शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

आधी भीती... नंतर थेट लग्नच लावले! एड्सग्रस्तांना समाजाने स्वीकारण्याची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 07:51 IST

सन २००३ मध्ये मी बीड येथील जिल्हा रुग्णालयात रुजू झालो. त्यावेळची समाजातील एचआयव्ही/एड्सची परिस्थिती भयावह होती. तो काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात....

- दत्ता बारगजे, संस्थापक, इन्फन्ट इंडिया 

न १९९८ मध्ये शिक्षण संपवून मी ग्रामीण रुग्णालय, भामरागड (जि. गडचिरोली) येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून आरोग्यसेवेत दाखल झालो. तेथून अवघ्या दोन-अडीच कि.मी. अंतरावरील डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी, हेमलकसा प्रकल्पात ये-जा सुरू झाली. अधून-मधून बाबा आमटे येत असत. सोमनाथ प्रकल्पाच्या शिबिरात एकदा बाबा म्हणाले,‘आनंदवनाची बेटं’ निर्माण करा. हे त्यांचे वाक्य मनात खोलवर रुजले होते.

सन २००३ मध्ये मी बीड येथील जिल्हा रुग्णालयात रुजू झालो. त्यावेळची समाजातील एचआयव्ही/एड्सची परिस्थिती भयावह होती. तो काळ आठवला की, आजही अंगावर शहारे येतात. एड्स हे नाव उच्चारायलाही माणसं घाबरत असत. मी जिल्हा रुग्णालयात रक्तपेढी तंत्रज्ञ! रक्ताच्या तपासण्या करत असताना एचआयव्ही / एड्सच्या तपासणीची जबाबदारीही माझ्यावर होती. एचआयव्ही टेस्ट पॉझिटिव्ह आली की वेदना, आक्रोश, भीती, अव्हेरलेपण, अपराधीपणाची भावना... असा सारा कल्लोळ दिसे. मी शक्य होईल तसा आधार देऊ लागलो. एड्स जनजागृतीसाठी शासकीय कार्यक्रम करताना दुसरीकडे एचआयव्हीबाधितांची अव्हेरलेली आयुष्ये, विस्कटलेली घरटी, मृत्यूच्या दिशेने होणारा अपरिहार्य प्रवास या सगळ्यांचे चटके बसत होते; कारण मी त्यांचा होऊन जगत होतो.

विशाल आणि योगेश या दोन मुलांना घेऊन ब्लड बँकेत आलेली पार्वती निमित्त झाली. ती व विशाल एचआयव्ही पॉझिटिव्ह; तर योगेश निगेटिव्ह! पार्वती ओक्साबोक्सी रडली... मी त्या तिघांना घरी घेऊन गेलो. संध्याने त्यांना जेवू घातले. आम्ही विशालला घरी ठेवून घेतले, पार्वती गेली ती पुन्हा कधीच परतली नाही. आईचा अंत्यविधी करून नऊ वर्षांच्या विशालने आमच्या घराचा रस्ता धरला तो कायमचाच. योगेशलाही तो सोबत घेऊन आला! पार्वतीच्या एकाकी मरणयातनांनी हादरलो होतो. मी संध्यासोबत चर्चा केली. ती होती. आमच्या घरीच इन्फंट इंडियाच्या कामाची सुरुवात झाली. विशालच्या वेदनेतून सुरू झालेल्या या कार्याला कोणत्याही विशिष्ट प्रारंभाची गरज लागली नाही. कालौघात आमच्या संस्थेत एड्सग्रस्त बालकांची रीघ लागली.

विशालमागोमाग सूरज आला... नंतर संजय, ज्योती, कोमल, नितीन... घर अपुरे पडू लागले. जागेची शोधाशोध सुरू झाली. मी दिवसभर नोकरीत; संध्या मुलांचा सांभाळ करायची! मग भाड्याने जागा घेतल्या. भाडे भरायची पंचाईत झाली, तेव्हा अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. मुले लहान असताना खाणे-पिणे, शाळा, आरोग्याची देखभाल(ART-CD4) आजारपण.... संस्कार महत्त्वाचे होते. मुलांची संख्या ४५ झाल्यावर संस्थेने स्वत:ची जागा घेतली.

सन २०१४ मध्ये राणी आणि कोमल या दोन मुलींचे पहिले कन्यादान आम्ही केले. समाजातील एचआयव्ही पॉझिटिव्ह वर शोधून, त्याची गृहचौकशी करून, मुलीलाही घर-दार-प्रॉपर्टी पाहण्याचा अधिकार देऊन असे विवाह जुळवण्याचा नवीन पायंडा पाडला. त्यानंतर असे २१ विवाह ‘आनंदग्राम’मध्ये पार पडले. घरापासून बालपणीच वंचित झालेल्या मुलींना हक्काचे घर व आपलेपणाची नाती मिळाली. त्यांच्या पोटी जन्माला आलेली मुले एचआयव्ही निगेटिव्ह असणे, हा मोठा दिलासा झाला!  

हळूहळू वाढत्या वयातील मुलांचे वेगळे प्रश्न डोके वर काढू लागले. स्वतःचे वेगळेपण, समाजाबद्दलचा राग, तिरस्कार, आपले आयुष्य-भविष्य अंधारलेले आहे, अशी भावना. मग समुपदेशन, पुनर्वसन हे प्रश्न पुढे आले. काहींना शासकीय आयटीआयच्या माध्यमातून कौशल्यविकास... काहींना खासगी नोकरी, योग्य जोडीदार शोधून उपवर मुला-मुलींची लग्ने लावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम सुरू झाले. 

काही वर्षांपूर्वी अस्पृश्य ठरवून समाजात हिणकस जिणे वाट्याला आलेल्या एड्सग्रस्तांना हळूहळू समाजाने स्वीकारण्याची ही कहाणी आहे. बदलाचा वेग कमी असेल; पण आपला समाज बदलतो आहे, याचा हा पुरावाच! 

टॅग्स :HIV-AIDSएड्स