शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 03:14 IST

शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे

ठाणे : येत्या महिनाभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. परंतु, शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळातही हीच परिस्थिती राहू शकते. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले आहेत. रविवारी झालेल्या मुसळधार पावसात घोडबंदरच्या अनेक भागांत पाणी साचले होते. तर, या भागातील मोठ्या गृहसंकुलांच्या आवारातील परिसर जलमय झाला होता. दीड ते दोन फूट पाणी साचल्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. याच मुद्यावरून बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा सुरू असतानाच काही सदस्यांनी शहरातील अनेक भागांतील रस्त्यांवर खड्ड्यांच्या मुद्याला हात घातला. घोडबंदर भागात सेवारस्त्यांवर तयार करण्यात आलेले नवे कोरे रस्ते उखडले असून या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तसेच शहरातील अन्य भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे ठाणेकरांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्याचे सांगत सदस्यांनी प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. तसेच गणेशोत्सव एक महिन्यावर येऊन ठेपला असल्याने त्यापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी केली. दरम्यान, घोडबंदरच्या सेवारस्त्यांवर खड्डे पडल्याचे प्रशासनाने मान्य केले. त्याचे कारणही स्पष्ट केले. >विकासकामांमुळे पडले खड्डे कापूरबावडी ते पातलीपाड्यापर्यंतच्या सेवारस्त्याचे काम चार वर्षांपूर्वी केले होते. तर, पातलीपाडा ते गायमुखपर्यंतच्या सेवारस्त्याचे काम चार महिन्यांपूर्वी करण्यात आले. चार वर्षांपूर्वी झालेल्या रस्त्याखाली मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे तर चार महिन्यांपूर्वी बांधलेल्या रस्त्याशेजारी स्लॅब कल्व्हर्टचे काम करण्यात आले. यामुळे या दोन्ही रस्त्यावर खड्डे पडल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रशासनाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सदस्यांचे समाधान झाले आणि त्यांनी गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी लावून धरली. अखेर, सभापती वाघुले यांनी शहर खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले.