शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

कीर्ती आॅइल मिलला सील ठोकण्याचे आदेश

By admin | Updated: February 7, 2017 19:33 IST

टँकमध्ये स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ९ कामगारांचा गुदमरून मृत्यू झालेल्या प्रकरणाची कामगार संचालनालयाने गंभीर दखल घेतली

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 7 - कीर्ती आॅइल मिलच्या वेस्टेज सेटलमेंट टँकमध्ये स्वच्छता करण्यासाठी गेलेल्या ९ कामगारांचा गुदमरून मृत्यू झालेल्या प्रकरणाची कामगार संचालनालयाने गंभीर दखल घेतली असून, जोपर्यंत या मिलमध्ये सुरक्षेसंदर्भात उपाययोजना केली जात नाही, तोपर्यंत मिलला सिल ठोकण्यात यावे, असे आदेश कामगार संचालनालयाचे संचालक जयंत मोडदरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.१२ नंबर पाटीनजीकच्या नवीन एमआयडीसी परिसरात कीर्ती आॅइल मिलमध्ये वेस्टेज सेटलमेंट टँकची स्वच्छता करताना ९ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना ३० जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी वेगवेगळ्या विभागांकडून ८ दिवसांत कीर्ती आॅइल मिलची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे. राज्याच्या कामगार संचालनालयाच्या कारखाना विभागाच्या वतीनेही आॅइल मिलचा पंचनामा आणि पाहणी करण्यात आली आहे. या पाहणीसाठी कामगार संचालनालयाच्या कारखाना विभागाचे राज्य संचालक जयंत मोडदरे हे लातुरात आले होते. त्यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत कारखाना व्यवस्थापनाने सुरक्षेबाबत अक्षम्य निष्काळजी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची संचालक मोडदरे यांनी गंभीर दखल घेतली असून, सुरक्षेच्या संदर्भात जोपर्यंत कारखाना व्यवस्थापनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत, तोपर्यंत कारखाना सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत. याबाबतचे पत्रही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पाठविले आहेत, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग नांदेडचे सहाय्यक संचालक महेश भालेकर यांनी दिली.

प्रदूषण मंडळाकडूनही होणार कारवाईकीर्ती मिलमधील ९ कामगारांच्या मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या लातूर उपप्रादेशिक विभागाने तातडीने दुसऱ्या दिवशी पाहणी करून यासंदर्भातील अहवाल औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविला आहे. शिवाय, औरंगाबाद प्रादेशिक अधिकारी जेबी़ संगेवार यांनी मिलला भेट दिली आहे. या प्रकरणी येत्या दोन दिवसांत मील व्यवस्थापनावर कारवाई होणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी व्ही. पी. शेळके यांनी दिली.मिल व्यवस्थापनावर पाच खटलेकीर्ती आॅईलमधील वेस्टेज सेटलमेंट टँकची करताना ९ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी कामगार आयुक्तालयाच्या वतीने मील व्यवस्थापनाविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे पाच खटले न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. या पाच खटल्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यातील कामगार कायद्यानुसार काही खटले दाखल करण्यात आले आहेत. तर कामगारांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी कामगार न्यायालयातही खटले चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती कामगार आयुक्त बी. पी. पाटील यांनी दिली.