शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार

By admin | Updated: July 31, 2014 04:13 IST

काँगे्रस-राष्ट्रवादी सरकारने १५ वर्षे फक्त लुटण्याचे काम केले आहे

नवी मुंबई : काँगे्रस-राष्ट्रवादी सरकारने १५ वर्षे फक्त लुटण्याचे काम केले आहे. या निवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ असून महायुतीची सत्ता आल्यानंतर घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे मत भाजपा प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये माजी आमदार मंदा म्हात्रे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या वेळी फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठविली. सत्ताधाऱ्यांनी राज्याचा सत्यानाश केला आहे. आघाडीच्या काळात फक्त नेते मोठे झाले, जनतेच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली. दहशतवादी हल्ल्याला ६ वर्षे झाली तरी मुंबईत सीसी टीव्ही लावण्यात आलेले नाहीत. या घोटाळेबाजांना किती दिवस सहन करणार? येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. महायुतीचे सरकार आले की सर्व घोटाळेबाजांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. नवी मुंबई स्वत:च्या बापाची समजून येथील सत्ताधारी कारभार करीत आहेत. त्यांचे कंबरडे या निवडणुकीत मोडले जाईल, असेही ते म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही सरकारवर टीका केली. या सरकारने काहीच कामे न करता राज्यावर ३ लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांना स्वत:साठी व्हाइट हाऊस बांधायला वेळ आहे, पण अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक बांधता आले नसल्याची टीकाही केली. मेळाव्याचे आयोजक व माजी आमदार मंदा म्हात्रे यांनीही पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कारभारावर टीका केली. २० वर्षे राष्ट्रवादीत काम केले, परंतु येथील नेतृत्वाने सातत्याने दुय्यम वागणूक दिल्याची टीका केली. सत्ताधाऱ्यांनी एफएसआय व विकासाचे फक्त राजकारण केल्याचे मतही व्यक्त केले. या वेळी माजी आमदार संजय केळकर, विजय चौगुले, वैभव नाईक, विठ्ठल मोरे, सिद्राम होवाळ, विजया घरत व इतर मान्यवर उपस्थित होते.