शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

सामाजिक बहीष्कार प्रतिबंध या नविन कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल

By admin | Updated: July 17, 2017 22:02 IST

जातीबाहय विवाह केला याची शिक्षा म्हणून पुणे तेलगु मडेलवार समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कृत केल्यामुळे एकाने पोलिसांकडे धाव घेतली असून

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 17 : जातीबाहय विवाह केला याची शिक्षा म्हणून पुणे तेलगु मडेलवार समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कृत केल्यामुळे एकाने पोलिसांकडे धाव घेतली असून, पंचायतीविरूद्ध त्याने केलेल्या तक्रारीनुसार 17 व्यक्तींवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध या नवीन कायद्याअंतर्गत हापहिलाच गुन्हा नोंदविण्यात आला आहे.उमेश चंद्रकांत रूद्राप ( वय 51 वर्षे रा. गल्ली नं 20 शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. आजच्या घडीला जो कोणी आंतरजातीय विवाह करीत असेल त्यांच्या लग्नाला पंचमंडळी उपस्थित राहात नाहीत. जे कोणी पदाधिकारी लग्नाला हजर राहातील त्यांना पदत्याग करण्यास भाग पाडले जाते. लग्न, सत्कार समारंभाला कुणी नातेवाईक गेल्यास त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार राजेंद्र नरसू म्हकाळे ( अध्यक्ष), सुनिल दत्तू कोंडगिर (उपाध्यक्ष), अनिल वरगंटे (सेक्रेटरी), श्रीधर बेलगुडे ( सहसेक्रेटरी), सुनिल वरगंटे ( खजिनदार), देवीदास वरगंटे ( सहखजिनदार), शिवन्ना आरमुर (मुख्यसंघटक) वसंतवरगंटे (सहसंघटक), लक्ष्मण बेलगुडे ( सहसंघटक), संजय येलपुरे ( सहसंघटक), तुळशीराम तेलाकल्लू, प्रेमचंद वडपेल्ली, सुभाष कंट्रोलू ( सल्लागार), नारायण इस्ट्रोलकर ( सल्लागार), मनिषा आसरकर आणि स्वरूपा अंबेप ( महिलाप्रतिनिधी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

आम्ही आणि आमच्या पालकांनी समाजातील ज्येष्ठ, उदारमतवादी सभासदांनी पंचायतीला आम्हाला वाळीत टाकू नका. आम्हाला जातीत लग्न करणा-या मुलांसारखे सभासद करून घ्या व नात्यानात्यातला वितुष्ठ, वितंडवाद संपवूनटाका अशी त्यांना विनंती केली, परंतु त्यांना जातीच्या रूढ परंपरेची पंचाच्या फतव्याची जास्त काळजी आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या आमच्यासारख्यांची सोईरीक पुन्हा जातीत होऊ नये याकरिता मुला/मुलींच्या पालकांना तोंडी आडमार्गाने सोयरिक न करण्याबददल धमकावले जाते. पंचाच्या या हट्टापायी काही पालकांनी मुला/मुलींचे लग्न त्यांच्या मनाविरूद्धलावून दिले परिणामस्वरूप त्यांचा संसार उध्वस्त झाला. आंतरजातीय विवाह करणे हा गुन्हा नाही. देशाच्या घटनेची व सर्वोच्च न्यायालयाची त्याला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रात आणि पुण्यात देखील जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून काहींनी आत्महत्या केली आहे. काहींनी आपले प्राण घेतले आहेत असे आमच्याबाबत काही घडू नये यासाठी पंचायतीला आम्हाला विनाअट आर्थिक दंड न आकारता सभासद करून घेण्यास भाग पाडावे यांनी नकार दिल्यास नवीन सामाजिक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व जात पंचायत बंद पाडण्यास भाग पाडावे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रूद्राप यांनी तक्रार अर्जात केली आहे.