शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

महाराष्ट्रातून पाचच रणरागिणी लोकसभेवर

By admin | Updated: May 24, 2014 03:27 IST

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातून निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवारांपैकी केवळ पाच महिला या निवडणुकीत लोकसभेवर गेल्या आहेत

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातून निवडणूक लढविणार्‍या महिला उमेदवारांपैकी केवळ पाच महिला या निवडणुकीत लोकसभेवर गेल्या आहेत. राज्यभरातून निवडणूक लढविणार्‍या तब्बल ८९७ उमेदवारांमध्ये केवळ ५८ महिला उमेदवारांचा समावेश होता. मात्र गत लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी वाढ झाली आहे. २००९च्या लोकसभेत केवळ ३ महिलांनी संसदेत प्रवेश मिळविला होता. या वेळी हा आकडा ५ झाला आहे. यामध्ये भाजपाच्या पूनम महाजन, हीना गावित, रक्षा खडसे, शिवसेनेच्या भावना गवळी आणि राष्टÑवादीच्या सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाचही महिला या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. पूनम महाजन या दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे या राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. हीना गावित यांचे वडील विजयकुमार गावित हे महाराष्टÑाचे माजी मंत्री आहेत. हीना गावित यांनी नऊ वेळा खासदार असलेले काँग्रेसचे माणिकराव गावित यांचा पराभव केला. रक्षा खडसे या विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत; तर भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव हे माजी खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन महिलांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यात सुप्रिया सुळे (४४) या विजयी झाल्या; पण त्यादेखील २००९च्या तुलनेत कमी फरकाने विजयी झाल्या. लोकसभा तसेच सर्व राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण सुचविणारे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत प्रलंबित आहे. हे विधेयक राज्यसभेत ९ मार्च २०१०लाच संमत झाले आहे.