शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

माझ्या काळजाच्या तुकड्याला शोधा!

By admin | Updated: May 28, 2017 01:20 IST

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल व त्याचा भाऊ गणपत भिल्ल हे बेपत्ता होऊन आठ दिवस उलटले. परंतु अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.

- मतीन शेख/ विनायक वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश भिल्ल व त्याचा भाऊ गणपत भिल्ल हे बेपत्ता होऊन आठ दिवस उलटले. परंतु अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. माझ्या मुलाने शौर्य दाखवून बुडत असलेल्या मुलाला वाचविले आता माझ्या काळजाच्या तुकड्यांना शोधून आणण्याचे शौर्य कोणी दाखवेल काय?, अशी आर्त हाक नीलेशची आई सुंदराबाई यांनी दिली आहे. कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथील गावकुसाबाहेर आशापुरी देवी मंदिरामागे रेवाराम भिल्ल व त्यांचा परिवार वास्तव्यास आहे. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब नीलेशमुळे प्रकाशझोतात आले. कोथळी येथे मुक्ताई मंदिरानजीकच्या जलाशयात बुडत असताना भागवत ओंकार उगले (रा. बुलडाणा) यास ३० आॅगस्ट २०१५ रोजी नीलेशने वाचविले होते. नीलेशच्या अतुलनीय शौर्याबद्दल २६ जानेवारी २०१६ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देवून त्याला गौरविले. त्यानंतर सेल्फी वुइथ नीलेशपासून नीलेशसोबत फोटो काढून अनेकांनी त्याच्या सत्काराचे भांडवल करून घेतले. पुढारी, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी अगदी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी चारचाकी गाड्यांमधून धुळ उडवीत गावकुसाबाहेरील त्याच्या घरापर्यंत गेले. नीलेशचे कुडाचे घर पाहून त्याला मदत करण्याची भाषाही अनेकांनी केली. त्याच्या कुटुंबीयांच्या जीवनात कोणताही फरक पडला नाही. पुत्राच्या शौर्याने आकाश ठेंगणे झालेले त्याचे कुटुंब आज व्याकुळ होऊन नीलेश व गणपतंच्या घरी परतण्याची वाट पाहत आहेत. बकऱ्या चरायला न नेल्याने भीतीतून घर सोडलेबकऱ्या चरण्यासाठी न नेल्याने वडील रागावतील म्हणून भीतीपोटी नीलेशने १६ मे रोजी घर सोडले. दोन दिवसांनी तो घरी आला व गिट्टी मशीन लगतच्या शेडमध्ये झोपला. आई-बाबा बाहेर गेल्याचे पाहून गुरुवारी तो सकाळी ९.३० ला निघाला. भाऊ जात असल्याचे पाहून गणपत त्याच्या मागे लागला. मग नीलेश त्यालाही घेऊन बाहेर पडला.पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशीमुले अल्पवयीन असल्याने पोलिसांनीही अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाने गंभीरपणे दखल घेतली आहे. अगदी २१ मे रोजी पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत माहिती घेण्यात आली. एकलव्य सेनाही त्याच्या शोध मोहिमेत लागली आहे. कुडाचे घरनीलेशचे घर म्हणजे १२ पत्रांचे फक्त छप्पर आहे. भिंतीच्या आडोशाला एका पत्र्याच्या पेटीत नीलेशचा सन्मान केलेला साहित्य जपून ठेवण्यात आले आहे. नीलेशच्या बातम्या टीव्हीवर येतात म्हणून महिन्याभरापूर्वी हप्त्याने घेतलेला आठ हजार रुपये किमतीचा टीव्ही जसाचा तसा खोक्यात पडून होता.सत्कारात मिळालेली सायकल नादुरुस्त आहे. पैसे नसल्याने ती छपरावर ठेवण्यात आली आहे.आई-वडिलांची पायपीटदोन मुलांच्या विरहातील रेवराम व सुंदराबाई भिल यांची गावोगावी मुलांच्या शोधासाठी पायपीट सुरू आहे. पहाटेपासून दोघे जण पाणावलेल्या डोळ््यांनी भेटेल त्याला पोरं दिसली का?, विचारतात. अंधार पडला घरी परतात. उघड्या घरातून शौर्यपदक चोरीला जाऊ नये, म्हणून त्याची आई ते स्वत: जवळच ठेवते. चूल पेटली नाही : प्रस्तुत प्रतिनिधी त्याच्या घरी गेले तेव्हा नीलेशची आई भांडी घासत होती. परंतु ते भांडे सात दिवसांपूर्वी स्वयंपाक केलेले होते. त्यांच्या घरात आठ दिवसांपासून चूल पेटलेली नव्हती.