शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

...तरीही लढत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच

By admin | Updated: October 9, 2014 04:29 IST

आतापर्यंत युती विरूद्ध आघाडी अशीच लढत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदार संघात आता चारही पक्ष आमने-आमने आले आहेत

आतापर्यंत युती विरूद्ध आघाडी अशीच लढत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पाच मतदार संघात आता चारही पक्ष आमने-आमने आले आहेत. तरीही चार मतदार संघातील प्रमुख लढत पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये होईल तर रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मात्र शिवसेना विरूद्ध भाजप अशीच प्रमुख लढत होणार आहे. आघाडी सरकारमध्ये नऊ खात्यांचे राज्यमंत्रीपद भुषवलेल्या उदय सामंत यांचा शिवसेना प्रवेश ही जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेची गोष्ट झाली आहे.काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात १९९0 साली शिवसेना-भाजप युतीने आणि २00४पासून राष्ट्रवादीने शिरकाव केला. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीनेही चांगले स्थान निर्माण केले आहे.आताच्या निवडणुकीत दापोली, चिपळूण या मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना, राजापूर मतदार संघात शिवसेना विरूद्ध काँग्रेस, गुहागर मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध भाजप तर रत्नागिरी मतदार संघात भाजप विरूद्ध शिवसेना अशी प्रमुख लढत होणार आहे.दापोलीत पाचवेळा आमदार झालेल्या शिवसेनेच्या सूर्यकांत दळवी यांना सहाव्यांदा आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीच्या संजय कदम यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्या किशोर देसाई यांच्या बंडखोरीमुळे दळवी यांचा मार्ग काहीसा सोपा होणार आहे. गुहागर मतदार संघात राष्ट्रवादीचे मावळते कामगार मंत्री भास्कर जाधव यांना तुटलेल्या युतीचा पुन्हा एकदा फायदा होण्याची शक्यता आहे. भाजपचे डॉ. विनय नातू यांनी गेल्या काही काळात शिवसेनेशी केलेली जुळवणी आणि मतदारांची केलेली आळवणी युती तुटल्यामुळे फारशी उपयोगात येणार नाही, असे दिसत आहे. चिपळूण मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार सदानंद चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्याकडून जोरदार टक्कर दिली जाण्याची अपेक्षा आहे. राजापूर मतदार संघात शिवसेनेचे राजन साळवी आणि काँग्रेसचे राजन देसाई अशी पारंपरिक पक्षीय लढत होणार आहे. त्यात शिवसेनेचे पारडे काहीसे जड आहे. सर्वात उत्सुकता आहे ती रत्नागिरी मतदार संघात. राष्ट्रवादीचे उदय सामंत शिवसेनेत गेल्यामुळे ते आणि भाजपचे बाळ माने सलग तिसऱ्यांदा समोरासमोर येत आहेत. दोनवेळा आमदार झालेल्या सामंत यांना पक्षांतरामुळे त्यांना तिसरा विजय सोपा नाही. भाजपची बहुतांश भिस्त प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होणाऱ्या मोदी यांच्या सभेवर आहे. म्हणूनच ही जागा अधिक चुरशीची होणार आहे. (प्रतिनिधी)