शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो घेणार भरारी

By admin | Updated: August 21, 2014 01:21 IST

उपराजधानीला विकासाचा नवा चेहरा देणारा आणि वाहतूक कोंडी दूर करण्यात मोलाची भूमिका बजावणारा ८ हजार ६८० कोटी रुपयांचा ३८.३१ कि.मी. लांबीचा बहुप्रतीक्षित नागूपर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे

पंतप्रधान करणार भूमिपूजन: उपराजधानीच्या विकासाला बळ नागपूर : उपराजधानीला विकासाचा नवा चेहरा देणारा आणि वाहतूक कोंडी दूर करण्यात मोलाची भूमिका बजावणारा ८ हजार ६८० कोटी रुपयांचा ३८.३१ कि.मी. लांबीचा बहुप्रतीक्षित नागूपर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे गुरुवारी २१ आॅगस्टला सायंकाळी ५.४५ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कस्तूरचंद पार्कवर जाहीर कार्यक्रमात भूमिपूजन होणार आहे. याच कार्यक्रमात पारडी नाका उड्डाण पूल,नवीन रस्ता दुभाजकासह इतरही कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन मोदींच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्यासह केंद्रीय नगर विकास मंत्री एम.वेंकय्या नायडू, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्राम विकास मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्यासह अन्य मंत्री आणि राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते तसेच केंद्र आणि राज्यातील ऊर्जा, नगर विकास आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित राहतील. हा कार्यक्रम शासकीय असला तरी त्याला जाहीर कार्यक्रमाचे स्वरूप देण्यात आले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी प्रथमच नागपूरमध्ये येत असल्याने कार्यक्रमाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. या कार्यक्रमाला एक लाख लोक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने कस्तूरचंद पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ५० हजार खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. एक हजारावर सोफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. टप्प्प्यावर पोलीस तैनात करण्यात आले आहे. सायंकाळी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षानेही या कार्यक्रमाची एक आठवड्यापासून तयारी सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघातून १५ ते २० हजार लोकांना सभास्थळी आणण्याचे लक्ष्य निर्धारित करून देण्यात आले आहे. बुधवारी दुपारी महापौर आणि आमदार अनिल सोले, शहर अध्यक्ष व आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे यांच्यासह अन्य नेत्यांनी कस्तूरचंद पार्कला भेट दिली व व्यवस्थेची पाहणी केली. सुरक्षा अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली. यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. प्रव्ीण दराडे, पोलीस आयुक्त के.के. पाठक उपस्थित होते.४० अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच पंतप्रधान मोदी यांच्याभोवती एसपीजी आणि एसपीयूंच्या ४० अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच राहणार आहेत. एसपीजीच्या बाजूला पोलिसांचा गराडा राहील. गुन्हेशाखेचे पोलीस उपायुक्त सुनील कोल्हे हे कॅन्वाय मार्शलची जबाबदारी सांभाळणार आहेत. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी ट्रॅफिक डीसीपी भारत तांगडे सांभाळतील. विमानतळावरचा बंदोबस्त परिमंडळ एकचे उपायुक्त अभिनाशकुमार हाताळणार आहेत. राजभवनाच्या सुरक्षेचा बंदोबस्त पोलीस उपायुक्त विजय पवार सांभाळतील. असा आहे दौैरावेळ कार्यक्रमदु.३.०५ रांची येथून नागपूर विमानतळावर आगमन३.१० हेलिकॉप्टरने मौद्याकडे प्रयाण३.३५ मौदा हेलिपॅडवर आगमन३.४५ ते ४.४५ मौदा औष्णिक वीज प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे देशाला लोकार्पण५ वा. मौदा येथून नागपूरकडे प्रयाण५.२५ नागपूर विमानतळावर आगमन५.३० कस्तूरचंद पार्ककडे कारने रवाना५.४५ कस्तूरचंद पार्कवर आगमन५.४५ ते ६.४५कस्तूरचंद पार्कवर कार्यक्रमात उपस्थितीरात्री ७.१० नागपूरहून दिल्लीकडे प्रयाणमौदा वीज प्रकल्पाचे आज लोकार्पणनॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी) मौदा येथील सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या एक हजार (५०० मे.वॅ.चे दोन युनिट) मे.वॅ.च्या पहिल्या टप्प्याचे गुरुवारी दुपारी ३.४५ वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५४५९ कोटी रुपयांची गुंतवणूक असून दुसऱ्या टप्प्यासाठी ७९२१ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. मौदा प्रकल्पाच्या पहिल्या युनिटचे कार्यान्वयन मार्च २०१३ पासून तर दुसऱ्या टप्प्याचे कार्यान्वयन मार्च २०१४ पासून सुरू झाले. या प्रकल्पातून महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश,छत्तीसगड, गोवा आणि जम्मू काश्मीर या राज्यांसह दीव-दमण, दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांनाही वीजपुरवठा करण्यात येणार आहे. एनटीपीसीचा हा राज्यातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल के. शंकरनारायणन,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे व खासदार कृपाल तुमाने यांच्यासह एनटीपीसीचे मुख्य प्रबंध संचालक डॉ. अरुप रॉय चौधरी, संचालक (संचालन) एन.एन.मेश्राम,संचालक (मानव व संसाधन) यु.पी.पाणी, कार्यकारी संचालक (पश्चिम क्षेत्र) जी.जे. देशपांडे, मौदा प्रकल्पाचे समूह महाप्रबंधक व्ही. थंगापाडियन व इतरही नेते उपस्थित राहणार आहेत.