शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वित्ताविना रखडले ज्येष्ठांचे धोरण!

By admin | Updated: May 10, 2016 04:12 IST

ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वर्षांवरून ६० वर्षे करण्यास सामाजिक न्याय विभागाने मान्यता दिलेली असताना वित्त विभागाने आता खो घातला आहे.

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वर्षांवरून ६० वर्षे करण्यास सामाजिक न्याय विभागाने मान्यता दिलेली असताना वित्त विभागाने आता खो घातला आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षे करण्यात येईल, अशी घोषणा डिसेंबर २०१५च्या नागपूर विधिमंडळ अधिवेशनात केली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. बडोले यांच्या विभागाने त्यासाठीचा प्रस्ताव तयार केला, पण गेले दीड वर्ष तो अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे शासनावर वित्तीय भार येणार असल्याने संबंधित विभागांचे अभिप्राय घ्यावेत, असे सांगत वित्त विभागाने तूर्त प्रस्तावाला खो घातला आहे. ज्येष्ठ नागरिकासाठीची वयोमर्यादा ६५ ऐवजी ६० केल्यास आर्थिक भार येईल तो केवळ एसटी महामंडळावर. एसटीच्या प्रवास सवलतीची रक्कम ज्या घटकांना लागू होते त्या घटकांशी संबंधित विभागाकडून ती भरली जाते. सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० करून त्या अनुषंगाने येणारा आर्थिक भार सहन करण्याची तयारी आधीच दर्शविली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा कमी करण्याचा निर्णय रखडला आहे, अशी कबुली मंत्री बडोले यांनी दिली. ते म्हणाले, आमच्या विभागामुळे हे घडलेले नाही. वित्त विभागाने लवकरात लवकर मान्यता द्यावी अशी अपेक्षा आहे. ज्येष्ठ नागरिक धोरण सप्टेंबर २०१३ मध्ये तत्कालिन आघाडी सरकारने जाहीर केले होते. आज ३० महिने उलटले तरी या धोरणाचा शासकीय आदेश निघालेला नाही. त्यामुळे धोरणातील एकाही बाबीची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. ज्येष्ठ नागरिकासाठीची वयोमर्यादा आधी ६० वर्षेच होती. आघाडी सरकारने २०१३ मध्ये ती ६५ वर्षे केली होती. (विशेष प्रतिनिधी)पेन्शनचीही प्रतीक्षाच दारिद्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना श्रावण बाळ योजनेंतर्गत ६०० रुपये पेन्शन दिली जाते. ती एक हजार रुपये करण्याची घोषणाही सरकारने केली होती. त्याचीही अद्याप अंमलबजावणी नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक परिषद आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक कार्यकारी समिती स्थापन करून दोन्हींमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत सातत्याने आढावा घेणे अपेक्षित असते. मात्र, या दोन्हींची स्थापना करण्यास फडणवीस सरकारला अद्याप वेळ मिळालेला नाही. केवळ घोषणा करायची आणि प्रत्यक्षात ज्येष्ठ नागरिकांना काहीही द्यायचे नाही, हेच सरकारचे धोरण दिसते. अण्णासाहेब टेकाळे उपाध्यक्ष ,महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ