शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

फिल्मस्टार बिगड गए है

By admin | Updated: January 10, 2016 01:04 IST

केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी शनिवारी असहिष्णुतेच्या मुद्यावरून चित्रपट अभिनेत्यांवर सडकून टीका केली. फिल्मस्टार बिगड गए है. त्यांनी अभिनय सोडून राजकारणात

औरंगाबाद : केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी शनिवारी असहिष्णुतेच्या मुद्यावरून चित्रपट अभिनेत्यांवर सडकून टीका केली. फिल्मस्टार बिगड गए है. त्यांनी अभिनय सोडून राजकारणात यावे, म्हणजे त्यांना त्यांची योग्यता कळेल, असे आव्हान त्यांनी दिले.देशात डाव्या विचारांच्या लोकांची असहिष्णुता वाढीस लागल्याचा आरोपही त्यांनी केला. पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या विभागीय संमेलनानिमित्त उमा भारती शनिवारी औरंगाबादेत आल्या होत्या. भाजपा परिवारातील एका नेत्याने यावर्षी अयोध्येत राममंदिर उभारण्याचे काम सुरू होईल, असे वक्तव्य केले आहे. त्याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर त्या म्हणाल्या, राममंदिराविषयी कुणी वक्तव्य केले असेल तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. गजेंद्र चौहान यांच्या विरोधात पुण्यात निदर्शने होत आहेत. दिल्ली विद्यापीठात सुब्रह्मण्यम स्वामींना प्रवेश करण्यापासून अडविले जात आहे. ही असहिष्णुता नव्हे तर काय आहे. आमीर खानची सुरक्षा काढली म्हणून आमच्याकडे खुलासा मागितला जातो. एखाद्या व्यक्तीला किती धोका आहे, यावरून त्याची सुरक्षा कमी-अधिक केली जाते. तरीही सरकारला दोषी ठरविले जाते. (प्रतिनिधी)नोकरशाहीची नकारात्मताबाहेरच्या चांगल्या गोष्टी बघून आमच्यात प्रचंड ऊर्जा संचारते. त्यापासून प्रेरणा घेऊन इतरत्रही त्याची अंमलबजावणी करण्याचे आम्ही ठरवितो. मंत्रालयात पोहोचल्यावर आमच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. थंड डोक्याचे नकारात्मक विचारांचे अधिकारी ती गोष्ट कशी होऊ शकत नाही, याच्या कारणांचा पाढाच वाचतात, असे भारती यांनी सांगितले. जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेत (वाल्मी) आयोजित पाणी वापर संस्थांच्या अध्यक्षांच्या विभागीय परिषदेत देशातील ९० पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.