शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

फेरीवाल्यांना मारण्यापेक्षा सीमेवर लढावे, फेरीवाल्यांना हटवणे भारतीय संविधानाविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 06:09 IST

भाईंदर : दिवाळीत धंद्याच्या काळात ठाणे आणि कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून शौर्य दाखवण्यापेक्षा मनसैनिकांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढून दाखवावे, असा खोचक सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत दिला.

भाईंदर : दिवाळीत धंद्याच्या काळात ठाणे आणि कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून शौर्य दाखवण्यापेक्षा मनसैनिकांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढून दाखवावे, असा खोचक सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत दिला. मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी होतोय याचा राग त्या गरीब परप्रांतीय फेरीवाल्यांवर का काढता, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.फेरीवाल्यांना हटवणे भारतीय संविधानाविरोधात आहे. पुन्हा असे घडले तर आम्ही त्याचे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला. फेरीवाले आपले पोट इमानदारीने भरतात, ते चोरीचपाटी करीत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुढील महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असून त्यात आमचा रिपब्लिकन पक्ष उमेदवार उभा न करता भाजपालाच पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेथे भाजपाला अथवा लोकशाही पुरोगामी आघाडीला बहुमत मिळाल्यास रिपब्लिकन पक्षालाही सत्तेत सामावून घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वाढत्या महागाईमुळे गरिबांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. पण केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. पैसे येताच ते गरिबांसाठी खर्च केले जातील, असे सांगत त्यांनी केंद्राची आर्थिक चणचण उघड केली. शिवसेनेने भाजपाशी सतत भांडू नये, एकमेकांशी जुळवून घ्यावे. तसे न झाल्यास सर्वात जास्त नुकसान शिवसेनेचे होणार असल्याचे भाकीत आठवले यांनी केले. राज्यातील फडणवीस सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्र सरकारने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा केली असून त्यात दलित-पीडितांच्या आर्थिक मदतीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यावर लवकरच दोन्ही सभागृहांची मान्यता घेतली जाणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.>उद्धव यांना क्लीन चिट : राज ठाकरे यांच्याकडे देण्याजोगे काहीच नसल्याने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत सामील झाले, असा दावा आठवले यांनी केला. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोणताही घोडेबाजार केला नसल्याची क्लीन चिट त्यांनी दिली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले