शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

आठ पर्यटकांना मच्छीमारांनी वाचविले

By admin | Updated: March 14, 2016 01:38 IST

केळवे बीच वरील पानकोट या समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या ऐतिहासिक किल्ल्यात गेलेल्या व भरतीच्या विळख्यात सापडलेल्या वाझ येथील

हितेन नाईक,  पालघरकेळवे बीच वरील पानकोट या समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या ऐतिहासिक किल्ल्यात गेलेल्या व भरतीच्या विळख्यात सापडलेल्या वाझ येथील चार मुले व चार मुली यांना वाचविण्यात केळवे येथील मच्छीमार तरु णांना यश आले आहे.पालघर तालुक्यातील शांत आणि निर्धोक असा समुद्र किनारा तसेच बागायती क्षेत्रासह जागृत शितलाई देवीचे देवस्थान म्हणून केळवे बीच सर्वत्र प्रसिद्ध आहे. शनिवार-रविवार तसेच सलग सुट्टीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने बाराही महीने या बीच वर मोठी गर्दी असते. आज वाझ येथून १५ते १८ वयोगटतील चार मुले आणि चार मुली केळवे बीच वर फिरण्यासाठी आल्या होत्या. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ही मुले समुद्राने वेढलेल्या पानकोट हा किल्ला पाहण्यासाठी ओहोटी असताना किल्ल्यात गेले. ते आत असतानाच भरती सुरु झाली. ते त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु किनाऱ्यावर असलेले केळवे मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष हरेश्वर तांडेल यांना संकटाची चाहूल लागल्या बरोबर त्यानी सरळ किनाऱ्यावर बसलेल्या गणेश तांडेल, हरेश्वर तांडेल, भूषण तांडेल, नयन तांडेल इ. तरुणांना कल्पना देवून सरळ समुद्राच्या पाण्यात झेप घेतली. भरतीच्या पाण्याला आलेल्या मोठ्या प्रवाहाची पर्वा न करता त्यांनी आपापसात खेळण्यात मग्न असलेल्या त्या तरु णांना त्यांच्या समोरील संकटाची ओरडून कल्पना दिली. आपल्या सभोवताली वाढलेला भरतीच्या पाण्याचा वेढा पाहून ते भयभीत झाले. त्या सर्व मच्छीमारांनी त्यांना दिलासा देत मानवी साखळी तयार करु न त्या आठ तरुणांना छाती भर पाण्यातून सुखरूप पणे बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करायला कोणीही पुढे आले नसले तरी संकटग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना या तरु णानी व्यक्त केली. केळवे हे दिवसेंदिवस पर्यटकांच्या दृष्टीने आवडते ठिकाण असून पर्यटकांचा ओघ वाढत आहे.