शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

दोन भीषण अपघातांत पाच ठार

By admin | Published: October 24, 2016 5:21 AM

थांबलेल्या कारला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्यामुळे आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव जीपने धडक दिल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात दोने भीषण अपघात झाले.

औरंगाबाद : थांबलेल्या कारला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिल्यामुळे आणि रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव जीपने धडक दिल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात दोने भीषण अपघात झाले. रविवारी पहाटे झालेल्या या दोन अपघातांत पाच जण जागीच ठार, तर दोघे जखमी झाले आहेत. रविवार हा औरंगाबादसाठी ‘घात’वार ठरला.पुण्याहून जळगावकडे जाणाऱ्या अल्टो कारचे पंक्चर चाक बदलत असताना, औरंगाबाद-अहमदनगर राज्यमार्गावर कायगावजवळील भोगे वस्तीसमोर औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव आयशर ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कल्पेश रमेश खोडे (२७) आणि मुकेश रमेश वेलीस (२५ दोघेही रा. मुंडखेडी रोड, जळगाव) जागीच ठार झाले, तर कारमध्ये बसलेले रंजना रमेश खोडे आणि स्वरूप सुरेश सवडे हे दोघे जखमी झाले. या अपघातात कार दूर शेतात फेकली गेली. जखमींना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ट्रकचालक फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.दुसरा अपघात औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील केऱ्हाळा फाट्याजवळ झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला पाठीमागून स्कॉर्पिओने धडक दिली. त्यात स्कॉर्पिओतील विनोद रामदास इंगळे (४०, रा. जामठी, औरंगाबाद), प्रकाश अशोक जांभळे (२१, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) व भूषण रामचंद्र मोरे (२१, रा. धुळे) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक व क्लीनर फरार झाले आहेत. (प्रतिनिधी)