शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

सामाजिक बहीष्कार प्रतिबंध या नविन कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

By admin | Updated: July 17, 2017 22:02 IST

जातीबाहय विवाह केला याची शिक्षा म्हणून पुणे तेलगु मडेलवार समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कृत केल्यामुळे एकाने पोलिसांकडे धाव घेतली असून

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 : जातीबाहय विवाह केला याची शिक्षा म्हणून पुणे तेलगु मडेलवार समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कृत केल्यामुळे एकाने पोलिसांकडे धाव घेतली असून, पंचायतीविरूद्ध त्याने केलेल्या तक्रारीनुसार 17 व्यक्तींवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध या नवीन कायद्याअंतर्गत हापहिलाच गुन्हा नोंदविण्यात आला आहे.उमेश चंद्रकांत रूद्राप ( वय 51 वर्षे रा. गल्ली नं 20 शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. आजच्या घडीला जो कोणी आंतरजातीय विवाह करीत असेल त्यांच्या लग्नाला पंचमंडळी उपस्थित राहात नाहीत. जे कोणी पदाधिकारी लग्नाला हजर राहातील त्यांना पदत्याग करण्यास भाग पाडले जाते. लग्न, सत्कार समारंभाला कुणी नातेवाईक गेल्यास त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार राजेंद्र नरसू म्हकाळे ( अध्यक्ष), सुनिल दत्तू कोंडगिर (उपाध्यक्ष), अनिल वरगंटे (सेक्रेटरी), श्रीधर बेलगुडे ( सहसेक्रेटरी), सुनिल वरगंटे ( खजिनदार), देवीदास वरगंटे ( सहखजिनदार), शिवन्ना आरमुर (मुख्यसंघटक) वसंतवरगंटे (सहसंघटक), लक्ष्मण बेलगुडे ( सहसंघटक), संजय येलपुरे ( सहसंघटक), तुळशीराम तेलाकल्लू, प्रेमचंद वडपेल्ली, सुभाष कंट्रोलू ( सल्लागार), नारायण इस्ट्रोलकर ( सल्लागार), मनिषा आसरकर आणि स्वरूपा अंबेप ( महिलाप्रतिनिधी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

आम्ही आणि आमच्या पालकांनी समाजातील ज्येष्ठ, उदारमतवादी सभासदांनी पंचायतीला आम्हाला वाळीत टाकू नका. आम्हाला जातीत लग्न करणा-या मुलांसारखे सभासद करून घ्या व नात्यानात्यातला वितुष्ठ, वितंडवाद संपवूनटाका अशी त्यांना विनंती केली, परंतु त्यांना जातीच्या रूढ परंपरेची पंचाच्या फतव्याची जास्त काळजी आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या आमच्यासारख्यांची सोईरीक पुन्हा जातीत होऊ नये याकरिता मुला/मुलींच्या पालकांना तोंडी आडमार्गाने सोयरिक न करण्याबददल धमकावले जाते. पंचाच्या या हट्टापायी काही पालकांनी मुला/मुलींचे लग्न त्यांच्या मनाविरूद्धलावून दिले परिणामस्वरूप त्यांचा संसार उध्वस्त झाला. आंतरजातीय विवाह करणे हा गुन्हा नाही. देशाच्या घटनेची व सर्वोच्च न्यायालयाची त्याला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रात आणि पुण्यात देखील जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून काहींनी आत्महत्या केली आहे. काहींनी आपले प्राण घेतले आहेत असे आमच्याबाबत काही घडू नये यासाठी पंचायतीला आम्हाला विनाअट आर्थिक दंड न आकारता सभासद करून घेण्यास भाग पाडावे यांनी नकार दिल्यास नवीन सामाजिक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जात पंचायत बंद पाडण्यास भाग पाडावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रूद्राप यांनी तक्रार अर्जात केली आहे.