शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

मुंबईचा सागरीमार्ग मोकळा

By admin | Updated: June 9, 2015 04:37 IST

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करू शकणाऱ्या एवढेच नव्हे, तर आंतराष्ट्रीय तंत्रकौशल्याचा नमुना ठरेल अशा ‘मुंबई कोस्टल रोड'ला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी तत्त्वत: मंजुरी दिली.

नवी दिल्ली : मुंबईकरांचा प्रवास सुखकर करू शकणाऱ्या एवढेच नव्हे, तर आंतराष्ट्रीय तंत्रकौशल्याचा नमुना ठरेल अशा ‘मुंबई सागरी किनारपट्टी रस्ते बांधणी प्रकल्पाला’ (कोस्टल रोड) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी तत्त्वत: मंजुरी दिली. आॅगस्टनंतर शक्य तेवढ्या जलदगतीने हा रस्ता पूर्ण करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुमारे ३५.६ किलोमीटरच्या किनारपट्टीला लागून असलेल्या या रस्त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता उपनगरांतील विविध भागांना १८ लहान रस्त्यांनी जोडेल. खार ते वर्सोव्यापर्यंत हा रस्ता भुयारी असेल. १५ जूनला ड्राफ्ट नोटिफिकेशन करण्यात येणार असून, १५ आॅगस्टपर्यंत अंतिम नोटिफिकेशन करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत ९१ हेक्टर जमीन हरित क्षेत्र करणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील सागरी मार्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतूकीचा ताण मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सध्या मुंबईतील ६० टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावरून होते. सागरी मार्गामुळे या वाहतुकीचा ताण कमी होईल. पर्यावरणाचे संतुलन राखत या प्रकल्पांतर्गत मुंबईत ९१ हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. समुद्राच्या भरतीच्या लाटा वाढणार नाहीत याची दक्षता राज्य सरकार घेणार आहे. राजधानीतील पर्यावरण भवनात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त यु.एस.मदान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)—————पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून मुंबईकरांना ही भेट आहे. मागील आघाडीच्या सरकारने कोस्टल रोडबाबत पाच वर्षे नुसतीच आश्वासने दिली, पण आमच्या सरकारने पाच महिन्यातं याला मंजुरी दिली. कोस्टल रोड प्रकल्पावर मंत्रालयाची भूमिका सकारात्मक होती. यामुळे मुंबईतील वाहतूकीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री----------------पर्यावरण रक्षणासाठी मुंबई सागरी मार्ग महत्वाचा : जावडेकरदेशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबई सागरी मार्ग महत्वाचा असून नियम कायदे व पर्यावरणाची काळजी घेऊन येत्या आठवडाभरात मुंबई सागरी मार्गाबाबत प्रस्तावित अध्यादेश आणू. त्यानंतर काही सूचना आल्या तर त्याचे निराकरण करून अंतिम अध्यादेश काढण्यात येईल. सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीचा ताण व प्रदूषण कमी होईल तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल.- प्रकाश जावडेकरकेंद्रीय पर्यावरण, वने राज्यमंत्री——————असा असेल सागरीमार्ग...> कांदिवली ते नरिमन पॉइंटपर्यंतचा ३५.६ किलोमीटरचा मार्ग> ४२ हेक्टर समुद्रात भराव> १० हजार कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित> उपनगरांतील विविध भागांना १८ लहान रस्त्यांनी जोडणार> नेदरलॅण्ड सरकारशी तांत्रिक करार> पाच ते सहा वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार> ९१ टक्के हरित क्षेत्र निर्मितीस वाव> सागरीमार्गात दोन ठिकाणी आंतरसमुद्री बोगदा तयार करण्यात येईल.> या प्रकल्पांतर्गत उद्यान, हरित क्षेत्र, खेळाचे मैदान तयार करण्यात येणार