शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीत घोळ; आमदार मुश्रीफांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2019 11:25 IST

पूर ओसरल्यानंतर जी शासकीय मदत मिळायला हवी होती, त्यात सरकारी अधिकाऱ्यांनी घोळ घालून ठेवला आहे.

मुंबई – सांगली,कोलाह्पूर आणि साताऱ्यात आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. एकट्या सांगली जिल्ह्यात महापुरामुळे विविध क्षेत्रांतील नुकसान अंदाजे चार हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आता पूरग्रस्तांना सरकारच्या मदतीची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत नसून, पूरग्रस्तांना मदत मिळत नाही. तर शासकीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीतच घोळ घातला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र यात मोठ्याप्रमाणात नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक कुटुंब अक्षरशा रस्तावर आले आहेत. तर अनेकांच्या  घरातील सामन वाहून गेले आहेत. तर या भागातील पूरग्रस्तांना सरकारी मदत देण्याचे आश्वासने सरकार कडून देण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र सरकरी मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचत नसल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला आहे.

पूर ओसरल्यानंतर जी शासकीय मदत मिळायला हवी होती, त्यात सरकारी अधिकाऱ्यांनी घोळ घालून ठेवला आहे. तसेच पूरग्रस्तांना मिळणाऱ्या नुकसानभरपाई यादीत सुद्धा घोळ करण्यात आला असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. तसेच वेळेवर मदत तर मिळाली नाही, पण आता जी मदत दिली जात आहे. ती सुद्धा योग्य लोकांपर्यंत पोहचत नसून, भलत्याच लोकांना मिळत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी मुश्रीफ यांनी केला आहे.