शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

भरावामुळे नाल्याचे पाणी अंगणात

By admin | Updated: August 3, 2016 03:26 IST

मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली

चिकणघर : ढाबाचालकाने नाल्यात मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. काटई गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा पारंपारिक नाला मातीचा भराव टाकून एका ढाबाचालकाने अडविला आहे. त्यामुळे अंगणात पाणी शिरल्याची तक्र ार अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. त्यावर आयुक्तांनी तक्र ार गांभीर्याने घेत केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अंगणात सतत पाणी साचत असल्याने साथीच्या रोगांच्या भिती असल्याचे चौधरी यांनी फडवणीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेने अजूनही लक्ष न दिल्यास उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे. एकीकडे गावांचा केडीएमसी समावेशाला जोरदार विरोध असतानाही १ जून २०१५ च्या अधिसूचनेनूसार २७ गावांना केडीएमसीत समाविष्ट करण्यात आले. तर दुसरीकडे मात्र केडीएमसीचे अधिकारी आणी कर्मचाऱ्यांचे समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे संघर्ष समितीही गांभीर्याने पाहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका पूजा पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>पालिकेतील समावेशाला गावांचा विरोध असतानाही त्यांचा समावेश जाला. त्यानंतरही साध्या-साध्या समस्यांकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीच ही गावे पालिकेतून पुन्हा वेगळी करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. >केडीएमसीने अ‍ॅड. सुनील चौधरी यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेतली आहे. दोन दिवसांत समस्या दूर केली जाईल.- प्रभाकर पवार, ई प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी.