शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मिरजेच्या तंतुवाद्य कारागीरांसाठी पाच कोटींचा निधी

By admin | Updated: May 25, 2015 00:43 IST

शासनाची मदत : कारागीरांची संख्या केवळ पन्नासवर; तंतुवाद्य निर्मितीला हस्तकलेचा दर्जा

मिरज : राज्यात मिरजेत एकमेव असलेल्या तंतुवाद्य निर्मितीस राज्य शासनाने हस्तकलेचा दर्जा दिला असून लघुउद्योग विकास महामंडळातर्फे तंतुवाद्य कारागीरांसाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. मिरजेतील शासनाच्या जागेत तंतुवाद्य कारागीरांना घरे व दुकाने बांधून देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी लघुउद्योग विकास महामंडळाच्याअधिकाऱ्यांनी शनिवारी शहरातील जागेची पाहणी केली. तंतुवाद्य निर्मितीची दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या मिरजेत तंतुवाद्य निर्मिती कारागीरांची पाचवी पिढी या व्यवसायात आहे. तंबोरा व सतार या दर्जेदार तंतुवाद्यांसाठी मिरजेचा संपूर्ण देशात व परदेशात लौकिक आहे. तंतुवाद्याचा मधुर व सुरेल आवाज, टिकावूपणा, सुबकता यामुळे मिरजेतील सतार व तंबोऱ्यांना विविध मान-सन्मान मिळाले आहेत. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत कला टिकविण्याचे श्रेय तंतुवाद्य कारागीरांनाही आहे. मात्र विविध अडचणींमुळे मिरजेतील तंतुवाद्य निर्मिती कारागीरांची संख्या घटली आहे. इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्याच्या आक्रमणामुळे तंतुवाद्य निर्मिती व्यवसायाला मोठा फटका बसला. इलेक्ट्रॉनिक तानपुऱ्यांमुळे तंबोऱ्यांची मागणी घटली. तंतुवाद्यांची घटलेली मागणी, कच्च्या मालाच्या वाढत्या दरामुळे तंतुवाद्य कारागीरांची संख्या कमी होत आहे. तंतुवाद्य निर्मिती हे अत्यंत कष्टाचे काम आहे. महिन्याभरात केवळ चार ते पाच सतारी किंवा तंबोऱ्यांची निर्मिती होत असल्याने तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यामुळे कारागीरांची संख्या रोडावत आहे. कारागीरांची नवी पिढी या व्यवसायात येण्यास इच्छुक नाही. तंतुवाद्य कला टिकविण्यासाठी व संवर्धनासाठी तंतुवाद्य निर्मितीला हस्तकलेचा दर्जा द्यावा, कारागीरांना निवृत्तीवेतन, व्यवसायासाठी जागा, आर्थिक मदत व आरोग्य सुविधा देण्याच्या मागणीसाठी तंतुवाद्य कारागीरांचा शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. अखिल भारतीय हस्तकला महामंडळाने तंतुवाद्य निर्मितीस हस्तकलेचा दर्जा दिला. मात्र राज्य शासनाने हा दर्जा दिला नसल्याने शासकीय योजना व सवलतींपासून तंतुवाद्य कारागीर वंचित होते. आता लघुउद्योग विकास महामंडळाच्या अंतर्गत तंतुवाद्य निर्मितीस हस्तकलेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीताचा आधार असलेला तंतुवाद्य निर्मिती व्यवसाय टिकविण्यासाठी आता मदत मिळणार आहे. तंतुवाद्य निर्मिती व्यवसायाला कलेचा दर्जा मिळाल्याने तंतुवाद्य कारागीरांनी समाधान व्यक्त केले. कारागीरांना विमा, तंतुवाद्य निर्मात्यांना दुकाने व घरांसाठी शासनाची जागा उपलब्ध करून देऊन तंतुवाद्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मिरजेतील कोल्हापूर रस्ता, सावळी रस्ता व सांगली रस्त्यावरील एसटी वर्कशॉपजवळील शासनाच्या जागेत तंतुवाद्य कारागीरांना घरे व दुकाने बांधून देण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पाव शतकाचा लढादेशातील अनेक दिग्गज कलाकार मिरजेत तयार झालेल्या सतार व तंबोऱ्यांचा वापर करतात. मिरजेच्या सतार व तंबोऱ्यास परदेशातही मागणी आहे. सतार किंवा तंबोरा बनविण्यासाठी कोणी भोपळा कापतो, कोेणी तराफा जोडतो, कोणी तारा चढवितो, कोणी नक्षीकाम करतो, कोणी वाद्याचे ट्युनिंग करतो. सतार, तंबोऱ्याची निर्मिती ही सामूहिक कला आहे. वाद्याचे ट्युनिंग करणे किवा स्वर जुळविणे तर अत्यंत कौशल्याचे काम आहे. त्यासाठी स्वरांचे ज्ञान आवश्यक आहे. अशा खडतर काम करणाऱ्या या तंतुवाद्य कलाकारांना कलेचा दर्जा मिळविण्यासाठी सुमारे पाव शतक झगडावे लागले आहे.