचा बुडून मृत्यू नाशिक जिल्ह्यात गोदावरीला आलेल्या पूरात आणखी दोघांचा बळी गेला. दोन दिवसांत मृतांची संख्या आठ झाली आहे, तर आणखी तिघा अनोळखी व्यक्तींचे मृतदेह नदीपात्रात सापडल्याने ही संख्या अकरावर पोहोचली. बुधवारी दुपारी चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे दहा वर्षाचा बालक नाल्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाळ विहीर (लोहारवाडी) येथे राहणारे बबन गंगाराम ठाकरे (४०) हे झापामध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी गेले असता वाकी खापरी लघुपाटबंधारे खात्याच्या तलावाच्या पाण्याच्या ओढ्यामुळे बुडून मरण पावले, तर तिसगाव येथे चंदू सुकदेव जुमरे हा दहा वर्षाचा मुलगा आईसोबत लेंडी नाल्यात कपडे धुण्यासाठी गेला असता, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. याशिवाय नाशिक येथे दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह गोदावरीच्या पुरात वाहून आले आहेत. बागलाण तालुक्यातील किकवारी येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पुरात सापडला. औरंगाबादमध्ये स्थलांतरपूर परिस्थितीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेकडो लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. एनडीआरएफची एक तुकडी वैजापूरकडे रवाना झाली असून या तुकडीत २५ जवान व तीन बोटींचा समावेश आहे. आतापर्यंत वैजापूर तालुक्यातील १२ गावांमधील ३८६ कुटुंबांमधील २ हजार ८७३, तर गंगापूर तालुक्यातील तीन गावांमधील ७६ कुटुंबांमधील ३४८ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील १३०, हैबतपूर येथील ८, अंमळनेर येथील २१० व्यक्तींचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. १५०० लोकांना हलविलेडोणगावातील दीड हजार तर बाबतारा येथील १२५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाखगंगा येथील रस्ता बंद झाला असून १५० व्यक्तींचे स्थलांतर केले आहे. पूरणगावचीही अशीच परिस्थिती असल्याने तेथील २०० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. चांदेगाव ८, बाजाठाणच्या १२५, नागमठाणच्या १५०, वांजरगावच्या ४५०, नांदूरढोकच्या ३५, सावखेडगंगाच्या ४० आणि बाभूळगावच्या ५० गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे.पुण्यात भिडे पूल पाण्याखालीपुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून तब्बल ४० हजार क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे मुठा नदीने बुधवारी धोक्याची पातळी ओलांडली. सिंहगड रस्त्यावर चार सोसायट्यांमध्ये पाणी घुसले तर दत्तवाडी मधील नदीकाठच्या काही घरांमध्येही पाणी घुसले. बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांचा पाणीसाठा अवघ्या २४ तासात तब्बल साडेचार टीएमसीने वाढला. कोयनेत चार टीएमसीने वाढसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर अनेक पूल सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली गेल्याने दळवळण ठप्प झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात चोवीस तासांमध्ये ४ टीएमसीने वाढ होऊन ७२.३० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे उघडलेकोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घटप्रभा, कुंभी, कडवी, कासारी, राधानगरी या धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.