शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

१५ मेपासून मासेमारी बंदी

By admin | Updated: May 9, 2014 01:33 IST

मत्स्यसंवर्धनासाठी ठाणे आणि मुंबईत येत्या १५ मे ते १५ आॅगस्ट (नारळी पौर्णिमा) या काळात मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

 मनोहर कुंभेजकर

मुंबई - मत्स्यसंवर्धनासाठी ठाणे आणि मुंबईत येत्या १५ मे ते १५ आॅगस्ट (नारळी पौर्णिमा) या काळात मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या आज सकाळी वसईतील पाचूबंदर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला वसई, अर्नाळा, उत्तन, सातपाटी परिसरातील ५00 मच्छीमार उपस्थित होते. गुजरातमध्येही १५ मेपासून तेथील मच्छीमारांनी स्वयंप्रेरित होऊन मासेमारी बंदीचा निर्णय घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील आणि सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे मत्स्यप्रेमींना तीन महिने आपल्या जिभेचे चोचले पुरवता येणार नाहीत. शासनाच्या मत्स्य विभागाच्या आदेशानुसार राज्यात १५ जून ते १५ आॅगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी असतो. मात्र सततच्या मासेमारीमुळे जगात २०४७ साली समुद्रातील मत्स्यसाठाच संपेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मत्स्य प्रजोत्पानाच्या कालावधीत मत्स्यसाठ्यांचे जतन व्हावे आणि मासे अंडी घालताना त्यात बाधा येऊ नये या उद्देशाने ठाणे-मुंबईतील मच्छीमारांनी निर्णय घेतला असल्याची माहिती समितीचे चिटणीस रामकृष्ण तांडेल आणि मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. हा बंदीचा निर्णय शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाला कळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.