शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत होणार पहिली ‘स्मार्ट’ सिटी

By admin | Updated: June 13, 2016 02:59 IST

महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एक महिन्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांचा झंझावात सुरू आहे.

नामदेव मोरे,

 

नवी मुंबई- महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एक महिन्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांचा झंझावात सुरू आहे. पदभार स्वीकारल्यापासून ७३१७ फेरीवाले, मार्जिनल स्पेस, झोपड्या, इमारती व इतर अतिक्रमणावर कारवाई केली आहे. आयुक्तांच्या कार्यशैलीमुळे स्मार्ट सिटीमधून बाहेर पडलेली नवी मुंबईच देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याचा बहुमान मिळवेल, असा विश्वास शहरातील जाणकार व्यक्त करू लागले आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेतून नवी मुंबई बाहेर पडल्यानंतर शहरवासीयांना धक्का बसला होता. देशातील स्मार्ट सिटीमध्ये पहिले नाव आपल्याच शहराचे असावे असे सर्वांना वाटू लागले होते. महापालिकेने प्रस्ताव फेटाळल्यानंतर स्वप्नभंग झाल्याचे दु:ख सर्वच शहरवासीयांना झाले होते. परंतु तुकाराम मुंढे यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा धडाका सुरू केला आहे. प्रशासन प्रमुख कणखर असेल तर किती वेगाने कामे होतात याचे प्रात्यक्षिकच एक महिन्यात दाखविले आहे. यापूर्वी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबईचे सिंगापूर करण्याचे स्वप्न बोलून दाखविले होते. फेरीवाल्यांना हटविण्यासाठी स्वत: रोडवर उतरले होते. परंतु कारवाई झाली की पुन्हा अतिक्रमण होवू लागले होते. तुकाराम मुंढे यांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना लेखी आदेश देवून शहरातील पदपथ व रोडवरील सर्व फेरीवाल्यांना तत्काळ हटविण्यात यावे, शहरात एकही झोपडी वाढता कामा नये, अतिक्रमण वाढल्यास प्रथम अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. मुंढे यांनी मालमत्ता कर विभागाचे प्रमुख प्रकाश कुलकर्णी व इतर पाच अधिकाऱ्यांना निलंबित केल्याने विभाग अधिकाऱ्यांनी सुटीही न घेता अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेमध्ये झोकून दिले आहे. महापालिकेची स्थापना झाल्यापासून प्रत्येक वर्षी फेरीवाल्यांविरोधात मोहीम राबविली जाते. फेरीवाल्यांना आळा बसावा यासाठी त्यांच्या जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव करण्याचे धोरण निश्चित केले. परंतु या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी झाली नसल्याने फेरीवाल्यांची संख्या वाढतच गेली. परंतु मुंढे यांच्या झंझावातामुळे अधिकाऱ्यांनी एक महिन्यामध्ये तब्बल १०१० होर्डिंग व बॅनर हटविले आहेत. १९१६ फेरीवाल्यांना हटविले आहे. शहरातील तब्बल १८०८ झोपड्या निष्कासित केल्या आहेत. तब्बल २४९२ मार्जिनल स्पेसवर कारवाई झाली आहे. एक महिन्यामध्ये ४१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. महापालिकेने एक महिन्यामध्ये ७३१७ अतिक्रमणांवर कारवाई झाली आहे. अतिक्रमण करणाऱ्यांकडून ३८ लाख ६८ हजार १११ इतके शुल्क वसूल केले आहे. याशिवाय डेब्रिज विरोधी पथकाने त्यांच्याकडून १९ लाख ३५ हजार ५०० रूपये वसूल केले आहेत. अशाच प्रकारे कामे सुरू राहिली तर पुढील तीन वर्षात नवी मुंबईच देशातील स्मार्ट सिटी होईल, असा विश्वास नागरिक व्यक्त करू लागले आहेत. आयुक्तांनी शहर अतिक्रमणमुक्त करण्याचा धडाका लावला असून त्यांना सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व शहरवासीयांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे मतही शहरवासी व्यक्त करत असून मुंढे यांचा करिश्मा दिवसेंदिवस वाढत आहे.>स्वत:हून काढली पाच हजार अतिक्रमणे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून होर्डिंग, बॅनर, मार्जिनल स्पेस, झोपड्या मिळून ७३५८ अतिक्रमणांवर कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचा दबदबा तयार झाला असून वर्षानुवर्षे मार्जिनल स्पेस स्वत:च्या मालकीचा असल्याप्रमाणे वागणाऱ्या जवळपास पाच हजार व्यापारी व फेरीवाल्यांनी स्वत:च सर्व अतिक्रमण हटविले आहे. मुंढे आल्यापासून सर्व रस्ते व पदपथ मोकळे होवू लागले असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. >स्मार्ट सिटीसह सिंगापूरचे स्वप्न साकारठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वारंवार नवी मुंबईचे सिंगापूर करण्याची संकल्पना बोलून दाखविली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामुळे शहर अतिक्रमणमुक्त होण्याची आशा वाटू लागली आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने पहिले पाऊल पडले असून तीन वर्षे आयुक्त राहिले तर देशातील पहिली स्मार्ट सिटी नवी मुंबईच असेल फक्त सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. डेब्रिज माफिया हादरलेनवी मुंबईत डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला होता. मुंबई, ठाणे परिसरातून शेकडो डंपर डेब्रिज नवी मुंबईत टाकले जात होते. आयुक्तांच्या कारवाईमुळे त्या डेब्रिज माफियांचे धाबे दणाणले.>हॉटेलचालकांनाही दाखविला हिसकानवी मुंबईमध्ये मार्जिनल स्पेसचा सर्वाधिक दुरूपयोग हॉटेलचालक करतात. प्रसारमाध्यमांनी आवाज उठविला की कारवाई केली जात होती. परंतु पालिकेचे पथक माघारी गेले की तत्काळ अतिक्रमण सुरू होत होते. मुंढे यांनी आदेश दिल्यानंतर हॉटेलचाकांची मनमानी थांबविली आहे. वाशीमधील शांती, विंब्रो, परिचय, वसुंधरा, सिट्रस या हॉटेलचालकांनी केलेले सर्व अतिक्रमण हटविले आहे. शहरात हॉटेल असलेल्या इमारतीमधील सार्वजनिक वापराच्या जागेतील अतिक्रमण हटविले आहे. >आयुक्तांचा ठाम पाठिंबाअतिक्रमण विरोधी कारवाई करताना यापूर्वी अधिकाऱ्यांवर वारंवार दबाव यायचा. फेरीवाला संघटना, राजकीय नेते व इतरांकडून दबाव आणला जात होता. यामुळे अनेक ठिकाणी इच्छा असूनही कारवाई केली जात नव्हती. परंतु तुकाराम मुंढे कायद्याच्या चौकटीत राहून ठाम भूमिका घेत असल्याने अतिक्रमण विभागावर राजकीय व इतर दबाव टाकण्याची हिंमत कोणीही करत नाही. यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाचे सुभाष इंगळे, सहआयुक्त कैलास गायकवाड व सर्व विभाग अधिकारी दबावविरहित कारवाई करू लागले आहेत.