शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या आत्महत्यांवर उपाय सापडेना!

By admin | Updated: December 28, 2014 00:41 IST

कृषीमंत्र्यांची अगतिकता; नैराश्य घालविण्यासाठी जोडधंदा करण्याचा सल्ला.

अकोला : राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर नेमका उपाय सापडत नसून, शंभर टक्के आत्महत्या थांबतील यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही, अशी अगतिकता कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी अकोला येथे व्यक्त केली. शेतकर्‍यांचे नैराश्य घालविण्यासाठी शेतीपुरक जोडधंद्याशिवाय तरणोपाय नाही, असेही ते म्हणाले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी कृषीमंत्री खडसे बोलत होते. दुष्काळामुळे नापिकी आल्याने राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्येचे लोण आता पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे. यासंदर्भात खडसे म्हणाले, शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या हे शेती क्षेत्रापुढे मोठे आव्हान असून, शेतकर्‍यांतील नैराश्य घालविण्यासाठी व्यापकतेने काम करावे लागणार आहेत. शेतकर्‍यांनी शेतीपुरक जोडधंदा, प्रक्रिया उद्योग, दुग्धोपादनासारखे व्यवसाय अधिक वृध्दींगत करण्यावर शासनाचा भर असल्याचे ते म्हणाले. * शेतीसाठी उपाययोजनाशेतकर्‍यांना ४0 शेळ्या आणि दोन बोकड देणार असून अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकर्‍यांना निशुल्क गायींचे वाटप केले जाईल. सुक्ष्म, सरंक्षित सिंचनासाठी शेततळ्य़ांची योजना नव्याने राबविण्यात येतील. याकरीता २0 लाखाचे अनुदान शेतकर्‍यांना दिले जाणार आहे. शेततळ्य़ातून पाणी घेण्यासाठी सौरउज्रेवरील पंपदेखील देण्यात येतील. यासाठी ४.१0 लाखाचे अनुदान दिले जाईल. सुक्ष्म सिंचन योजनेचे साहित्य घेण्यासाठी अनुदान वाढवून दिले जाणार असून, आठ दिवसात हे अनुदान त्यांना मिळेल. शेतीसंबधी हजारो प्रलंबीत तक्रारीचा निपटारा करण्यासाठी राज्यात छोटी न्यायालये स्थापन्याचे प्रयत्न सुरू असून, जिथे शेत तिथे खडीकरणाचा रस्ता तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माती परिक्षणाचा अहवाल कृषी कार्ड शेतकर्‍यांना घरपोच दिले जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.