शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

पाच दिवसांचा आठवडा

By admin | Updated: September 29, 2015 03:21 IST

राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही आठवड्यातील कामकाज ६ऐवजी

यदु जोशी,मुंबई राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातही आठवड्यातील कामकाज ६ऐवजी ५ दिवस करण्यास मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी हिरवा झेंडा दाखविल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. लवकरच यासंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर येण्याची शक्यता आहे. राज्यातील शासकीय कर्मचारी-अधिकारी संघटनांनी ३१ आॅगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवृत्तीचे वय ६० वर्षे आणि ५ दिवसांचा आठवडा करा, अशा दोन प्रमुख मागण्या केल्या होत्या. त्यानुसार या मागण्यांवर अभ्यास करून प्रस्ताव देण्यास मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव क्षत्रिय यांना सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की, पाच दिवसांचा आठवडा करताना कामकाजाची वेळ वाढवून द्यावी, असा प्रस्ताव क्षत्रिय यांनी तयार केला आहे. तो लवकरच मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी जाईल आणि नंतर तो मंत्रिमंडळासमोर येईल. सध्या कामकाजाची वेळ सकाळी ९.४५ ते ५.३० किंवा काही जिल्ह्णांमध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ अशी आहे. म्हणजे ७ तास ४५ मिनिटे कामकाज चालते. याऐवजी, आठवड्यातून पाच दिवस रोज ४५ मिनिटे जादा काम करण्याची तयारी संघटनांनी आधीच दर्शविली आहे. पाच दिवसांचा आठवडा करताना कामकाजाची वेळ वाढविली जाईल, हे स्पष्ट आहे. या संबंधीचा प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली मुख्य सचिव कार्यालयात सुरू आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या दुसऱ्या आणि चवथ्या शनिवारी सुटी असते. मात्र, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दर शनिवारी सुटी असते. आठवड्यात दोन दिवस सुटी असेल तर कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन ते अधिक चांगले काम करू शकतात, असा तर्क पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी दिला जातो. शिवाय, पाच दिवसांचा आठवडा केल्याने सरकारची एक दिवसाची वीज आणि इतर खर्च वाचतो, असाही दावा केला जातो. पाच दिवसाच्या आठवड्यावर मंत्रिमंडळाची मोहर उमटताच शासकीय कर्मचाऱ्यांचा ‘विक एन्ड’ जोरात साजरा होणार.---------राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८वरून ६० वर्षे करण्याची संघटनांची मागणी होती; मात्र ती अमान्य करण्यात आली असून, केवळ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० असून, ते कायम राहील, असेही सूत्रांनी सांगितले. --------पहिल्या टप्प्यात मुंबई!मुंबईतील कर्मचारी कार्यालयात ये-जा करण्यासाठी ३-४ तासांचा प्रवास करतो. त्यामुळे पाच दिवसांच्या आठवड्याची अंमलबजावणी सुरुवातीला मुंबईत करावी असाही एक प्रस्ताव पुढे आला आहे. मात्र, मंत्रालयासह राज्य सरकारची अनेक मुख्यालये येथे असल्याने अन्यत्र शनिवारी कार्यालये सुरू व मुख्यालय बंद, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. -----------कर्मचारी संघटनांनी सरकारला दिलेला प्रस्तावकर्मचाऱ्यांची महिन्यातील वर्षातील ३० मिनिटांचा भोजनमहिन्यातील वर्षातकार्यालयीन वेळसरासरी दिवस सरासरी दिवसकालावधी वगळून कामाचे तास ताससध्या२४ (२ शनिवार व २८८ ७ तास १५ मिनिटे १७४२०७७ ९.४५ ते ५.३०४ रविवार वगळून)(२४ * १२)(४३५ मिनिटे)तासतास५ दिवसांचा आठवडा २२ (४ शनि. व २६४८ तास१७६ २११२ ९.४५ ते ६.१५४ रवि. वगळून) (२२*१२)(४८० मिनिटे)तासतास