शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

भरावामुळे नाल्याचे पाणी अंगणात

By admin | Updated: August 3, 2016 03:26 IST

मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली

चिकणघर : ढाबाचालकाने नाल्यात मातीचा भराव टाकल्याने पाणी अंगणात शिरत असल्याची तक्रार काटई येथील अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. मात्र, त्यावर कार्यवाही न झाल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. काटई गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा पारंपारिक नाला मातीचा भराव टाकून एका ढाबाचालकाने अडविला आहे. त्यामुळे अंगणात पाणी शिरल्याची तक्र ार अ‍ॅड. सुनील चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्या जनता दरबारात केली होती. त्यावर आयुक्तांनी तक्र ार गांभीर्याने घेत केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अंगणात सतत पाणी साचत असल्याने साथीच्या रोगांच्या भिती असल्याचे चौधरी यांनी फडवणीस यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे. महापालिकेने अजूनही लक्ष न दिल्यास उपोषण केले जाईल, असा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे. एकीकडे गावांचा केडीएमसी समावेशाला जोरदार विरोध असतानाही १ जून २०१५ च्या अधिसूचनेनूसार २७ गावांना केडीएमसीत समाविष्ट करण्यात आले. तर दुसरीकडे मात्र केडीएमसीचे अधिकारी आणी कर्मचाऱ्यांचे समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांना जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याकडे संघर्ष समितीही गांभीर्याने पाहत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबत स्थानिक नगरसेविका पूजा पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.>पालिकेतील समावेशाला गावांचा विरोध असतानाही त्यांचा समावेश जाला. त्यानंतरही साध्या-साध्या समस्यांकडे पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनीच ही गावे पालिकेतून पुन्हा वेगळी करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांचे समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आहे. >केडीएमसीने अ‍ॅड. सुनील चौधरी यांच्या तक्र ारीची गंभीर दखल घेतली आहे. दोन दिवसांत समस्या दूर केली जाईल.- प्रभाकर पवार, ई प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी.