शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

विधान परिषदेसाठी आतापासून फिल्डिंग; राष्ट्रवादीच्या जागा कमी होणार, तर भाजपाच्या वाढणार

By अतुल कुलकर्णी | Published: February 23, 2018 6:01 AM

विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.

मुंबई : विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या ११ जागांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे. त्यात चार जागा राष्टÑवादीच्या असून आहे ते संख्याबळ आणि काँग्रेसला दिलेला शब्द यासाठी त्यांना तीन जागांवर पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे किमान दोन जागा कशा मिळवता येतील यासाठी राष्टÑवादीची धडपड सुरू झाली आहे. राष्टÑवादीचे अ‍ॅड. जयदेव गायकवाड, सुनील तटकरे, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त व शरद रणपिसे तसेच भाजपाचे भाई गिरकर आणि महादेव जानकर तर शिवसेनेचे अनिल परब व शेकापचे जयंत पाटील या ११ आमदारांची मुदत २७ जुलै रोजी संपत आहे.काँग्रेस आणि राष्टÑवादीचे विधानसभेतील संख्याबळ ८३आहे. त्यापैकी काँगे्रसचे कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे हेकाँग्रेस उमेदवारांना मतदान करतील की नाही याविषयी काँग्रेस नेतृत्वाला शंका आहे. त्यामुळे आहे त्या८१ एवढ्या संख्याबळावर दोघांचे मिळून तीन आमदार कसेबसेनिवडून येऊ शकतात. राष्टÑवादीने रामराजे नाईक निंबाळकर आणि धनंजय मुंडे यांच्या मागील निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचा पाठिंबा घेताना पुढच्या निवडणुकीतआम्ही तुम्हाला एक जागा सोडूअसे आश्वासन दिले होते. त्यामुळेती एक जागा आता राष्ट्रवादीने आम्हाला सोडावी असे काँग्रेसचे म्हणणे आहे. कारण यावेळी काँग्रेसच्या तीन आमदारांचीमुदत संपणार आहे. त्यात माणिकराव ठाकरे हे सध्या उपसभापती आहेत आणि पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांच्यांशी त्यांचे सख्य आहे. शरद रणपिसे व संजय दत्त यांच्यापैकी कोणाची निवड होणार हा प्रश्न कायम आहे.शिवसेनेचे विधानसभेत ६३ आमदार आहेत. ते दोन आमदार आरामात निवडून आणू शकतात. तरीही त्यांच्याकडे काही मते शिल्लक राहतील. त्यामुळे अनिल परब यांना पुन्हा संधी देताना सेना दुसरीजागा कोणाला देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. त्यासाठी नुकतेच सचिव झालेले मिलींद नार्वेकर जोरदार प्रयत्न करत आहेत. काँग्रेस, राष्टÑवादीतील आपापसातील मारामारी पहाता शेकापचे जयंत पाटील यांना विधानसभेतून निवडून येणे अवघड आहे. ते उभे राहिले तर विरोधकांचीच अडचण होणारआहे. रायगड स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून आलेल्या अनिल तटकरे यांची मुदत ३१ मे रोजीसंपत आहे. त्यांची जागी जयंत पाटील यांना देऊन स्थानिक राजकारण सांभाळायचे व त्याचा फायदा लोकसभा, विधानसभेला घ्यायचाकी पुन्हा अनिल तटकरेंनाच संधी द्यायची याचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यायचा आहे.या सगळ्यात भाजपाचा मात्र फायदा होणार आहे. त्यांचे दोन विद्यमान आमदार तर निवडून येतीलच शिवाय आणखी चौघांना त्यांना निवडून आणणे शक्य होणार आहे. राष्टÑवादीचे विद्यमान आ. व माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांना या राष्टÑवादीतून संधी मिळणार नाही हे लक्षात आले आहे. त्यामुळे ते भाजपाशी संधान साधून असल्याचे सांगितले जाते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांनी नवी मुंबईत दोन मोठे कार्यक्रमही घेत भाजपात मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यांच्यामुळे भाजपाकडे कामगार नेता येऊ शकतो. मात्र पुन्हा पक्षाबाहेरच्या लोकांनाच संधी देत भाजपाच्या निष्ठावंतांना आणखी कितीवेळा डावलणार असे सवाल पक्षात सुरु झाले आहेत.