शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

रेल्वेने अग्निशमन विभागच केला बंद

By admin | Updated: November 7, 2014 00:43 IST

भारतीय रेल्वेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग तयार केला गेला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

धोक्याची बाब : कशी होईल प्रवाशांची सुरक्षा?नागपूर : भारतीय रेल्वेत आगीवर नियंत्रण मिळविण्याकरिता ब्रिटिशकाळापासून स्वतंत्र अग्निशमन विभाग तयार केला गेला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने हा विभागच बंद केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. चक्क अग्निशमन विभागच हरविल्याने रेल्वेच्या वेगवेगळ्या विभागात आग लागल्यास ती विझविणार कोण? हा गंभीर प्रश्न असून यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या चालू तिकीट कार्यालयाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानीची घटना घडली नाही. भारतीय रेल्वेत इंग्रजांच्या काळापासून रेल्वेत लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन विभाग अस्तित्वात होता. हा विभाग सुरक्षा विभागांतर्गत कार्यरत होता. सुरक्षा आयुक्त दर्जाचा अधिकारी या विभागाचा प्रमुख होता. या विभागाचे कामकाजही स्वतंत्र असायचे. आगीची सूचना मिळताच या विभागाची रेल्वेगाडी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी पोहोचायची. मात्र, १९९६ साली या अग्निशमन विभागाचे रेल्वे सुरक्षा दलात विलिनीकरण करण्यात आले. तेव्हापासून आगीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी रेल्वेत स्वतंत्र विभागच अस्तित्वात नाही. देशात सर्वाधिक प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला पसंती देतात. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे एखाद्या प्रसंगी मोठी आग लागल्यास मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धावत्या रेल्वेगाडीतही आगीवर नियंत्रण मिळविण्याची कुठलीच यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे आग लागल्यास नजीकच्या अग्निशमन विभागावर अवलंबून राहण्याची पाळी रेल्वेवर येते. एखाद्या वेळी मदत मिळण्यास उशीर झाल्यास मोठी जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण होते. (प्रतिनिधी)अख्खे रेल्वेस्थानक खाक होण्याची भीतीनागपूर रेल्वेस्थानकावर अनेकदा पेट्रोलने भरलेल्या बंबाच्या मालगाड्या उभ्या राहतात. एखाद्या प्रसंगी शॉट सर्किटमुळे आग लागल्यास आणि या पेट्रोलच्या मोठमोठ्या बंबांनी पेट घेतल्यास अख्खे रेल्वेस्थानकच जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोलच्या बंबासह अनेकदा दगडी कोळशाने भरलेल्या मालगाड्याही रेल्वेस्थानकावर उभ्या राहतात. त्यामुळे आग लागल्यास प्लॅटफॉर्मवर आग विझविण्यासाठी कुठलेच उपकरण नसल्याने मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध विभागात लावलेली अग्निशमन उपकरणे प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्याची गरज आहे.कर्मचाऱ्यांना हाताळता येत नाहीत उपकरणमध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काही कार्यालयात रेल्वेने अग्निशमन उपकरणे लावली आहेत. परंतु, कर्मचाऱ्यांना ही उपकरणेच कशी हाताळावी याचे ज्ञान नसल्यामुळे आग लागल्यास आणि अग्निशमन उपकरण असूनही त्याचा काहीच लाभ न होण्याची शक्यता आहे. माजी महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी नागपूरचा दौरा केला असताना त्यांनी बेस किचनला भेट दिली. तेथे स्वयंपाक तयार करणाऱ्या एका कामगाराला त्यांनी अग्निशमन उपकरण हाताळून दाखविण्याची मागणी केली. मात्र आपल्याला ते कसे हाताळावे याची माहिती नसल्याचे या कामगाराने सांगितल्यानंतर ते चांगलेच संतापले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अग्निशमन उपकरण हाताळण्याचे प्रशिक्षण देणेही तेवढेच गरजेचे आहे.