शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

पाच कैदी पळाले!

By admin | Updated: April 1, 2015 04:26 IST

राज्यात सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहातून पाच खतरनाक कैद्यांनी पलायन केल्याचे मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या

नागपूर : राज्यात सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहातून पाच खतरनाक कैद्यांनी पलायन केल्याचे मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आले़ बराकीवरील खिडकीचे लोखंडी गज कापून ते पळून गेल्याने कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांना पकडण्यास सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. ठिकठिकाणी पोलीस पथके रवाना करण्यात आली, मात्र रात्री उशिरापर्यंत एकालाही पकडण्यात आले नव्हते़ दरम्यान, तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केली. बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्य प्रदेश), शिबू ऊर्फ मोहंमद शोएब सलीम खान (वय २४, रा. मानकापूर), सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (२५, रा. कामठी, नागपूर), प्रेम ऊर्फ नेपाली शालीकराम खत्री (२४, रा. नेपाळ) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (२३, रा. नागपूर) अशी फरार कैद्यांची नावे आहेत़ बिशनसिंग, शिब्बू आणि सत्येंद्र या तिघांविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली असून, नेपाली हा हत्यार कायद्यांतर्गत कारागृहात बंद होता. गोलू ठाकूर हा काही दिवसांपूर्वीच पकडला गेला होता. हे पाचही कैदी कारागृहाच्या बराक क्रमांक ६ मध्ये १५४ कैद्यांसोबत बंदिस्त होते. या पाचही जणांनी मंगळवारी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान बराकीच्या वर असलेल्या खिडकीचा लोखंडी गज कापून बाहेर आले़ त्यानंतर बराकीभोवती असलेली सुमारे १२ फूट आणि त्यानंतर २३ फूट उंच असलेली भिंत चढून हे सर्व कैदी फरार झाले़ (प्रतिनिधी)> वरिष्ठांचे दुर्लक्षच !मध्यवर्ती कारागृहात अनेक वर्षांपासून मोबाइलचा वापर केला जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ मात्र कारागृह प्रशासनाच्या मुंबई, पुण्यातील वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल न घेतल्यानेच मंगळवारची ही घटना घडल्याचे सिद्ध झाले़