शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

१५ मेपासून मासेमारी बंदी

By admin | Updated: May 9, 2014 01:33 IST

मत्स्यसंवर्धनासाठी ठाणे आणि मुंबईत येत्या १५ मे ते १५ आॅगस्ट (नारळी पौर्णिमा) या काळात मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

 मनोहर कुंभेजकर

मुंबई - मत्स्यसंवर्धनासाठी ठाणे आणि मुंबईत येत्या १५ मे ते १५ आॅगस्ट (नारळी पौर्णिमा) या काळात मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या आज सकाळी वसईतील पाचूबंदर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला वसई, अर्नाळा, उत्तन, सातपाटी परिसरातील ५00 मच्छीमार उपस्थित होते. गुजरातमध्येही १५ मेपासून तेथील मच्छीमारांनी स्वयंप्रेरित होऊन मासेमारी बंदीचा निर्णय घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील आणि सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी दिली. या निर्णयामुळे मत्स्यप्रेमींना तीन महिने आपल्या जिभेचे चोचले पुरवता येणार नाहीत. शासनाच्या मत्स्य विभागाच्या आदेशानुसार राज्यात १५ जून ते १५ आॅगस्ट असा मासेमारी बंदीचा कालावधी असतो. मात्र सततच्या मासेमारीमुळे जगात २०४७ साली समुद्रातील मत्स्यसाठाच संपेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मत्स्य प्रजोत्पानाच्या कालावधीत मत्स्यसाठ्यांचे जतन व्हावे आणि मासे अंडी घालताना त्यात बाधा येऊ नये या उद्देशाने ठाणे-मुंबईतील मच्छीमारांनी निर्णय घेतला असल्याची माहिती समितीचे चिटणीस रामकृष्ण तांडेल आणि मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. हा बंदीचा निर्णय शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाला कळवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.