शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

तलाव क्षेत्रात मुसळधार, २४ तासांत ३६ दिवसांचा जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 16:49 IST

गेला वीकेण्ड चिंब करणाऱ्या पावसाने यावेळीसही तलाव क्षेत्रात रविवारचा मुहूर्त गाठला़ अन् अवघ्या २४ तासांमध्ये ३६ दिवसांचा जलसाठा तलाव क्षेत्रांमध्ये वाढला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 - गेला वीकेण्ड चिंब करणाऱ्या पावसाने यावेळीही तलाव क्षेत्रात रविवारचा मुहूर्त गाठला़ अन् अवघ्या २४ तासांमध्ये ३६ दिवसांचा जलसाठा तलाव क्षेत्रांमध्ये वाढला आहे़ गतवर्षीच्या तुलनेत या तारखेला जलसाठ्यात दोन लाख दशलक्ष लीटर्सने वाढ झाली आहे़ म्हणजेच एकूण गरजेच्या ३५ टक्के पाणी तलावांमध्ये जमा झाले आहे़गेल्या वर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे आॅगस्ट २०१५ पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात आहे़ त्यातच जून महिना कोरडा गेल्यामुळे यावर्षीही पाणीबाणीची भीती व्यक्त होत होती़ मात्र जुलै महिन्यात तलाव क्षेत्रावर पावसाने कृपादृष्टी दाखविली आहे़ विशेष म्हणजे प्रत्येक वीकेण्डला पर्यटकांप्रमाणे पाऊसही तलाव क्षेत्रामध्ये हजेरी लावू लागला आहे़रविवारी सकाळी ६ पर्यंत मिळालेल्या तलावांमधील पाण्याची स्थितीनुसार ५० ते ६० हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला होता़ तर आज सकाळी मिळालेल्या तलावांच्या पातळीनुसार गेल्या २४ तासांत तलाव क्षेत्रांमध्ये तब्बल एक लाख ३५ हजार दशलक्ष लीटरने जलसाठा वाढला आहे़ आज दिवसभरही पावसाची हजेरी मुसळधार असल्याने जलसाठा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत़ जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये तलाव                कमाल        किमान     आजची स्थिती       आजचा पाऊस(मि़मी़)मोडक सागर     १६३़१५         १४३़२६           १५२़४२              ८४़४०तानसा             १२८़६३         ११८़८७           १२३़८९              ४०़४०विहार                 ८०़१२           ७३़९२             ७७़१९             २१़४०तुळशी              १३९़१७         १३१़०७           १३८़७८              २०़००अप्पर वैतरणा    ६०३़५१        ५९५़४४          ५९७़११              १८२़००भातसा             १४२़०७         १०४़९०           १२२़२७              २८़००मध्य वैतरणा       २८५़००         २२०़००            २५९़६०           १०६़९०एकूण                 २०१६ -      ५०३०६९      दशलक्ष लीटर                          २०१५-       २९८२३८     दशलक्ष लीटर* मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ * गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़* मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़