शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत आगीचे तांडव

By admin | Updated: September 14, 2014 01:11 IST

सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार

कोट्यवधीची हानी : विषारी वायूने ५५ कामगार बेशुद्धचंद्रपूर : सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार बेशुद्धावस्थेत अडकून पडले होते. मात्र वेळीच सहकाऱ्यांनी त्यांंना बाहेर काढल्याने मोठी प्राणहानी टळली. या आगीत कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारानेच ही घटना घडल्याचा आरोप होत असून कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीलगतच सिनाळा भूमिगत कोळसा खाण आहे. शुक्रवारी रात्रपाळीत पहाटे ४ वाजताच्या सुमारास या खाणीत अचानक आग लागली. सुरुवातीला ही आग कमी प्रमाणात होती. नंतर हळूहळू आगीने रौद्ररुप धारण केले. दरम्यान, या आगीबाबत सुशील गोंडाणे या कामगाराने खाण प्रबंधक एस.एस. तकलक यांना माहिती दिली. मात्र गंभीर बाब ही की, आगीच्या या घटनेकडे येथील उपक्षेत्रीय प्रबंधक ए.सी. हलदर, खाण अधीक्षक संजू मिश्रा यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे, तर खाणीत आग लागली असताना जनरल शिफ्टच्या १०० कामगारांना खाणीत काम करण्यासाठी जबरदस्तीने उतरविले, असा कामगारांचा आरोप आहे. खाणीत ३४० मीटर खोलवर ही आग लागली होती. आग लागली तेव्हा खाणीत १५० कर्मचारी काम करीत होते. दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत मोठ्या प्रमाणात कोळसा जळत असल्याने त्यातून कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारी वायू उत्सर्जित होऊन तो सर्वत्र पसरला. याचवेळी एक्झास्ट फॅन अर्धा ते पाऊण तास बंद होता. वीज पुरवठाही खंडीत झाल्याने कोळसा ज्वलनातून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार घटनास्थळावरच बेशुद्ध झाले. ही बाब लक्षात येताच, काही कामगारांनी प्रसंगावधान राखत बेशुद्ध झालेल्या कामगारांना कसेबसे खाणीबाहेर काढले. त्यामुळे मोठी प्राणहानी टळली. बेशुद्ध झालेल्या कामगारांना लगेच वेकोलिच्या क्षेत्रीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील काही कामगार चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या कामगारांची प्रकृृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. खाणीतील आग अद्याप आटोक्यात आली नसून खाणीतील कोळसा सतत जळत आहे. घटनास्थळावर वीज केंद्राच्या अग्निशमन दलाचे एक वाहन आले. मात्र ही आग २५० ते ३०० मीटर खोल भागात असल्याने आगीवर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही. या आगीत कोट्यवधी रुपयांचा कोळसा जळून राख झाला असून तो अद्यापही जळतच आहे. खाणीच्या आत सर्वत्र कार्बन मोनॉक्साईट पसरल्याने आत जाऊन आग विझविणे कठीण झाले आहे. दरम्यान, खासदार हंसराज अहीर यांनी दुपारी आगग्रस्त खाणीला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. आगीनंतर रेस्क्यू आॅपरेशन राबवून कामगारांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले. त्यांना वेकोलिकडून सन्मानित करण्याच्या सूचना खा. अहीर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. घटनास्थळावर वेकोलिचे मुख्यमहाप्रबंधक आर.के. मिश्रा, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भूजबळ, दुर्गापूरचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. (जिल्हा प्रतिनिधी)