शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रस्तेवाढीचा मार्ग सापडेना! जिल्हा अन् ग्रामीण रस्त्यांची लांबी ‘जैसे थे’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 04:09 IST

रस्ते बांधण्याची मोठमोठी आकडेवारी सरकारकडून दिली जात असताना आज प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात जिल्हा व ग्रामीण रस्त्यांची लांबी गेल्या तीन वर्षांत वाढलीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मुंबई  - रस्ते बांधण्याची मोठमोठी आकडेवारी सरकारकडून दिली जात असताना आज प्रसिद्ध झालेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात जिल्हा व ग्रामीण रस्त्यांची लांबी गेल्या तीन वर्षांत वाढलीच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.२०१४-१५ मध्ये प्रमुख जिल्हा मार्गांची लांबी ५०५८५ किलोमीटर होती. २०१५-१६ मध्ये ती केवळ २५९ किलोमीटरने वाढून ५०८४४ किमी इतकी झाली. २०१६-१७ मध्ये ५२६३७ किमी इतका आहे. इतर जिल्हा रस्त्यांची आकडेवारी अशी : २०१४-१५ - ५८११५ किमी, २०१५-१६ - ५८११६ किमी आणि २०१६-१७ - ५८११६ किमी.ग्रामीण रस्त्यांमध्येही वाढ होऊ शकली नाही. २०१४-१५ मध्ये १४५८७९ किमी, २०१५-१६ मध्ये १४५८८१ किमी तर २०१६-१७ मध्ये ग्रामीण रस्त्यांची लांबी १४५८८१ किमी इतकी होती.राष्ट्रीय महामार्गाचे प्रमाण मात्र वाढले. २०१४-१५ मध्ये राज्यात ४७६६ किमीचे राष्ट्रीय महामार्ग होते. २०१५-१६ मध्ये हा आकडा ७४३८ किमीवर गेला तर २०१६-१७ मध्ये हा आकडा १२२७५ किमीवर गेला. त्याचवेळी २०१४-१५ मध्ये ६१६३ किमीचे प्रमुख राज्य महामार्ग होते. ते २०१५-१६ मध्ये ५१८० किमी झाले तर २०१६-१७ मध्ये े ३८६१ किमी इतके झाले. प्रमुख राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाल्याने हा आकडा कमीकमी होत गेल्याची शक्यता आहे.रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे आणि ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारणे यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मार्च २०१७ पर्यंत ८६३४ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. २०१७-१८ मध्ये डिसेंबरपर्यंत १६१४ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात आला आणि त्यावर २ हजार २५० कोटी रुपये खर्च करण्यात आले.गेल्या ५३ वर्षांत राज्याने रस्तेबांधणीत विक्रमी काम केले. १९६५-६६मध्ये राज्यातील एकूण रस्त्यांची लांबी केवळ ५१७८८ किमी होती. २०१६-१७ मध्ये ती ३ लाख ३ हजार ३५९ किमी इतकी झाली. १७ हजार ५२४ किमीचे ग्रामीण रस्ते १ लाख ४५ हजार ८८१ किमीवर गेले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र