शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘आधी कळस, मग पाया’ हा रामदासभार्इंचा खाक्या, जनजागृतीवर १० कोटी खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 05:12 IST

प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीच्या जनजागृतीसाठी राज्याच्या माहिती जनसंपर्क खात्याने १० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. प्लॅस्टिकबंदीबाबत पुरेशी जनजागृती व पूर्वतयारी केली नसल्याची टीका होत असताना, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची या निर्णयातील घिसाडघाई प्रकाशात आली आहे.

- नारायण जाधवठाणे - प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीच्या जनजागृतीसाठी राज्याच्या माहिती जनसंपर्क खात्याने १० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. प्लॅस्टिकबंदीबाबत पुरेशी जनजागृती व पूर्वतयारी केली नसल्याची टीका होत असताना, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची या निर्णयातील घिसाडघाई प्रकाशात आली आहे.पर्यावरणमंत्र्यांनी प्लॅस्टिकबंदीची घोषणा केल्यानंतर, माहिती व जनसंपर्क खात्याने त्याच्या जनजागृती मोहिमेचा हा १० कोटींचा विस्तृत माध्यम आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, पर्यावरण विभागाने पहिल्या टप्प्यात तीन कोटी २८ लाख २४ हजार ४९ रुपये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास वितरित केले आहेत. या निधीतून मंडळाने माहिती व जनसंपर्क विभागाच्या नियमानुसार, जनजागृतीसाठी प्रसिद्धी मोहीम राबवायची आहे.आॅल इंडिया प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील प्लॅस्टिक उद्योगाची उलाढाल ५० हजार कोटींची असून, बंदी घातलेल्या प्लॅस्टिकची उलाढाल पाच हजार कोटींवर आहे.विशिष्ट निकषात न बसणाऱ्या प्लॅस्टिक बाटल्यांवरही बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. राज्यात प्लॅस्टिक वस्तूंचे उत्पादन करणारे २,१५०हून अधिक उद्योग असून, त्यावर चार लाखांचा रोजगार अवलंबून आहे. पर्यावरण मंत्रालयाने अगोदरच जनजागृती केली असती, तर प्लॅस्टिकबंदीला उत्तम प्रतिसाद मिळाला असता, तसेच कामगारांना पर्यायी रोजगाराची संधी देणे शक्य झाले असते.बंदी कायम राहणारजीएसटीच्या उत्पन्नाच्या नुकसानापेक्षा राज्याच्या पर्यावरणाचे होणारे नुकसान हे मोठे असून, काहीही झाले,े तरी प्लॅस्टिक व थर्माकोलवरील बंदी कायम राहणार असल्याचे संकेत पर्यावरणमंत्री कदम यांनी दिले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRamdas Kadamरामदास कदम