शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
4
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
5
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
6
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
7
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
8
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
9
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
10
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
11
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
12
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
13
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
14
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
15
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
16
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
18
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
19
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
20
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार

मुंबईचा सागरीमार्ग मोकळा

By admin | Updated: June 9, 2015 04:37 IST

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करू शकणाऱ्या एवढेच नव्हे, तर आंतराष्ट्रीय तंत्रकौशल्याचा नमुना ठरेल अशा ‘मुंबई कोस्टल रोड'ला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी तत्त्वत: मंजुरी दिली.

नवी दिल्ली : मुंबईकरांचा प्रवास सुखकर करू शकणाऱ्या एवढेच नव्हे, तर आंतराष्ट्रीय तंत्रकौशल्याचा नमुना ठरेल अशा ‘मुंबई सागरी किनारपट्टी रस्ते बांधणी प्रकल्पाला’ (कोस्टल रोड) केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सोमवारी तत्त्वत: मंजुरी दिली. आॅगस्टनंतर शक्य तेवढ्या जलदगतीने हा रस्ता पूर्ण करण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. सुमारे ३५.६ किलोमीटरच्या किनारपट्टीला लागून असलेल्या या रस्त्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता उपनगरांतील विविध भागांना १८ लहान रस्त्यांनी जोडेल. खार ते वर्सोव्यापर्यंत हा रस्ता भुयारी असेल. १५ जूनला ड्राफ्ट नोटिफिकेशन करण्यात येणार असून, १५ आॅगस्टपर्यंत अंतिम नोटिफिकेशन करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत ९१ हेक्टर जमीन हरित क्षेत्र करणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबईतील सागरी मार्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतूकीचा ताण मोठया प्रमाणात कमी होणार आहे. सध्या मुंबईतील ६० टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावरून होते. सागरी मार्गामुळे या वाहतुकीचा ताण कमी होईल. पर्यावरणाचे संतुलन राखत या प्रकल्पांतर्गत मुंबईत ९१ हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. समुद्राच्या भरतीच्या लाटा वाढणार नाहीत याची दक्षता राज्य सरकार घेणार आहे. राजधानीतील पर्यावरण भवनात झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त यु.एस.मदान, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)—————पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून मुंबईकरांना ही भेट आहे. मागील आघाडीच्या सरकारने कोस्टल रोडबाबत पाच वर्षे नुसतीच आश्वासने दिली, पण आमच्या सरकारने पाच महिन्यातं याला मंजुरी दिली. कोस्टल रोड प्रकल्पावर मंत्रालयाची भूमिका सकारात्मक होती. यामुळे मुंबईतील वाहतूकीची समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री----------------पर्यावरण रक्षणासाठी मुंबई सागरी मार्ग महत्वाचा : जावडेकरदेशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने मुंबई सागरी मार्ग महत्वाचा असून नियम कायदे व पर्यावरणाची काळजी घेऊन येत्या आठवडाभरात मुंबई सागरी मार्गाबाबत प्रस्तावित अध्यादेश आणू. त्यानंतर काही सूचना आल्या तर त्याचे निराकरण करून अंतिम अध्यादेश काढण्यात येईल. सागरी मार्गामुळे मुंबईतील वाहतुकीचा ताण व प्रदूषण कमी होईल तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल.- प्रकाश जावडेकरकेंद्रीय पर्यावरण, वने राज्यमंत्री——————असा असेल सागरीमार्ग...> कांदिवली ते नरिमन पॉइंटपर्यंतचा ३५.६ किलोमीटरचा मार्ग> ४२ हेक्टर समुद्रात भराव> १० हजार कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित> उपनगरांतील विविध भागांना १८ लहान रस्त्यांनी जोडणार> नेदरलॅण्ड सरकारशी तांत्रिक करार> पाच ते सहा वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार> ९१ टक्के हरित क्षेत्र निर्मितीस वाव> सागरीमार्गात दोन ठिकाणी आंतरसमुद्री बोगदा तयार करण्यात येईल.> या प्रकल्पांतर्गत उद्यान, हरित क्षेत्र, खेळाचे मैदान तयार करण्यात येणार