शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

रामनाथ सोनावणेंसह पाच जण अडचणीत?

By admin | Updated: June 5, 2017 05:07 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या मानसिक छळवणुकीचा प्रकार समोर आला होता.

प्रशांत माने । लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या मानसिक छळवणुकीचा प्रकार समोर आला होता. आता त्या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीत तथ्य असल्याची बाब महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या तपशिलावरून उघड झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी तत्कालीन उपायुक्तांसह अन्य पाच जणांवर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. १९९८ मध्ये घडलेल्या जकात पावती फेरफार प्रकरणात आपला मानसिक छळ करून आर्थिक नुकसान केल्याचा आरोप विनायक लक्ष्मण गोडे या कर्मचाऱ्याने केला होता. याप्रकरणी तत्कालीन उपायुक्त रामनाथ सोनवणे, विनय कुलकर्णी, शांतिलाल राठोड, सच्चिदानंद कुलकर्णी, अनिल लाड, सुनील बागुल यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्याचबरोबर ठाणे पोलीस आयुक्तांकडेही तक्रार करत संबंधित अधिकाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटींतर्गत गुन्हे नोंदवण्याची मागणी केली. मात्र, केडीएमसी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने गोडे यांनी अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे धाव घेतली. आदिवासी विकास मंत्रालयानेही २७ जानेवारी २०१७ रोजी त्यांच्या तक्रारीची दखल घेत केडीएमसीकडे अहवाल मागितला. यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने मागितलेल्या चौकशी अहवालाकडे केडीएमसीचे मात्र पुरते दुर्लक्ष झाले आहे. जानेवारीत दिलेल्या आदेशात १५ दिवसांत अहवाल द्यावा, अशा सूचना महापालिकेला करण्यात आल्या होत्या, परंतु अद्याप अहवाल दिलेला नाही. त्यामुळे गोडे यांनी पुन्हा आयोगाकडे तक्रार केली आहे. सोनवणे यांचा खुलासा अद्याप केडीएमसीला मिळालेला नाही. सध्या नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी असलेले सोनवणे ३० जूनला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे खुलासा करण्यास ते टाळाटाळ करतात की काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. गोडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने आदेश देऊन चार महिने उलटले, तरी महापालिकेकडून होणारी दिरंगाई चर्चेचा विषय ठरली आहे. यातील सच्चिदानंद कुलकर्णी हे निवृत्त झाले आहेत. शांतिलाल राठोड जुलैत निवृत्त होत आहेत. सोनवणे हे कारवाई टाळण्यासाठी ते निवृत्त होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा सवाल गोडे यांनी केला आहे. त्यांच्याही जकात पावत्यांमध्ये फेरफारदक्षता पथकाने केलेल्या तपासणीत एकूण सहा पावत्यांमध्ये फेरफार झाल्याचे आढळले होते, परंतु त्यापैकी फक्त लिपिक (तत्कालीन नाका कारकून) गोडे यांच्याशी संबंधित तीन व त्यांचा संबंध नसलेल्या एका पावतीबाबत त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जकात पावत्यांच्या कार्बन प्रतींमध्ये फेरफार नाका कारकुनांकडून होत नाही. तो वाहतूकदारांकडून होण्याची शक्यता असते. जरी नाका कारकुनांकडून फेरफार झाल्याचे उघडकीस आले, असे गृहीत धरले, तरी गोडे यांच्यासह अन्य चार नाका कारकुनांनी तयार केलेल्या जकात पावत्यांच्या कार्बन कॉपीमध्येसुद्धा फेरफार झाल्याचे आढळूनही केवळ गोडे यांच्यावरच गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अन्य चार कारकुनांवर प्रशासनामार्फत कोणतीही कारवाई प्रस्तावित करण्यात आली नाही, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाने गोडे यांना माहितीच्या अधिकारात दिली आहे. गोडे यांच्या अर्जात तथ्य असून, त्यांच्यावर खरोखरीच अन्याय झालेला असल्याचे दिसून येते, असेही स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.