शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

पंढरपूर यात्रेसाठी पाच कोटींचे अनुदान देणार - मुख्यमंत्री

By admin | Updated: June 1, 2016 20:25 IST

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीवर ताण असल्याने आषाढी यात्रेसाठी पाच कोटींचे यात्रा अनुदान देणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. 1 -  अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीवर ताण असल्याने आषाढी यात्रेसाठी पाच कोटींचे यात्रा अनुदान देणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन व जनसंवाद सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री विजय शिवतारे, बबनराव लोणीकर, माजी आ. सुधाकरपंत परिचारक, खा. शरद बनसोडे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यावर्षी राज्यातील ४० हजार गावांपैकी २८ हजार गावे ही दुष्काळग्रस्त आहेत. मागील वर्षी २५ हजार गावात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या. दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहण्याचे काम सरकार करीत आहे. दुष्काळी निधी, जलसंधारण, जलपुनर्भरण, जलस्वराज्य प्रकल्प असे इव्हेंट राबवून राज्यातून कायमचा दुष्काळ घालविण्याचा प्रयत्न सुरू आहे.राज्यात दीड वर्षापूर्वी १७ लाख शेतकरी विमा खातेदार होते. परंतु मागील दीड वर्षात खातेदार वाढवून आज १ कोटी १३ लाख शेतकऱ्यांना या विमा योजनेचे खातेदार केले. आघाडी सरकारने १५ वर्षात ४ कोटी रूपयांची मदत शेतकऱ्यांना केली. मात्र आम्ही एका वर्षात ४ हजार कोटींची विमा रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, असे बिंबवले जात आहे. मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, हे विसरून चालणार नाही.अपूरे सिंचन प्रकल्प राबविण्यासाठी पाटबंधारे विभागाने १० हजार कोटी रूपयांची मागणी केली. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून निधी मिळतो आहे. अपूर्ण प्रकल्प अडकणार नाहीत, मात्र आलेल्या पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे. ठेकेदारांची घरे भरण्यासाठी सिंचनाचे प्रकल्प नाहीत. वेगळा प्रकार यासंदर्भात घडल्यास आपण त्याची गय करणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.यावेळी राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंढरपूरची दशा नीट करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. कामे मार्गी लावली जात आहेत. वारकऱ्यांना विठोबाचे दर्शन घडते. परंतु पंढरी दर्शन व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात आम्ही नाही. मात्र शेतकऱ्यांना भक्कम उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आंबा, डाळिंब एक्सपोर्टसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न पाहिजेत. शेत मालावर प्रक्रिया केल्याशिवाय शेतकऱ्यांना प्रॉफीट मिळणार नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.कार्यक्रमास आ. बबनराव शिंदे, आ. सुभाष देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आ. नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, महेश कोठे, माजी आ. सिद्रामप्पा पाटील, राजाभाऊ राऊत, युटोपियनचे प्रवर्तक उमेश परिचारक, अक्कलकोट बाजार समितीचे संजय शिंदे, उत्तम जानकर, सभापती संजय पाटील, धवलसिंह मोहिते-पाटील, सभापती पोपट रेडे, उपसभापती संतोष घोडके, संचालक लक्ष्मणराव धनवडे, तानाजी वाघमोडे, जि.प. सदस्य बाळासाहेब देशमुख, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, पंढरपूर दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब माळी, अ‍ॅड. संतोष देशमुख, माजी सभापती वसंतराव देशमुख, माणिक बनसोडे, राजेंद्र मिरगिणे, श्रीकांत देशमुख, विलास घुमरे, बापू जगताप, लक्ष्मण ठोंगे-पाटील, दादा साठे, माजी आ. धनाजी साठे, भगवान चौगुले, पांडुरंगचे माजी अध्यक्ष दिनकर मोरे, दाजी पाटील, दिलीप घाडगे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले, सभापती वर्षाराणी बनसोडे, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सुकेशिनी देशमुख, जि.प. सदस्य बाळासाहेब माळी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. पी. कुलकर्णी, श्वेता हुल्ले यांनी केले. सुरेश आगावणे यांनी आभार मानले.

तोपर्यंत व्हॅट रद्द...भाजप सरकारने बेदाण्यावरील व्हॅट दीड वर्षापासून रद्द केला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी आपला प्रयत्न आहे. जोपर्यंत भाजपाचे सरकार आहे, तोपर्यंत बेदाण्यावर व्हॅट लावला जाणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.