शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

आधी भीती... नंतर थेट लग्नच लावले! एड्सग्रस्तांना समाजाने स्वीकारण्याची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 07:51 IST

सन २००३ मध्ये मी बीड येथील जिल्हा रुग्णालयात रुजू झालो. त्यावेळची समाजातील एचआयव्ही/एड्सची परिस्थिती भयावह होती. तो काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात....

- दत्ता बारगजे, संस्थापक, इन्फन्ट इंडिया 

न १९९८ मध्ये शिक्षण संपवून मी ग्रामीण रुग्णालय, भामरागड (जि. गडचिरोली) येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून आरोग्यसेवेत दाखल झालो. तेथून अवघ्या दोन-अडीच कि.मी. अंतरावरील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी, हेमलकसा प्रकल्पात ये-जा सुरू झाली. अधून-मधून बाबा आमटे येत असत. सोमनाथ प्रकल्पाच्या शिबिरात एकदा बाबा म्हणाले,‘आनंदवनाची बेटं’ निर्माण करा. हे त्यांचे वाक्य मनात खोलवर रुजले होते.

सन २००३ मध्ये मी बीड येथील जिल्हा रुग्णालयात रुजू झालो. त्यावेळची समाजातील एचआयव्ही/एड्सची परिस्थिती भयावह होती. तो काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. एड्स हे नाव उच्चारायलाही माणसं घाबरत असत. मी जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी तंत्रज्ञ! रक्ताच्या तपासण्या करत असताना एचआयव्ही / एड्सच्या तपासणीची जबाबदारीही माझ्यावर होती. एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आली की वेदना, आक्रोश, भीती, अव्हेरलेपण, अपराधीपणाची भावना... असा सारा कल्लोळ दिसे. मी शक्य होईल तसा आधार देऊ लागलो. एड्स जनजागृतीसाठी शासकीय कार्यक्रम करताना दुसरीकडे एचआयव्हीबाधितांची अव्हेरलेली आयुष्ये, विस्कटलेली घरटी, मृत्यूच्या दिशेने होणारा अपरिहार्य प्रवास या सगळ्यांचे चटके बसत होते; कारण मी त्यांचा होऊन जगत होतो.

विशाल आणि योगेश या दोन मुलांना घेऊन ब्लड बँकेत आलेली पार्वती निमित्त झाली. ती व विशाल एचआयव्ही पॉझिटिव्ह; तर योगेश निगेटिव्ह! पार्वती ओक्साबोक्सी रडली... मी त्या तिघांना घरी घेऊन गेलो. संध्याने त्यांना जेवू घातले. आम्ही विशालला घरी ठेवून घेतले, पार्वती गेली ती पुन्हा कधीच परतली नाही. आईचा अंत्यविधी करून नऊ वर्षांच्या विशालने आमच्या घराचा रस्ता धरला तो कायमचाच. योगेशलाही तो सोबत घेऊन आला! पार्वतीच्या एकाकी मरणयातनांनी हादरलो होतो. मी संध्यासोबत चर्चा केली. ती होती. आमच्या घरीच इन्फंट इंडियाच्या कामाची सुरुवात झाली. विशालच्या वेदनेतून सुरू झालेल्या या कार्याला कोणत्याही विशिष्ट प्रारंभाची गरज लागली नाही. कालौघात आमच्या संस्थेत एड्सग्रस्त बालकांची रीघ लागली.

विशालमागोमाग सूरज आला... नंतर संजय, ज्योती, कोमल, नितीन... घर अपुरे पडू लागले. जागेची शोधाशोध सुरू झाली. मी दिवसभर नोकरीत; संध्या मुलांचा सांभाळ करायची! मग भाड्याने जागा घेतल्या. भाडे भरायची पंचाईत झाली, तेव्हा अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. मुले लहान असताना खाणे-पिणे, शाळा, आरोग्याची देखभाल(ART-CD4) आजारपण.... संस्कार महत्त्वाचे होते. मुलांची संख्या ४५ झाल्यावर संस्थेने स्वत:ची जागा घेतली.

सन २०१४ मध्ये राणी आणि कोमल या दोन मुलींचे पहिले कन्यादान आम्ही केले. समाजातील एचआयव्ही पॉझिटिव्ह वर शोधून, त्याची गृहचौकशी करून, मुलीलाही घर-दार-प्रॉपर्टी पाहण्याचा अधिकार देऊन असे विवाह जुळवण्याचा नवीन पायंडा पाडला. त्यानंतर असे २१ विवाह ‘आनंदग्राम’मध्ये पार पडले. घरापासून बालपणीच वंचित झालेल्या मुलींना हक्काचे घर व आपलेपणाची नाती मिळाली. त्यांच्या पोटी जन्माला आलेली मुले एचआयव्ही निगेटिव्ह असणे, हा मोठा दिलासा झाला!  

हळूहळू वाढत्या वयातील मुलांचे वेगळे प्रश्न डोके वर काढू लागले. स्वतःचे वेगळेपण, समाजाबद्दलचा राग, तिरस्कार, आपले आयुष्य-भविष्य अंधारलेले आहे, अशी भावना. मग समुपदेशन, पुनर्वसन हे प्रश्न पुढे आले. काहींना शासकीय आयटीआयच्या माध्यमातून कौशल्यविकास... काहींना खासगी नोकरी, योग्य जोडीदार शोधून उपवर मुला-मुलींची लग्ने लावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम सुरू झाले. 

काही वर्षांपूर्वी अस्पृश्य ठरवून समाजात हिणकस जिणे वाट्याला आलेल्या एड्सग्रस्तांना हळूहळू समाजाने स्वीकारण्याची ही कहाणी आहे. बदलाचा वेग कमी असेल; पण आपला समाज बदलतो आहे, याचा हा पुरावाच! 

टॅग्स :HIV-AIDSएड्स