शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

आठ पर्यटकांना मच्छीमारांनी वाचविले

By admin | Updated: March 14, 2016 01:38 IST

केळवे बीच वरील पानकोट या समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या ऐतिहासिक किल्ल्यात गेलेल्या व भरतीच्या विळख्यात सापडलेल्या वाझ येथील

हितेन नाईक,  पालघरकेळवे बीच वरील पानकोट या समुद्राच्या पाण्याने वेढलेल्या ऐतिहासिक किल्ल्यात गेलेल्या व भरतीच्या विळख्यात सापडलेल्या वाझ येथील चार मुले व चार मुली यांना वाचविण्यात केळवे येथील मच्छीमार तरु णांना यश आले आहे.पालघर तालुक्यातील शांत आणि निर्धोक असा समुद्र किनारा तसेच बागायती क्षेत्रासह जागृत शितलाई देवीचे देवस्थान म्हणून केळवे बीच सर्वत्र प्रसिद्ध आहे. शनिवार-रविवार तसेच सलग सुट्टीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने बाराही महीने या बीच वर मोठी गर्दी असते. आज वाझ येथून १५ते १८ वयोगटतील चार मुले आणि चार मुली केळवे बीच वर फिरण्यासाठी आल्या होत्या. दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास ही मुले समुद्राने वेढलेल्या पानकोट हा किल्ला पाहण्यासाठी ओहोटी असताना किल्ल्यात गेले. ते आत असतानाच भरती सुरु झाली. ते त्यांच्या लक्षात आले नाही. परंतु किनाऱ्यावर असलेले केळवे मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष हरेश्वर तांडेल यांना संकटाची चाहूल लागल्या बरोबर त्यानी सरळ किनाऱ्यावर बसलेल्या गणेश तांडेल, हरेश्वर तांडेल, भूषण तांडेल, नयन तांडेल इ. तरुणांना कल्पना देवून सरळ समुद्राच्या पाण्यात झेप घेतली. भरतीच्या पाण्याला आलेल्या मोठ्या प्रवाहाची पर्वा न करता त्यांनी आपापसात खेळण्यात मग्न असलेल्या त्या तरु णांना त्यांच्या समोरील संकटाची ओरडून कल्पना दिली. आपल्या सभोवताली वाढलेला भरतीच्या पाण्याचा वेढा पाहून ते भयभीत झाले. त्या सर्व मच्छीमारांनी त्यांना दिलासा देत मानवी साखळी तयार करु न त्या आठ तरुणांना छाती भर पाण्यातून सुखरूप पणे बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करायला कोणीही पुढे आले नसले तरी संकटग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना या तरु णानी व्यक्त केली. केळवे हे दिवसेंदिवस पर्यटकांच्या दृष्टीने आवडते ठिकाण असून पर्यटकांचा ओघ वाढत आहे.