शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबईतून पहिलं विमान उड्डाण करेल - मुख्यमंत्री फडणवीस

By admin | Updated: September 13, 2016 18:59 IST

डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं विमान उड्डाण करेल याची खात्री मी देतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - डिसेंबर 2019 मध्ये नवी मुंबई विमानतळावरुन पहिलं विमान उड्डाण करेल याची खात्री मी देतो असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. सोबतच पुणे विमानतळाचा कायापालट करण्यात येणार असून लवकरच हे स्वप्न सत्यात उतरेल असंही सांगितलं आहे. 
 
(2018 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला डिजिटली कनेक्ट करणार)
 
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पायाभूत सुविधांचा विकास कमीत कमी वेळात साधला जाऊ शकतो. यामुळे लोकांचं आयुष्य बदलेल. डिजिटल क्रांतीमुळे महाराष्ट्राचं रुप बदलेल. 2018 पर्यंत संपुर्ण महाराष्ट्रात फायबर कनेक्विव्हिटी करण्यात येईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 
 
(अच्छे दिन गले की हड्डी बन गयी है - नितिन गडकरी)
 
स्त्यांचा दर्जा हा तुमच्या विकासाचा मार्ग असतो असं अटलजी सांगायचे. चांगले रस्ते संधी उपलब्ध करुन देतात. सध्या 6 लाख गावे एकमेकांना जोडली आहेत. पण पंतप्रधानांना प्रत्येक गावाला डिजिटलच्या माध्यमातून जोडायचे आहे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून 8 मंजु-या अडकून होत्या, पण मोदींनी व्हिडिओमध्येच मंजुरी देऊन टाकली. 7 मंजु-या एका दिवसात आणि शेवटची सात दिवसांमध्ये, ही मोदींची काम करण्याची पद्दत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 
 
राज्यातील 10 हजार कोटींचे रेल्वे प्रकल्प गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित आहेत. पुढील 3 वर्षात हे प्रकल्प पुर्ण करणार आहोत यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सहमती दर्शवली आहे. वर्धा - यवतमाळ - नांदेडप्रमाणे अनेक प्रलंबित प्रकल्प होते. एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली. मात्र फंडिंग न मिळाल्याने प्रकल्प प्रलंबित राहिले. आता असं होणार नाही. आम्ही हे प्रकल्प पुर्ण करुन रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुर्गम भागांना जोडणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
(... तर महाडची दुर्घटना टळली असती - नितिन गडकरी)
 
मुंबईतील हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये या कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.  मान्यवरांचं स्वागत आणि कार्यक्रमाची रुपरेषा लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी मांडली. लोकमत समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी कॉनक्लेव्हची संकल्पना विषद केली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं तर समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सर्व मान्यवरांचे आभार लोकमत समुहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मांडले.