शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेच्या मानसिकतेतून बाहेर पडून संघर्ष करा!

By admin | Updated: February 8, 2015 01:28 IST

राज्यातील भाजपा सरकारला १०० दिवसांत एकही आश्वासन पाळता आले नाही. राज्यात सत्तेत असणाऱ्यांना आपण अजून सत्तेत आहोत, असे वाटत नाही.

पुणे : राज्यातील भाजपा सरकारला १०० दिवसांत एकही आश्वासन पाळता आले नाही. राज्यात सत्तेत असणाऱ्यांना आपण अजून सत्तेत आहोत, असे वाटत नाही. पण आपण मात्र सत्तेत असल्याप्रमाणे वागतो. सत्ताधारी असल्याच्या मानसिकतेतून बाहेर पडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी संघर्ष केला पाहिजे, असा आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शनिवारी केले. राष्ट्रवादीच्या प्रतिनिधी संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते शनिवारी बालेवाडी क्रीडा संकूल येथे झाले. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी, विधिमंडळ नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी सभापती दिलीप वळसे-पाटील, माजीमंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील, भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, नवाब मलिक, मधुकर पिचड, खा़ सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून १५ वर्षे सत्तेत होता़ पहिल्यांदा आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे अद्याप नेते व कार्यकर्त्यांची मानसिकता तयार होत नाही. परंतु, सरकारने नऊ महिन्यांत कोणत्या अच्छे दिनच्या बाळाला जन्म दिला. त्याची माहिती घेऊन संघर्ष करा, असे आवाहन पटेल यांनी केले. विधिमंडळात महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण, स्मार्ट व्हिलेज आणि न्याय व्यवस्थेच्या सुधारणासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढील काळात आंदोलने केली पाहिजेत, असा सल्ला त्रिपाठी यांनी दिला. आपल्या पक्षाचा संघर्ष सत्ताधाऱ्यांबरोबर आहे.आपल्या पक्षाची बांधणी व्यक्ती केंद्रीत न होता, पक्ष म्हणून संघटन झाले पाहिजे, असे वळसे-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मुस्लीम आरक्षणाविषयी दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे एमआयएमचे ओवैसी नावाचे भूत तयार झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करीत आहेत, अशी टीका नवाब मलीक यांनी केली.