शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती

By admin | Updated: August 4, 2016 04:45 IST

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे/मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या महापूरात अडकलेल्या १६ जणांना आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बुधवारी सकाळी पाण्याबाहेर काढले. खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पुण्यातही मुठेला पूर आला असून उजनी धरणात पाणीसाठा होऊ लागला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी, कडवी, कासारी आणि राधानगरी धरणातून विसर्ग होत असल्याने पंचगंगेसह इतर नद्यां धोक्याच्या पातळीवरुन वाहू लागल्या आहे. कृष्णेच्या पातळीत वाढ झाली असून सातारा, सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासात महाबळेश्वर येथे तब्बल ४१४ मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे़ येत्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.नाशकात दोघांचा बुडून मृत्यू नाशिक जिल्ह्यात गोदावरीला आलेल्या पूरात आणखी दोघांचा बळी गेला. दोन दिवसांत मृतांची संख्या आठ झाली आहे, तर आणखी तिघा अनोळखी व्यक्तींचे मृतदेह नदीपात्रात सापडल्याने ही संख्या अकरावर पोहोचली. बुधवारी दुपारी चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे दहा वर्षाचा बालक नाल्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाळ विहीर (लोहारवाडी) येथे राहणारे बबन गंगाराम ठाकरे (४०) हे झापामध्ये ठेवलेले सामान आणण्यासाठी गेले असता वाकी खापरी लघुपाटबंधारे खात्याच्या तलावाच्या पाण्याच्या ओढ्यामुळे बुडून मरण पावले, तर तिसगाव येथे चंदू सुकदेव जुमरे हा दहा वर्षाचा मुलगा आईसोबत लेंडी नाल्यात कपडे धुण्यासाठी गेला असता, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. याशिवाय नाशिक येथे दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह गोदावरीच्या पुरात वाहून आले आहेत. बागलाण तालुक्यातील किकवारी येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह पुरात सापडला. औरंगाबादमध्ये स्थलांतरपूर परिस्थितीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यांतील शेकडो लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. एनडीआरएफची एक तुकडी वैजापूरकडे रवाना झाली असून या तुकडीत २५ जवान व तीन बोटींचा समावेश आहे. आतापर्यंत वैजापूर तालुक्यातील १२ गावांमधील ३८६ कुटुंबांमधील २ हजार ८७३, तर गंगापूर तालुक्यातील तीन गावांमधील ७६ कुटुंबांमधील ३४८ व्यक्तींना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथील १३०, हैबतपूर येथील ८, अंमळनेर येथील २१० व्यक्तींचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आले आहे. १५०० लोकांना हलविलेडोणगावातील दीड हजार तर बाबतारा येथील १२५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाखगंगा येथील रस्ता बंद झाला असून १५० व्यक्तींचे स्थलांतर केले आहे. पूरणगावचीही अशीच परिस्थिती असल्याने तेथील २०० व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. चांदेगाव ८, बाजाठाणच्या १२५, नागमठाणच्या १५०, वांजरगावच्या ४५०, नांदूरढोकच्या ३५, सावखेडगंगाच्या ४० आणि बाभूळगावच्या ५० गावकऱ्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे.पुण्यात भिडे पूल पाण्याखालीपुणे शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण १०० टक्के भरल्याने धरणातून तब्बल ४० हजार क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे मुठा नदीने बुधवारी धोक्याची पातळी ओलांडली. सिंहगड रस्त्यावर चार सोसायट्यांमध्ये पाणी घुसले तर दत्तवाडी मधील नदीकाठच्या काही घरांमध्येही पाणी घुसले. बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांचा पाणीसाठा अवघ्या २४ तासात तब्बल साडेचार टीएमसीने वाढला. कोयनेत चार टीएमसीने वाढसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर अनेक पूल सलग दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली गेल्याने दळवळण ठप्प झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात चोवीस तासांमध्ये ४ टीएमसीने वाढ होऊन ७२.३० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>‘राधानगरी’चे पाच स्वयंचलित दरवाजे उघडलेकोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घटप्रभा, कुंभी, कडवी, कासारी, राधानगरी या धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून वारणा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.