शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

फेरीवाल्यांना मारण्यापेक्षा सीमेवर लढावे, फेरीवाल्यांना हटवणे भारतीय संविधानाविरोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 06:09 IST

भाईंदर : दिवाळीत धंद्याच्या काळात ठाणे आणि कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून शौर्य दाखवण्यापेक्षा मनसैनिकांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढून दाखवावे, असा खोचक सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत दिला.

भाईंदर : दिवाळीत धंद्याच्या काळात ठाणे आणि कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून शौर्य दाखवण्यापेक्षा मनसैनिकांनी सीमेवर जाऊन शत्रूशी लढून दाखवावे, असा खोचक सल्ला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत दिला. मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी होतोय याचा राग त्या गरीब परप्रांतीय फेरीवाल्यांवर का काढता, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.फेरीवाल्यांना हटवणे भारतीय संविधानाविरोधात आहे. पुन्हा असे घडले तर आम्ही त्याचे उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी दिला. फेरीवाले आपले पोट इमानदारीने भरतात, ते चोरीचपाटी करीत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुढील महिन्यात गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार असून त्यात आमचा रिपब्लिकन पक्ष उमेदवार उभा न करता भाजपालाच पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेथे भाजपाला अथवा लोकशाही पुरोगामी आघाडीला बहुमत मिळाल्यास रिपब्लिकन पक्षालाही सत्तेत सामावून घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वाढत्या महागाईमुळे गरिबांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. पण केंद्र सरकारच्या तिजोरीत पैसाच नाही. पैसे येताच ते गरिबांसाठी खर्च केले जातील, असे सांगत त्यांनी केंद्राची आर्थिक चणचण उघड केली. शिवसेनेने भाजपाशी सतत भांडू नये, एकमेकांशी जुळवून घ्यावे. तसे न झाल्यास सर्वात जास्त नुकसान शिवसेनेचे होणार असल्याचे भाकीत आठवले यांनी केले. राज्यातील फडणवीस सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा दावाही त्यांनी केला. केंद्र सरकारने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा केली असून त्यात दलित-पीडितांच्या आर्थिक मदतीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यावर लवकरच दोन्ही सभागृहांची मान्यता घेतली जाणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.>उद्धव यांना क्लीन चिट : राज ठाकरे यांच्याकडे देण्याजोगे काहीच नसल्याने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत सामील झाले, असा दावा आठवले यांनी केला. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कोणताही घोडेबाजार केला नसल्याची क्लीन चिट त्यांनी दिली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले