शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत आगीचे तांडव

By admin | Updated: September 14, 2014 01:11 IST

सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार

कोट्यवधीची हानी : विषारी वायूने ५५ कामगार बेशुद्धचंद्रपूर : सिनाळा भूमिगत कोळसा खाणीत शनिवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाली. आगीतून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार बेशुद्धावस्थेत अडकून पडले होते. मात्र वेळीच सहकाऱ्यांनी त्यांंना बाहेर काढल्याने मोठी प्राणहानी टळली. या आगीत कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारानेच ही घटना घडल्याचा आरोप होत असून कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. दुर्गापूर खुल्या कोळसा खाणीलगतच सिनाळा भूमिगत कोळसा खाण आहे. शुक्रवारी रात्रपाळीत पहाटे ४ वाजताच्या सुमारास या खाणीत अचानक आग लागली. सुरुवातीला ही आग कमी प्रमाणात होती. नंतर हळूहळू आगीने रौद्ररुप धारण केले. दरम्यान, या आगीबाबत सुशील गोंडाणे या कामगाराने खाण प्रबंधक एस.एस. तकलक यांना माहिती दिली. मात्र गंभीर बाब ही की, आगीच्या या घटनेकडे येथील उपक्षेत्रीय प्रबंधक ए.सी. हलदर, खाण अधीक्षक संजू मिश्रा यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे, तर खाणीत आग लागली असताना जनरल शिफ्टच्या १०० कामगारांना खाणीत काम करण्यासाठी जबरदस्तीने उतरविले, असा कामगारांचा आरोप आहे. खाणीत ३४० मीटर खोलवर ही आग लागली होती. आग लागली तेव्हा खाणीत १५० कर्मचारी काम करीत होते. दरम्यान, आगीने रौद्ररुप धारण केले. आगीत मोठ्या प्रमाणात कोळसा जळत असल्याने त्यातून कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारी वायू उत्सर्जित होऊन तो सर्वत्र पसरला. याचवेळी एक्झास्ट फॅन अर्धा ते पाऊण तास बंद होता. वीज पुरवठाही खंडीत झाल्याने कोळसा ज्वलनातून निघणाऱ्या विषारी वायूने ५५ कामगार घटनास्थळावरच बेशुद्ध झाले. ही बाब लक्षात येताच, काही कामगारांनी प्रसंगावधान राखत बेशुद्ध झालेल्या कामगारांना कसेबसे खाणीबाहेर काढले. त्यामुळे मोठी प्राणहानी टळली. बेशुद्ध झालेल्या कामगारांना लगेच वेकोलिच्या क्षेत्रीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील काही कामगार चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या कामगारांची प्रकृृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. खाणीतील आग अद्याप आटोक्यात आली नसून खाणीतील कोळसा सतत जळत आहे. घटनास्थळावर वीज केंद्राच्या अग्निशमन दलाचे एक वाहन आले. मात्र ही आग २५० ते ३०० मीटर खोल भागात असल्याने आगीवर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही. या आगीत कोट्यवधी रुपयांचा कोळसा जळून राख झाला असून तो अद्यापही जळतच आहे. खाणीच्या आत सर्वत्र कार्बन मोनॉक्साईट पसरल्याने आत जाऊन आग विझविणे कठीण झाले आहे. दरम्यान, खासदार हंसराज अहीर यांनी दुपारी आगग्रस्त खाणीला भेट दिली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. आगीनंतर रेस्क्यू आॅपरेशन राबवून कामगारांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले. त्यांना वेकोलिकडून सन्मानित करण्याच्या सूचना खा. अहीर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. घटनास्थळावर वेकोलिचे मुख्यमहाप्रबंधक आर.के. मिश्रा, चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू भूजबळ, दुर्गापूरचे ठाणेदार संपत चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. (जिल्हा प्रतिनिधी)