शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

रत्नागिरीत पूर्णगड खाडीत मच्छीमारांची बोट उलटली; चार जण बुडाल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 12:00 IST

पूर्णगड खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटल्याची घटना घडली आहे

ठळक मुद्दे पूर्णगड खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण बुडाल्याची माहिती मिळते आहे.

रत्नागिरी, दि. 12- पूर्णगड खाडीमध्ये मच्छीमारांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जण बुडाल्याची माहिती मिळते आहे. या चारमध्ये तीन सख्खे भाऊ असल्याचंही समजतं आहे. यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह खाडीतून बाहेर काढण्यात आले आहेत. तर इतर दोन जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.  मंगळवारी पहाटे रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड खाडीमध्ये ही घटना घडली आहे. हसन पठाण आणि जैनुद्दिन पठाण अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत

सागरी महामार्गावरील पूर्णगड येथील जैनुद्दिन लतिफ पठाण, अब्बास लतिफ पठाण, हसन लतिफ पठाण आणि तौकर अब्दुल सत्तार हे चारजण सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मासेमारीसाठी गेले. सायंकाळपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे समुद्र खवळला होता. वाऱ्याचा वेगही वाढला होता. मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची नौका उलटली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मासेमारी करणाऱ्या अन्य काही बोटींच्या माध्यमातून पठाण यांची बोट बुडाल्याची माहिती बाहेर आली आणि शोधकामाला सुरूवात झाली. बुडालेल्या चौघांपैकी हसन लतिफ पठाण याचा मृतदेह सापडला आहे. उर्वरित तिघेजण अजूनही बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांसह पोलीस बुडालेल्यांचा शोध घेत आहेत.

वैभववाडी तालुक्यात चक्रीवादळाने दाणादाण; लाखोंचे नुकसानमुसळधार पावसाचा प्रत्यय कोकण किनारपट्टीमध्ये सगळीकडे आला आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग, वैभववाडी आदी परीसरातही पावसाने थैमान घातले आहे. तालुक्यात रविवारी सायंकाळी मुसळधार पाउस झाला. यावेळी चक्रीवादळाने नापणे, नाधवडे तिथवली परिसरात अक्षरश: दाणादाण उडवली. चक्रीवादळामुळे घरे, गोठे व मंदिराचे सुमारे दहा लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे कोसळल्याने संपूर्ण तालुक्याचा विद्युत पुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित झाला होता. तर तळेरे-वैभववाडी मार्गावर झाडे कोसळल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरु होती.

रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पाऊस सुरु असतानाच जोरदार चक्रीवादळ झाले. चक्रीवादळाच्या तडाख्याने झाड पडल्यामुळे नापणे येथील भवानी मंदिराचा कळस तुटून स्लॅबही कोसळला. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.