शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

एक ताप,धोका चार आजारांचा

By admin | Updated: June 23, 2016 03:56 IST

कडकडीत उन्हामुळे मुंबईकरांची लाही लाही होत होती. पण पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईकर सुखावले आहेत. पावसानंतर हवामानातील बदलामुळे मुंबईकरांची तब्येत खराब होऊ शकते

मुंबई : कडकडीत उन्हामुळे मुंबईकरांची लाही लाही होत होती. पण पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुंबईकर सुखावले आहेत. पावसानंतर हवामानातील बदलामुळे मुंबईकरांची तब्येत खराब होऊ शकते. यावेळी आरोग्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण ताप अंगावर काढल्यास मुंबईकरांना मलेरिया, डेंग्यू किंवा स्वाइन फ्लू अथवा लेप्टो होण्याचा धोका आहे.गेल्यावर्षी जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर मुंबईत लेप्टोची साथ पसरली होती. गेल्या दोन दिवसांत मुंबईत झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले होते. पायाला जखम असताना साठलेल्या पाण्यातून चालत गेल्यास लेप्टोस्पायरा हे विषाणू शरीरात जाण्याचा धोका असतो. आणि त्यामुळे लेप्टाची लागण होऊ शकते. पुढच्या काही दिवसांत ताप आल्यास तो अंगावर काढू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. कोणालाही ताप आला असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. रक्त तपासणी करावी. कारण साथीच्या आजाराचे प्राथमिक पातळीवर निदान झाल्यास आजार लवकर बरा होतो आणि गुंतागुंत होत नाही. डॉक्टरकडे गेल्यावर साचलेल्या पाण्यातून चालत गेले असल्यास तेही नक्की सांगा, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केले आहे. घराभोवती स्वच्छता ठेवा. एसीमधील पाणी काढून टाका, करवंट्या, अडगळीच्या ठिकाणच्या वस्तू काढून टाका, गच्ची स्वच्छ करून घ्या, पाणी साठू देऊ नका, स्वच्छता ठेवा, असेही डॉ. केसकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी) महापालिका पाच महिन्यांपासून प्रयत्नशीलपावसाळा सुरु होण्याआधीच साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने चांगलीच कंबर कसली होती. डेंग्यू, मलेरिया हे साथीचे आजार साठलेल्या पाण्यात उत्पत्ती होणाऱ्या डासांमुळे होतात. टायर, ताडपत्री, अडगळीच्या वस्तूंमध्ये पावसाळ््यात पाणी साचण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीत महापालिकेने डास प्रतिबंधासाठी महापालिकेने शहरातील ३ हजार १७५ टायर्स हटविले. तर, १ लाख ८८ हजार ६१६ वस्तू देखील काढून टाकल्या. टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक यासारख्या विविध वस्तुंमध्ये पावसाचे अथवा इतर पाणी साचते. यामध्ये अगदी थोड्याप्रमाणात साचलेल्या अथवा असणाऱ्या पाण्यात देखील डास अंडी घालतात. त्यामुळे गेल्या ५ महिन्यांपासून महापालिका कार्यवाही करत होती. या कार्यवाहीत ‘जी दक्षिण’ आणि ‘एम पश्चिम’ विभागात सर्वाधिक म्हणजे ३१६ टायर हटविण्यात आले आहेत. त्या खालोखाल ‘एम पूर्व’ विभागातून २५७ आणि ‘आर उत्तर’ २४५ टायर हटविण्यात आले आहेत. तर सर्व २४ विभागातून ३ हजार १७८ टायर हटविण्यात आले आहेत. तर, ३० हजार ४२३ वस्तू ‘जी उत्तर’ विभागातून हटविण्यात आल्या आहेत. खालोखाल २८ हजार १९८ वस्तू या ‘इ’ विभागातून हटविण्यात आल्या आहेत. २४ विभागातून १ लाख ८८ ६१६ इतर वस्तू हटविण्यात आल्या आहेत. हे जरूर करापाणी उकळून, गाळून प्या, ताजे शिजलेले अन्न खा, खाण्याआधी हात स्वच्छ धुवा, साचलेल्या पाण्यातून चालू नका, पायाची जखम उघडी ठेवू नका, बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवा, घराच्या परिसरात साचलेले पाणी काढून टाकाहे टाळा! न शिजवलेले पदार्थ खाऊ नका, चटणी खाणे टाळा, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, स्टॉल्स, खाण्याच्या गाड्यांवरचे पाणी पिऊ नका, ताप २ ते ३ दिवसांपर्यंत अंगावर काढू नका, स्वत:च औषधे घेणे टाळा, पावसात अधिक काळ भिजू नका पावसाळ््यात होणारे आजार ताप : लक्षणे - कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणेलेप्टोस्पायरसिस : लक्षणे - थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोळे लाल होणे, काहीवेळा त्वचेवर रॅश येणेस्वाइन फ्लू : लक्षणे - सर्दी, घशात खवखव, ताप, अंगदुखी गॅस्ट्रो : लक्षणे - पोटाच्या वरच्या भागात दुखणे, अन्नावरची इच्छा उडणे, उलट्या, ढेकरा येणे, भूक मंदावणेकावीळ : लक्षणे - अस्वस्थता वाटणे, सांधे दुखी, ताप, उलट्या किंवा अन्नावरची इच्छा उडणे, डोकेदुखीटायफॉइड : लक्षणे - भूक कमी लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप (४ डिग्रीपर्यंत जाऊ शकतो), सुस्तपणा येणे, उलट्या होणे, अन्नावरची इच्छा उडणेकॉलरा : लक्षणे - जुलाब, डायरिया, अशक्तपणा येणे, डिहायड्रेशन, पोटदुखीडासांमुळे होणारे आजार मलेरिया : लक्षणे - ताप, थंडी वाजणे, सांधे दुखणे, उलट्या होणे डेंग्यू : लक्षणे - ताप, स्नायू दुखणे, सांधे दुखी, डोके दुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे चिकनगुनिया : लक्षणे - आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताप येणे, डोकेदुखी, तीव्र सांधेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे किंवा उलट्या होणे, डोळ््यांचा दाह होणजून २०१५ आजाररुग्णमलेरिया६०९डेंग्यू३८टायफॉइड१०२गॅस्ट्रो१०२३लेप्टो ४कावीळ९९२० जून २०१६आजाररुग्णमलेरिया२८०डेंग्यू२७टायफॉईड७९गॅस्ट्रो५७९लेप्टो ६कावीळ८२