शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

शेतक-यांच्या आत्महत्यांवर उपाय सापडेना!

By admin | Updated: December 28, 2014 00:41 IST

कृषीमंत्र्यांची अगतिकता; नैराश्य घालविण्यासाठी जोडधंदा करण्याचा सल्ला.

अकोला : राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर नेमका उपाय सापडत नसून, शंभर टक्के आत्महत्या थांबतील यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही, अशी अगतिकता कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी अकोला येथे व्यक्त केली. शेतकर्‍यांचे नैराश्य घालविण्यासाठी शेतीपुरक जोडधंद्याशिवाय तरणोपाय नाही, असेही ते म्हणाले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी कृषीमंत्री खडसे बोलत होते. दुष्काळामुळे नापिकी आल्याने राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्येचे लोण आता पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यासंदर्भात खडसे म्हणाले, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या हे शेती क्षेत्रापुढे मोठे आव्हान असून, शेतकर्‍यांतील नैराश्य घालविण्यासाठी व्यापकतेने काम करावे लागणार आहेत. शेतकर्‍यांनी शेतीपुरक जोडधंदा, प्रक्रिया उद्योग, दुग्धोपादनासारखे व्यवसाय अधिक वृध्दींगत करण्यावर शासनाचा भर असल्याचे ते म्हणाले. * शेतीसाठी उपाययोजनाशेतकर्‍यांना ४0 शेळ्या आणि दोन बोकड देणार असून अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकर्‍यांना निशुल्क गायींचे वाटप केले जाईल. सुक्ष्म, सरंक्षित सिंचनासाठी शेततळ्य़ांची योजना नव्याने राबविण्यात येतील. याकरीता २0 लाखाचे अनुदान शेतकर्‍यांना दिले जाणार आहे. शेततळ्य़ातून पाणी घेण्यासाठी सौरउज्रेवरील पंपदेखील देण्यात येतील. यासाठी ४.१0 लाखाचे अनुदान दिले जाईल. सुक्ष्म सिंचन योजनेचे साहित्य घेण्यासाठी अनुदान वाढवून दिले जाणार असून, आठ दिवसात हे अनुदान त्यांना मिळेल. शेतीसंबधी हजारो प्रलंबीत तक्रारीचा निपटारा करण्यासाठी राज्यात छोटी न्यायालये स्थापन्याचे प्रयत्न सुरू असून, जिथे शेत तिथे खडीकरणाचा रस्ता तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माती परिक्षणाचा अहवाल कृषी कार्ड शेतकर्‍यांना घरपोच दिले जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.