शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

भूसंपादनाविरोधात देशभर जेल भरो

By admin | Updated: March 3, 2015 02:04 IST

केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमी संपादन कायद्यात सुधारणा करावी व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे.

पारनेर (अहमदनगर) : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी भूमी संपादन कायद्यात सुधारणा करावी व जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दिल्लीसह देशभर जेल भरो आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे.वर्धा येथे ९ मार्चला नियोजन बैठक होणार आहे. त्यानंतर आंदोलनाला गती देण्यात येणार आहे, असे अण्णांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे. केंद्र सरकारने नवीन भूमी संपादन कायद्याचा वटहुकूम काढला़ हा कायदा उद्योजकांच्या फायद्यासाठीच केल्याचा आरोप करीत हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात जंतरमंतरवर आंदोलन केले़ आंदोलनात देशभरातील शेतकरी संघटनांनी धरणे धरून सहभाग नोंदविला होता. त्यानंतर विरोधी पक्षांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायद्यामध्ये बदलाचे संकेत दिले होते; पण त्यात सुधारणा झाली नसल्याचे अण्णा हजारे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढणार आहोत, असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.सुमारे दोन ते अडीच महिन्यांच्या या यात्रेनंतर रामलीला मैदानावर जेल भरो आंदोलन होणार असल्याचे अण्णांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. देशभरात गाव व तालुका पातळीपासून सर्वस्तरावर जेल भरो आंदोलन होणार असल्याचेही अण्णांचे साहाय्यक दत्ता आवारी व शाम पठाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)च्भूमी संपादन कायद्याचा वटहुकूम उद्योजकांसाठीचच्वर्धा ते दिल्ली पदयात्रा काढणारच्देशभरात गाव व तालुका पातळीपासून सर्वस्तरावर होणार जेल भरो आंदोलन