शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

पंचरंगी आखाडा

By admin | Updated: October 2, 2014 02:51 IST

बुधवारी अखेरच्या दिवशी राज्यातील 288 मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, काही अपवाद वगळता सर्वत्र पंचरंगी सामने होत आहेत.

निवडणुकीचे चित्र स्पष्ट : राष्ट्रवादीचे डावपेच अंगलट, ‘स्वाभिमानी’ला बंडखोरीचा फटका
मुंबई/कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या आज, बुधवारी अखेरच्या दिवशी राज्यातील 288 मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, काही अपवाद वगळता सर्वत्र पंचरंगी सामने होत आहेत. काही मतदारसंघांमध्ये अधिकृत उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेऊन राजकीय पक्षांची चांगलीच अडचण केली. 
द. महाराष्ट्रात निवडून आणण्यापेक्षा पाडापाडीचेच डावपेच आखले गेले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नेते, मंत्री आणि विद्यमान आमदारांना अडचणीत आणण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणाला पाडायचे, याचीच जोरदार आखणी केली गेली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने उमेदवार मागे घेणो आणि काही ठिकाणी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यासारखे अनपेक्षित प्रकार घडले आहेत. 
दक्षिण क:हाड मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी राष्ट्रवादीने डावपेच केले, मात्र ते त्यांच्यावरच उलटले. राष्ट्रवादीने क:हाडचे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांना उमेदवारी दिली होती. मात्र शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विलासकाका पाटील-उंडाळकर यांना पाठिंबा देण्याचे फर्मान पक्षाने सोडले. याची कुणकुण लागताच नाराज झालेल्या 
राजेंद्र यादव यांनी चव्हाण यांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीला उमेदवारच राहिला नाही. त्यामुळे रात्री उशिरा उंडाळकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घ्यावा लागला. (विशेष प्रतिनिधी)
 
राजू शेट्टींचे उमेदवार अडचणीत
खासदार राजू शेट्टी यांच्या मतदारसंघात स्वाभिमानी पक्षच अनेक ठिकाणी अडचणीत आला आहे. शिरोळमध्ये स्वाभिमानीचे उमेदवार अनिल मादनाईक यांच्याविरोधात बंड करून शिवसेनेचे उल्हास पाटील यांना राष्ट्रवादी तसेच काँग्रेसमधील काही गटांनी पाठिंबा दिला आहे. 
 
राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांचा त्यामध्ये समावेश आहे. स्वाभिमानीचा दबदबा असलेल्या कर्नाटक सीमेवरील चंदगड मतदारसंघात सर्वच पक्षांना बंडखोरीला सामोरे जावे लागले आहे. पक्षाचे उमेदवार राजेंद्र गड्डय़ान्नावर यांच्याविरोधात तालुकाध्यक्ष नितीन पाटील यांनी बंडखोरी केली आहे. 
 
जयंत पाटलांविरुद्ध विरोधकांची एकी
सांगली जिल्ह्यात इस्लामपूर मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात एकच उमेदवार देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि स्वाभिमानी यांनी मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात काँग्रेसवगळता सर्व पक्ष एकत्र आले असून, स्वाभिमानीचे अभिजित पाटील यांना सर्वानी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे भीमराव माने, भाजपाचे विक्रम पाटील, अपक्ष नानासाहेब महाडिक  आदींनी अभिजित पाटील यांच्यासाठी माघार घेतली.
 
राज यांची सभा न मिळाल्याने माघार
जिंतूर (जि.परभणी) मतदारसंघातील मनसेचे उमेदवार खंडेराव आघाव यांनी राज ठाकरे यांची सभा न मिळाल्याने निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.
डॉ. भांडे यांचाही काढता पाय
अकोला पूर्व मतदारसंघातून माजी मंत्री डॉ. दशरथ 
भांडे यांनी भारिप-बहुजन महासंघाचे तिकीट न मिळाल्याने निवडणुकीतून काढता पाय घेतली.
सेनेच्या राजूल पटेल मैदानाबाहेरच
सेनेच्या वर्सोव्यातील उमेदवार राजूल पटेल यांचा 
अर्ज आयोगाने रद्द ठरवल्यानंतर हाय कोर्टाने यात हस्तक्षेपास नकार दिला़ त्या मैदानाबाहेरच राहतील.
 
भाजपाविरुद्ध बंड : तासगावमध्ये स्वाभिमानीचे प्रवक्ते महेश खराडे हे भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध बंड करून शिवसेनेकडून रिंग्ांणात आहेत, तर पलूस-कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्याविरोधात भाजपाचे पृथ्वीराज देशमुख व स्वाभिमानीचे संदीप राजोबा या दोघांनीही रिंग्ांणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.