शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

खान्देशातील ५० कोटी निधी परत गेला

By admin | Updated: March 30, 2015 02:20 IST

जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याने या तालुक्यांसाठी १५७ कोटी ४२ लाख रुपये मदत निधी आला.

जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांंमध्ये दुष्काळसदृश स्थिती असल्याने या तालुक्यांसाठी १५७ कोटी ४२ लाख रुपये मदत निधी आला. पण यापैकी २१ कोटी ३८ लाख ५१ हजार २४५ रुपये निधी शासनाकडे परत पाठविण्यात आला आहे़ जामनेर, पारोळा, भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, भडगाव, अमळनेर, चाळीसगाव या तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती होती. या तालुक्यांमधील तीन लाख ४७ हजार ४२७ हेक्टर बाधित झाले होते. सुमारे ३३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. धुळे जिल्ह्यात सुमारे १४२ कोटी रुपयांचे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. भरपाई देताना सरकारने हेक्टरची मर्यादा घातल्याने उरणारे २२-२३ कोटी रुपये ‘सरेंडर’ होतील, असे सूत्रांनी सांगितले़ नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तीन तालुक्यांसाठी शासनाने ३३ कोटी ३० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचा फायदा ९९ हजार ७६६ शेतकऱ्यांना झाला आहे. नंदुरबारसह नवापूर आणि अक्कलकुवा या तालुक्यांतील ५०९ गावांना दुष्काळी स्थिती होती़ या तालुक्यांसाठी ३३ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मिळाला होता. आतापर्यंत ३२ कोटी १० लाख रुपयांचा निधी ९२ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे़ तर ९२ हजारांपैकी काही शेतकऱ्यांची नावे यादीत चुकीची प्रसिद्ध झाल्याने आणि काहींचे बँक खाते नंबर चुकीचे गेल्याने त्यांना मदत मिळू शकली नाही़ काही शेतकऱ्यांनी पुरावे दिल्यानंतरही त्यांना चकरा माराव्या लागत आहेत.