शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सुभाष देशमुखांनी सांगितलं, भाजपमधील इनकमिंगचं खरं कारण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 17:52 IST

'टी विथ लिडर' या लोकमतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तसेच देशाच राजकारण जसं मोदींच्या अवतीभवती फिरतं त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसच केंद्रबिंदू असल्याचे देशमुख यांनी अवर्जुन सांगितले.

- राजा माने

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा झपाटा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष कार्यापद्धतीमुळे देशातील आणि राज्यातील जनता भाजपच्या पाठिशी उभी आहे. यामुळेच भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाचे कौतुक करताना सहकारमंत्री आणि दक्षिण सोलापूरचे भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांनी भाजपमध्ये झालेल्या इनकमिंगचे कारण सांगितले.

'टी विथ लिडर' या लोकमतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. तसेच देशाच राजकारण जसं मोदींच्या अवतीभवती फिरतं त्याचप्रमाणे राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसच केंद्रबिंदू असल्याचे देशमुख यांनी अवर्जुन सांगितले.

- दक्षिण सोलापूरमध्ये दरवेळी होणारी चुरशीची लढत यावेळी पाहायला मिळत नाही. ही निवडणूक सोपी झाली असं आम्ही एकतोय ?देशमुख : 20 वर्षापासून मी राजकारणात आहे. राजकारणाचा गंध नसताना 1998 मध्ये मला भारतीय जनता पक्षाने राजकारणात आणलं. 2004 मध्ये मी सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नीविरुद्ध सोलापूरमधून पहिल्यांदा लोकसभेला लढलो. त्यानंतर 2009 मध्ये मी माढा मतदार संघातून लढलो. शरद पवारांविरुद्ध माझा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये तुळजापूरमधून विधानसभा निवडणूक लढविण्यास सांगितले. तर 2014 मध्ये युती तुटल्यानंतर अखेरच्या क्षणी मला दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांमुळे भारताची प्रतिमा जगात उंचावली आहे. शेतकरी, गरीब आणि शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोदींनी आखलेल्या धोरणामुळे हे सरकार जनतेला आपलंस वाटतं आहे. जनतेचा विश्वास नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतून दिसून आला. महाराष्ट्रात देखील केंद्राप्रमाणेच पुनरावृत्ती होईल. मुख्यमंत्र्यांनी राज्यावर आलेली संकट कोणताही आवाज न होता चाणाक्षपणे हाताळली. कर्जमाफी, घरकूल, जलयुक्तशिवार या योजनांमुळे विरोधकांना विजयाची शाश्वती राहिली नाही, म्हणून ते भाजपमध्ये येत आहेत, असंही देशमुख म्हणाले.

- विरोधक बोलत नसले तरी, शिवसेना नियमीत सरकारच्या कामावर आक्षेप नोंदवते. कर्जमाफीवरून सेनेने आक्षेप नोंदवला असून कर्जमुक्तीची भूमिका घेतली. यावर का वाटते ?देशमुख : शिवसेना असो, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असो या सर्व पक्षांची धोरणं ठरलेली असतात. त्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटतं की आपला पक्ष मोठा व्हावा. शिवसेनेच्या कर्जमुक्तीच्या बाबतीत म्हणाल, तर फडणवीस यांची भूमिका सुरुवातीपासूनच कर्जमुक्तीची आहे. मोदी आणि फडणवीस यांना देश आणि महाराष्ट्र वैभवशाली करायचा आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संपन्न करायचा आहे. या भूमिकेप्रमाणेच पक्ष नेतृत्वाकडून कृती करण्यात येत आहे.

- विरोधीपक्षातील नेत्यांच्या इनकमिंगसाठी तुम्ही गळ लावून बसले नव्हते ?देशमुख : आम्ही कुणालाही आमच्या पक्षात या म्हणून निमंत्रण दिले नाही. परंतु, जनतेने या नेत्यांच्या कानात सांगितले की, आता आम्ही तुमच्यासोबत राहू शकणार नाही. तुम्ही भाजपमध्ये गेलात तर आम्ही तुमच्यासोबत राहू. त्यामुळेच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

दक्षिण सोलापूर मतदारसंघातील लढाई लुटूपुटू ठरतेय का, येथील राजकारण तुमच्या मते कसं आहे ?देशमुख : मला असं वाटतं की, कोणतीही निवडणूक लुटूपुटू नसते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची भूमिका नेतृत्व ठरवत असते. या मतदार संघात अनेकदा बदल झालेले. सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना याच मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. मात्र मागील साडेतीन वर्षांतील मंत्रीपदाच्या कार्यकाळात हदवाढ भागातील कामं केलीत. कचरा व्यवस्थापन, रस्त्याचं जाळ आम्ही विनले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ रुग्णांच्या उपचारासाठी सात ते आठ कोटींचा निधी मला दिला. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं स्वप्न मुख्यमंत्र्यांनी पाहिलेलं आहे. जनता देखील हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला साथ देईल, असं मला वाटतं.