शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

भरावामुळे नाल्याचे पाणी अंगणात

By admin | Updated: August 3, 2016 03:26 IST

मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली

चिकणघर : ढाबाचालकाने नाल्यात मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. काटई गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा पारंपारिक नाला मातीचा भराव टाकून एका ढाबाचालकाने अडविला आहे. त्यामुळे अंगणात पाणी शिरल्याची तक्र ार अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. त्यावर आयुक्तांनी तक्र ार गांभीर्याने घेत केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अंगणात सतत पाणी साचत असल्याने साथीच्या रोगांच्या भिती असल्याचे चौधरी यांनी फडवणीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेने अजूनही लक्ष न दिल्यास उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे. एकीकडे गावांचा केडीएमसी समावेशाला जोरदार विरोध असतानाही १ जून २०१५ च्या अधिसूचनेनूसार २७ गावांना केडीएमसीत समाविष्ट करण्यात आले. तर दुसरीकडे मात्र केडीएमसीचे अधिकारी आणी कर्मचाऱ्यांचे समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे संघर्ष समितीही गांभीर्याने पाहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका पूजा पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>पालिकेतील समावेशाला गावांचा विरोध असतानाही त्यांचा समावेश जाला. त्यानंतरही साध्या-साध्या समस्यांकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीच ही गावे पालिकेतून पुन्हा वेगळी करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. >केडीएमसीने अ‍ॅड. सुनील चौधरी यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेतली आहे. दोन दिवसांत समस्या दूर केली जाईल.- प्रभाकर पवार, ई प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी.